शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बावनकुळेंचे तिकीट कापणे भाजपला भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:17 IST

राज्याचे ऊर्जा तथा नागपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याचा भारतीय जनता पक्षाला पूर्व विदर्भात जबर फटका बसल्याचे आजच्या निकालानंतर बोलले जात आहे.

ठळक मुद्देपूर्व विदर्भात फटका : दिग्गजांनाही बसला धक्का

लोकमत वृत्तसेवानागपूर : राज्याचे ऊर्जा तथा नागपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याचा भारतीय जनता पक्षाला पूर्व विदर्भात जबर फटका बसल्याचे आजच्या निकालानंतर बोलले जात आहे.कामठी विधानसभा मतदार संघातून तीन वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या बावनकुळेंना शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्याऐवजी किमान त्यांच्या पत्नीला तरी उमेदवारी मिळेल, या विश्वासाने ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. परंतु उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांनाही लढविण्यास नकार दिला. ज्या पद्धतीने बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि शेवटच्या क्षणी त्यांच्या पत्नीलाही अपमानित करण्यात आले, या घटनेची संतप्त प्रतिक्रिया विदर्भातील तेली आणि बहुजन समाजात तीव्रतेने उमटली. त्याच वेळी भाजपला पूर्व विदर्भात बावनकुळे इफेक्टचा फटका बसेल, असे राजकीय जाणकार सांगत होते, त्याचे प्रत्यंतर आज आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांचा योग्य मान-सन्मान राखला जाईल, असे प्रत्येक प्रचारसभेत सांगितले. परंतु त्याचा मतदारांवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. नागपूर या त्यांच्या गृहजिल्ह्यात नागपूर शहरातील पश्चिम आणि उत्तर या दोन मतदार संघात तसेच जिल्ह्यातील काटोल, रामटेक, सावनेर आणि उमरेड या चार मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी त्याच्या विजयाचे श्रेय बावनकुळेंनी केलेल्या विकास कामांनाच जाते, असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. बावनकुळेंनी पालकमंत्रीपद भूषविलेल्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि साकोली या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनाही तिथे धक्कादायक पराभव पत्करावा लागला. काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना पराभूत करणे भाजप नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. परंतु तिथेही बावनकुळे इफे क्ट असल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदार संघाचा अपवाद वगळता उर्वरित तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले. तिथेही हेच लोण पोहचले असल्याचे स्थानिक भाजप नेत्यांनी मान्य केले आहे. बावनकुळे सध्या पालकमंत्री असलेल्या वर्धा जिल्ह्यात चारपैकी तीन जागा भाजपच्या पदरात पडल्या, हे त्यांनी शेवटच्या क्षणी घेतलेले परिश्रम कामात आल्याचे वर्धा जिल्ह्यातील एका विजयी आमदाराने सांगितले.उमेदवारी नाकारल्यानंतरही बावनकुळेंनी पक्षाचा प्रामाणिक प्रचार केला तरी मतदारांनी त्यांचे ऐकले नाही. उमेदवारी कापताना पक्षश्रेष्ठींनी लोकभावनेचा अदमास घेतला असता तर पक्षाला पूर्व विदर्भात असा दारुण पराभव स्वीकारावा लागला नसता. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी आत्मचिंतन करावे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPoliticsराजकारणBJPभाजपा