शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बावनकुळेंचे तिकीट कापणे भाजपला भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:17 IST

राज्याचे ऊर्जा तथा नागपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याचा भारतीय जनता पक्षाला पूर्व विदर्भात जबर फटका बसल्याचे आजच्या निकालानंतर बोलले जात आहे.

ठळक मुद्देपूर्व विदर्भात फटका : दिग्गजांनाही बसला धक्का

लोकमत वृत्तसेवानागपूर : राज्याचे ऊर्जा तथा नागपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याचा भारतीय जनता पक्षाला पूर्व विदर्भात जबर फटका बसल्याचे आजच्या निकालानंतर बोलले जात आहे.कामठी विधानसभा मतदार संघातून तीन वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या बावनकुळेंना शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्याऐवजी किमान त्यांच्या पत्नीला तरी उमेदवारी मिळेल, या विश्वासाने ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. परंतु उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांनाही लढविण्यास नकार दिला. ज्या पद्धतीने बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि शेवटच्या क्षणी त्यांच्या पत्नीलाही अपमानित करण्यात आले, या घटनेची संतप्त प्रतिक्रिया विदर्भातील तेली आणि बहुजन समाजात तीव्रतेने उमटली. त्याच वेळी भाजपला पूर्व विदर्भात बावनकुळे इफेक्टचा फटका बसेल, असे राजकीय जाणकार सांगत होते, त्याचे प्रत्यंतर आज आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांचा योग्य मान-सन्मान राखला जाईल, असे प्रत्येक प्रचारसभेत सांगितले. परंतु त्याचा मतदारांवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. नागपूर या त्यांच्या गृहजिल्ह्यात नागपूर शहरातील पश्चिम आणि उत्तर या दोन मतदार संघात तसेच जिल्ह्यातील काटोल, रामटेक, सावनेर आणि उमरेड या चार मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी त्याच्या विजयाचे श्रेय बावनकुळेंनी केलेल्या विकास कामांनाच जाते, असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. बावनकुळेंनी पालकमंत्रीपद भूषविलेल्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि साकोली या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनाही तिथे धक्कादायक पराभव पत्करावा लागला. काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना पराभूत करणे भाजप नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. परंतु तिथेही बावनकुळे इफे क्ट असल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदार संघाचा अपवाद वगळता उर्वरित तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले. तिथेही हेच लोण पोहचले असल्याचे स्थानिक भाजप नेत्यांनी मान्य केले आहे. बावनकुळे सध्या पालकमंत्री असलेल्या वर्धा जिल्ह्यात चारपैकी तीन जागा भाजपच्या पदरात पडल्या, हे त्यांनी शेवटच्या क्षणी घेतलेले परिश्रम कामात आल्याचे वर्धा जिल्ह्यातील एका विजयी आमदाराने सांगितले.उमेदवारी नाकारल्यानंतरही बावनकुळेंनी पक्षाचा प्रामाणिक प्रचार केला तरी मतदारांनी त्यांचे ऐकले नाही. उमेदवारी कापताना पक्षश्रेष्ठींनी लोकभावनेचा अदमास घेतला असता तर पक्षाला पूर्व विदर्भात असा दारुण पराभव स्वीकारावा लागला नसता. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी आत्मचिंतन करावे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPoliticsराजकारणBJPभाजपा