शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मुलींची गळती रोखण्यासाठी ‘सावित्री’चाच आधार

By admin | Updated: March 10, 2016 03:36 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच समाजातील महिलाही शिकू लागल्या. उच्च पदावर पोहचू लागल्या.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती : लाखो मागासवर्गीय मुलींना लाभ नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच समाजातील महिलाही शिकू लागल्या. उच्च पदावर पोहचू लागल्या. महिलांचे विशेषत: मागासवर्गीय मुलींचे प्रमाण वाढले. मात्र काही वर्षांपासून या मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाणही झपाट्याने वाढले होते. त्याचे सर्वात मोठे कारण आर्थिक परिस्थिती हेच होते. या मुलींची विशेषत: भटके विमुक्त व मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींची शाळा मध्येच सुटू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आणि या मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेमुळे मुलींची शाळा गळती थांबवण्यात काही प्रमाणात का असेना शासनाला यश आले. समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणारी ही योजना म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना होय. ज्या मुलीसाठी शिक्षणाची दारे उघडी केली त्या लेकींची शाळा मध्ये सुटू नये, त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे, यासाठी पुन्हा एकदा सावित्रीचाच आधार मिळत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच क्षेत्रातील मुली चांगले शिक्षण घेत आहेत. मागासवर्गीय समाजातील मुलीसुद्धा यात मागे नाही. मागील काही वर्षांमध्ये मागासवर्गीय मुलींचे शिक्षणाचे प्रमाण चांगले होते. परंतु ५ वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींपैकी अनेक मुली १० वीपर्यंत पोहोचतच नव्हत्या. त्या मध्येच शाळा सोडून देत होत्या. हे प्रमाण कालांतराने वाढत गेले. विशेषत: पाचवी ते दहावीत याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. ही बाब लक्षात घेऊन इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. सुरुवातीला ५ वी ते ७ वी साठी १९९६ मध्ये शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर त्याचा विस्तार करीत २००३ पासून ८ वी ते १० वीतील मागासवर्गीय मुलींनाही ही शिष्यवृत्ती दिली जाते. ५ वी ते ७ वीतील मागासवर्गीय मुलींना दरमहा ६० रुपये अशी एकूण १० महिने म्हणजे ६०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. तर ८ वी ते १० वीतील मागासवर्गीय मुलींना दरमहा १०० रुपये याप्रमाणे वर्षाचे हजार रुपये मिळते. यासाठी उत्पन्न व गुणांची अट नाही. संबंधित मुलींना अर्ज करण्याचीही आवश्यकता नाही. यासाठी आॅनलाईन अर्ज भरावयाचे असून ते शाळांनाच भरावे लागतात. २०१३ पासून ही शिष्यवृत्ती योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. २०१३-१४ य शैक्षणिक वर्षात एकूण १० लाख ४७ हजार ८१५ मागासवर्गीय मुुलींचे अर्ज आले. यात अनुसूचित जातीच्या ५ लाख १३ हजार ४३५ मुली, विशेष मागास प्रवर्गाच्या ६१ हजार १०५ मुली व भटके विमुक्त जातीतील ४ लाख ७३ हजार २७५ मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त झाले. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात या योजनेंतर्गत एकूण ९ लाख २७ हजार ३१२ मुलींनी अर्ज केला होता. यामध्ये अनुसूचित जातीच्या ३ लाख ९० हजार ५२१, विशेष मागास प्रवर्गातील ५८ हजार १०५ आणि भटके जमातीच्या ४ लाख ७८ हजार ६८६ मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज शासनाकडे प्राप्त झाले.२०१५-१६ या शैक्षणिक वर्षाचा विचार केला असता या वर्षात ९ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यातील शाळांमधून एकूण ८ लाख ५५ हजार ८४८ मुलींचे अर्ज आले आहेत. यामध्ये अनुसूचित जमातींच्या मुलींचे ३ लाख ७० हजार ६४९ अर्ज आले आहेत. विशेष मागास प्रवर्गाच्या मुलींचे ५०,१४६ आणि भटक्या विमुक्त जातीच्या ४ लाख ३५ हजार ५३ मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज शासनाला प्राप्त झाले आहेत. या शिष्यवृत्तीमुळे संबंधित मुलींना होणार आर्थिक मदत फार नसली तरी थोडीफार आधार देणारी नक्कीच आहे. त्यामुळे लाखो मागासवर्गीय मुलींचे शाळा गळती प्रमाण रोखण्यास काहीप्रमाणातच यश आले आहे. (प्रतिनिधी)