शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बार्टीचे पुण्याला झुकते माफ, नागपूरवर अन्याय; राज्यसेवा प्रशिक्षण वर्गाची निविदा रद्द

By आनंद डेकाटे | Updated: January 19, 2024 15:41 IST

ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात एमपीएससी राज्यसेवेचे सुरू झालेले प्रशिक्षण सप्टेंबर २०२३ संपुष्टात आले.

नागपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने राज्यसेवेत यावेत, या उद्देशाने बार्टीतर्फे एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. पुणे, नाशिक व नागपूर या विभागात प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत विविध प्रशिक्षण संस्थेच्यावतीने प्रशिक्षण दिले जात होते. परंतु यंदा नागपूरच्या प्रशिक्षण वर्गाची निविदाच रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे विभागातील विद्यार्थ्यांची संख्या दोनशेवरून एक हजार करण्यात आली आणि नाशिकची विद्यार्थ्यांची संख्याही ३०० इतकी करण्यात आली आहे. एकूणच बार्टीतर्फे पुण्याला झुकते माफ देत नागपूरसह विदर्भावरच अन्याय करण्यात येत असल्याचे दिसून येते.

ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात एमपीएससी राज्यसेवचे सुरू झालेले प्रशिक्षण सप्टेंबर २०२३ संपुष्टात आले. त्यानंतर लगेच ऑक्टोंबर २०२३ ला नवीन प्रशिक्षण वर्ग सुरू करणे अपेक्षित होते पण सप्टेंबर २०२३ ला बार्टीद्वारे नागपूर एमपीएससी राज्यसेवेची प्रशिक्षण वर्गासाठी निविदा नव्याने काढण्यात आली तसेच निविदेची पूर्ण प्रक्रिया राबविण्यात सुद्धा आली फक्त संस्था निवड होणे बाकी होते. असे असतांना सप्टेंबर २०२३ मध्ये काढण्यात आलेल्या निविदेला १७ जानेवारी २०२४ मध्ये कोणतेही कारण नसतांना रद्द करण्यात आले. त्याच धर्तीवर नाशीक व पुणे येथे सुद्धा सप्टेंबर मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात पुणे व नाशिक येथे नोव्हेंबर महिण्यात नविन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले.

प्रशिक्षण वर्गाची तिनही विभागात प्रत्येकी संख्या २०० प्रमाणे देण्यात आली होती. पण विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता बार्टीने पुणे विभागाला १००० प्रशिक्षणार्थी तसेच नाशिक विभागात ३०० प्रशिक्षणार्थीची निवड केली असे असतांना ज्या नागपूर ५०० च्या जवळपास प्रशिक्षणार्थी अपेक्षित होते त्याच नागपूर विभागाची निविदा का रद्द करण्यात आली हा प्रश्न उपस्थित होत आहे. एकतर एमपीएससी आयोगाच्या वेळापत्रकानुसार एप्रिल २०२४ मध्ये पूर्व परीक्षा नियोजित असून ऑगस्टमध्ये मुख्य परीक्षा होणार आहेत. असे असताना नागपूर विभागाला दूर्लक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होत आहे.

बार्टीतर्फे नेहमी विदर्भातील प्रशिक्षणार्थीना दूर्लक्षित करण्यात येते. यामागची भूमीका काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारीच एमपीएससीचा निकाल लागला. यात नागपूरच्या मुलांनी मोठ्या प्रमाणावर यश संपादित केले. तेव्हा राज्य शासनाने या संदर्भात जातीने दखल घेऊन रद्द करण्यात आलेले प्रशिक्षण तत्काळ सुरू करण्याचे आदेश देऊन विदर्भातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असं मानव अधिकार संरक्षण मंचाचे सचिव आशिष फुलझेले म्हणाले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाnagpurनागपूर