शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

‘मल्हार’च्या आधाराने आयुष्य ‘जेजुरी’ झाले

By admin | Updated: April 10, 2017 02:59 IST

वयाची ८० वळणे कधीचीच लोटून गेलेली...वार्धक्याने शरीराचा नुसता सापळा उरलेला...ना हातात बळ ना पायात संवेदना...

निराधार माऊलीच्या जीवनात चैत्राची पालवी : आयुष्याच्या संध्याकाळी मिळाले जगण्याचे बळनरेश डोंगरे   नागपूरवयाची ८० वळणे कधीचीच लोटून गेलेली...वार्धक्याने शरीराचा नुसता सापळा उरलेला...ना हातात बळ ना पायात संवेदना...अशा दयनीय अवस्थेत तरुणाईच्या ‘मल्हार‘नामक समूहाच्या नजरेस दुर्दैवी आजी पडली अन् मातृहृदयी तरुणाईला ममतेचा पान्हा फुटला. त्यांनी तिला आधार दिला. त्यामुळे जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वृद्ध माऊलीच्या जीवनात चैत्राची पालवी फुटली. होय, आप्त-स्वकीय सारेच गमावल्याने स्मृतिभ्रंश झालेली आजी आता मदर टेरेसा शांती भवनात राहायला गेली आहे. तेथे तिच्यासारख्याच अनेकांच्या सोबतीने ती राहणार आहे अन् चैत्राच्या नवचैतन्यात आयुष्याची सायंकाळ घालविणार आहे. रखरखत्या उन्हात दोन वर्षांपूर्वी ‘मल्हार‘च्या एका सहकाऱ्याला ताजबाग परिसरात अंदाजे ७५ ते ८० वर्षे वयोगटातील ही माऊली भटकताना दिसली. वृद्धत्वामुळे तिला धड चालताही येत नव्हते. तिच्यासारख्यांना आधार देण्यासाठी धडपडणाऱ्या या सहकाऱ्याने ही माहिती मल्हार ग्रुपच्या संयोजिका मेघना गोरे यांना सांगितली. झाले, लगेच मेघना, केदार आंबोकर, आकाश घरडे, दिव्या देरकर, जावेद शेख, अमित गौर, शुभांगी गर्गे, अमित गव्हाणे, मिलिंद आंबेकर आणि त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. सुरू झाली तिची वास्तपुस्त. या माऊलीने तिच्या आयुष्यात एवढे दु:ख सोसले की तिच्या सर्व आठवणीच गोठल्यात. ती कोण, कुठली, येथे कशी आली, तिचे आप्तस्वकीय कुठे राहतात, यापैकी तिला काहीच आठवत नव्हते. मिळालेला घास तुकडा खायचा अन् नाही काही मिळाले तर ताजबाग परिसरात उघड्यावर हाडं टाकायची, असा तिचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. भूक लागली की अन्न अन् तहान लागली की लगेच पाणी मिळेल, याचा भरवसा नव्हता. हे सर्व आजूबाजूच्यांकडून कळल्यामुळे मल्हारच्या सहकाऱ्यांनी आजीची जबाबदारी स्वीकारली. तिला रोज घरून जेवण आणून द्यायचे. पाण्याची बाटली आणायची. तिचे खाणे-पिणे करतानाच आंघोळ घालून द्यायची अन् प्रत्येकाने जाता-येता तिच्यावर लक्ष ठेवायचे, असे सुरू झाले. तिला येथे सोडून गेलेले नातेवाईक परत येतील अन् आजीला घेऊन जातील, अशी मल्हारला आशा होती. त्यामुळे आजीला येथे मुद्दामहून ठेवण्यात आले होते. मात्र, तब्बल दोन वर्षे झाली. कुणी तिच्याकडे फिरकलेच नाही.हो, एक चांगले घडले. मल्हारच्या सहकाऱ्यांचा या बिचाऱ्या वृद्ध जीवालासुद्धा आता लळा लागला होता. ती रोज त्यांचीच वाट बघत बसायची. बोलता येत नसले तरी तिचे डोळे त्याची साक्ष पटवत होते. मल्हारचा सहकारी आला की तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक यायची. त्यानंतर व्हायचा एकमेकाना स्रेहाचा स्पर्श अन् सुरू व्हायचा मूक संवाद. तब्बल २४ महिने हा स्रेहसंवाद चालला. पानगळ अन् पालवी !आता उन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. एकीकडे पानगळ सुरू आहे अन् दुसरीकडे चैत्राच्या नवचैतन्याची पालवीही फुटत आहे. मात्र, आजीचे आप्तस्वकीय तिला घेण्यासाठी येण्याची आशा मावळली आहे. त्यात आजीच्या रूपातील पिकले पान कधीही गळू शकते याचे संकेत मिळत आहे. असे काही झाले तर आजी तशीच पडून राहू नये, अशी चिंता मल्हारला सतावू लागली. तसे होऊ नये म्हणून विचारमंथनही सुरू झाले. पिकल्या पानाला व्यवस्थित आधार देण्याचे अनेक पर्याय पुढे आले. त्यानुसार पोलीस लाईनजवळच्या मदर टेरेसा ‘शांती भवनात (वृध्दाश्रमात) बोलणी झाली अन् दोन दिवसांपूर्वी आजीला तेथे पोहचवण्यात आले. आजीसारखेच अनेक जीव तेथे आयुष्याची सायंकाळ घालवत आहे. कित्येकांना आप्त नसल्याने शांती भवनात यावे लागले आहे. मात्र, कित्येकांचे आप्त असूनही त्यांना येथे राहावे लागत आहे. फारशा गरजा नाही, केवळ दोन वेळचा घासतुकडा अन् चहा एवढीच त्यांची घरच्यांकडून अपेक्षा. आप्तांकडून चार प्रेमाचे शब्द मिळावेत, नातवंडांचे बोबडे बोल ऐकायला, त्यांचे कोडकौतुक बघायला मिळावे यासाठी आसुसलेली ही मंडळी म्हणूनच घर सोडायला तयार नसतात. मात्र, जाणिवा बोथट झालेल्या कित्येक आप्तांनी आजीसारख्या अनेकांना येथे जाणीवपूर्वकच आणून सोडले आहे. आजीचीही त्यात भर पडली आहे. मात्र, तिला येथे आणून सोडण्यामागचा उद्देश पवित्र आहे. उघड्यावर बेवारसासारखे जगणे नशिबी आलेल्या आजीला बेवारस मरणे वाट्याला येऊ नये म्हणून मल्हारने तिला येथे आणून सोडले आहे. रक्ताच्या नातेवाईकांची साथ नसली तरी ‘मल्हार‘च्या आधाराने आजीचे उरलेले आयुष्य ‘जेजुरी’ झाले आहे. आणखी एक मोठेपणामल्हारचे सहकारी खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत आहेत. स्मृतिभ्रंश झालेली इंदूर (मध्यप्रदेश) मधील आजारी वृद्धा महिनाभर मेयोत पडून होती. तहसील पोलीस ठाण्यातून ही माहिती कळल्यानंतर मल्हारचे सहकारी धावले. तिचे खाणेपिणे, शुश्रूषा करतानाच महिनाभर सलग प्रयत्न करून त्यांनी तिच्या नातेवाईकांचा नाव, पत्ता शोधला. त्यांच्याशी संपर्क करून तीन आठवड्यांपूर्वी तिला सुखरूप इंदूरला तिच्या मुलाच्या घरी पोहोचवण्यास मदत केली. ही आणि अशी अनेक चांगली कामे त्यांनी आतापावेतो केली आहे. मात्र, प्रसिद्धीविमुख राहूनच ही मंडळी कार्यरत आहे. मल्हारचा हा आणखी एक मोठेपणा आहे.