शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बार्टीचे पुण्याला झुकते माफ, नागपूरवर अन्याय; राज्यसेवा प्रशिक्षण वर्गाची निविदा रद्द

By आनंद डेकाटे | Updated: January 19, 2024 15:41 IST

ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात एमपीएससी राज्यसेवेचे सुरू झालेले प्रशिक्षण सप्टेंबर २०२३ संपुष्टात आले.

नागपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने राज्यसेवेत यावेत, या उद्देशाने बार्टीतर्फे एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. पुणे, नाशिक व नागपूर या विभागात प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत विविध प्रशिक्षण संस्थेच्यावतीने प्रशिक्षण दिले जात होते. परंतु यंदा नागपूरच्या प्रशिक्षण वर्गाची निविदाच रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे विभागातील विद्यार्थ्यांची संख्या दोनशेवरून एक हजार करण्यात आली आणि नाशिकची विद्यार्थ्यांची संख्याही ३०० इतकी करण्यात आली आहे. एकूणच बार्टीतर्फे पुण्याला झुकते माफ देत नागपूरसह विदर्भावरच अन्याय करण्यात येत असल्याचे दिसून येते.

ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात एमपीएससी राज्यसेवचे सुरू झालेले प्रशिक्षण सप्टेंबर २०२३ संपुष्टात आले. त्यानंतर लगेच ऑक्टोंबर २०२३ ला नवीन प्रशिक्षण वर्ग सुरू करणे अपेक्षित होते पण सप्टेंबर २०२३ ला बार्टीद्वारे नागपूर एमपीएससी राज्यसेवेची प्रशिक्षण वर्गासाठी निविदा नव्याने काढण्यात आली तसेच निविदेची पूर्ण प्रक्रिया राबविण्यात सुद्धा आली फक्त संस्था निवड होणे बाकी होते. असे असतांना सप्टेंबर २०२३ मध्ये काढण्यात आलेल्या निविदेला १७ जानेवारी २०२४ मध्ये कोणतेही कारण नसतांना रद्द करण्यात आले. त्याच धर्तीवर नाशीक व पुणे येथे सुद्धा सप्टेंबर मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात पुणे व नाशिक येथे नोव्हेंबर महिण्यात नविन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले.

प्रशिक्षण वर्गाची तिनही विभागात प्रत्येकी संख्या २०० प्रमाणे देण्यात आली होती. पण विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता बार्टीने पुणे विभागाला १००० प्रशिक्षणार्थी तसेच नाशिक विभागात ३०० प्रशिक्षणार्थीची निवड केली असे असतांना ज्या नागपूर ५०० च्या जवळपास प्रशिक्षणार्थी अपेक्षित होते त्याच नागपूर विभागाची निविदा का रद्द करण्यात आली हा प्रश्न उपस्थित होत आहे. एकतर एमपीएससी आयोगाच्या वेळापत्रकानुसार एप्रिल २०२४ मध्ये पूर्व परीक्षा नियोजित असून ऑगस्टमध्ये मुख्य परीक्षा होणार आहेत. असे असताना नागपूर विभागाला दूर्लक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होत आहे.

बार्टीतर्फे नेहमी विदर्भातील प्रशिक्षणार्थीना दूर्लक्षित करण्यात येते. यामागची भूमीका काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारीच एमपीएससीचा निकाल लागला. यात नागपूरच्या मुलांनी मोठ्या प्रमाणावर यश संपादित केले. तेव्हा राज्य शासनाने या संदर्भात जातीने दखल घेऊन रद्द करण्यात आलेले प्रशिक्षण तत्काळ सुरू करण्याचे आदेश देऊन विदर्भातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असं मानव अधिकार संरक्षण मंचाचे सचिव आशिष फुलझेले म्हणाले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाnagpurनागपूर