शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मुलींची गळती रोखण्यासाठी ‘सावित्री’चाच आधार

By admin | Updated: March 10, 2016 03:36 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच समाजातील महिलाही शिकू लागल्या. उच्च पदावर पोहचू लागल्या.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती : लाखो मागासवर्गीय मुलींना लाभ नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच समाजातील महिलाही शिकू लागल्या. उच्च पदावर पोहचू लागल्या. महिलांचे विशेषत: मागासवर्गीय मुलींचे प्रमाण वाढले. मात्र काही वर्षांपासून या मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाणही झपाट्याने वाढले होते. त्याचे सर्वात मोठे कारण आर्थिक परिस्थिती हेच होते. या मुलींची विशेषत: भटके विमुक्त व मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींची शाळा मध्येच सुटू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आणि या मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेमुळे मुलींची शाळा गळती थांबवण्यात काही प्रमाणात का असेना शासनाला यश आले. समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणारी ही योजना म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना होय. ज्या मुलीसाठी शिक्षणाची दारे उघडी केली त्या लेकींची शाळा मध्ये सुटू नये, त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे, यासाठी पुन्हा एकदा सावित्रीचाच आधार मिळत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच क्षेत्रातील मुली चांगले शिक्षण घेत आहेत. मागासवर्गीय समाजातील मुलीसुद्धा यात मागे नाही. मागील काही वर्षांमध्ये मागासवर्गीय मुलींचे शिक्षणाचे प्रमाण चांगले होते. परंतु ५ वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींपैकी अनेक मुली १० वीपर्यंत पोहोचतच नव्हत्या. त्या मध्येच शाळा सोडून देत होत्या. हे प्रमाण कालांतराने वाढत गेले. विशेषत: पाचवी ते दहावीत याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. ही बाब लक्षात घेऊन इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. सुरुवातीला ५ वी ते ७ वी साठी १९९६ मध्ये शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर त्याचा विस्तार करीत २००३ पासून ८ वी ते १० वीतील मागासवर्गीय मुलींनाही ही शिष्यवृत्ती दिली जाते. ५ वी ते ७ वीतील मागासवर्गीय मुलींना दरमहा ६० रुपये अशी एकूण १० महिने म्हणजे ६०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. तर ८ वी ते १० वीतील मागासवर्गीय मुलींना दरमहा १०० रुपये याप्रमाणे वर्षाचे हजार रुपये मिळते. यासाठी उत्पन्न व गुणांची अट नाही. संबंधित मुलींना अर्ज करण्याचीही आवश्यकता नाही. यासाठी आॅनलाईन अर्ज भरावयाचे असून ते शाळांनाच भरावे लागतात. २०१३ पासून ही शिष्यवृत्ती योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. २०१३-१४ य शैक्षणिक वर्षात एकूण १० लाख ४७ हजार ८१५ मागासवर्गीय मुुलींचे अर्ज आले. यात अनुसूचित जातीच्या ५ लाख १३ हजार ४३५ मुली, विशेष मागास प्रवर्गाच्या ६१ हजार १०५ मुली व भटके विमुक्त जातीतील ४ लाख ७३ हजार २७५ मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त झाले. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात या योजनेंतर्गत एकूण ९ लाख २७ हजार ३१२ मुलींनी अर्ज केला होता. यामध्ये अनुसूचित जातीच्या ३ लाख ९० हजार ५२१, विशेष मागास प्रवर्गातील ५८ हजार १०५ आणि भटके जमातीच्या ४ लाख ७८ हजार ६८६ मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज शासनाकडे प्राप्त झाले.२०१५-१६ या शैक्षणिक वर्षाचा विचार केला असता या वर्षात ९ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यातील शाळांमधून एकूण ८ लाख ५५ हजार ८४८ मुलींचे अर्ज आले आहेत. यामध्ये अनुसूचित जमातींच्या मुलींचे ३ लाख ७० हजार ६४९ अर्ज आले आहेत. विशेष मागास प्रवर्गाच्या मुलींचे ५०,१४६ आणि भटक्या विमुक्त जातीच्या ४ लाख ३५ हजार ५३ मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज शासनाला प्राप्त झाले आहेत. या शिष्यवृत्तीमुळे संबंधित मुलींना होणार आर्थिक मदत फार नसली तरी थोडीफार आधार देणारी नक्कीच आहे. त्यामुळे लाखो मागासवर्गीय मुलींचे शाळा गळती प्रमाण रोखण्यास काहीप्रमाणातच यश आले आहे. (प्रतिनिधी)