शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बार्टीचे पुण्याला झुकते माफ, नागपूरवर अन्याय; राज्यसेवा प्रशिक्षण वर्गाची निविदा रद्द

By आनंद डेकाटे | Updated: January 19, 2024 15:41 IST

ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात एमपीएससी राज्यसेवेचे सुरू झालेले प्रशिक्षण सप्टेंबर २०२३ संपुष्टात आले.

नागपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने राज्यसेवेत यावेत, या उद्देशाने बार्टीतर्फे एमपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. पुणे, नाशिक व नागपूर या विभागात प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत विविध प्रशिक्षण संस्थेच्यावतीने प्रशिक्षण दिले जात होते. परंतु यंदा नागपूरच्या प्रशिक्षण वर्गाची निविदाच रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे विभागातील विद्यार्थ्यांची संख्या दोनशेवरून एक हजार करण्यात आली आणि नाशिकची विद्यार्थ्यांची संख्याही ३०० इतकी करण्यात आली आहे. एकूणच बार्टीतर्फे पुण्याला झुकते माफ देत नागपूरसह विदर्भावरच अन्याय करण्यात येत असल्याचे दिसून येते.

ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात एमपीएससी राज्यसेवचे सुरू झालेले प्रशिक्षण सप्टेंबर २०२३ संपुष्टात आले. त्यानंतर लगेच ऑक्टोंबर २०२३ ला नवीन प्रशिक्षण वर्ग सुरू करणे अपेक्षित होते पण सप्टेंबर २०२३ ला बार्टीद्वारे नागपूर एमपीएससी राज्यसेवेची प्रशिक्षण वर्गासाठी निविदा नव्याने काढण्यात आली तसेच निविदेची पूर्ण प्रक्रिया राबविण्यात सुद्धा आली फक्त संस्था निवड होणे बाकी होते. असे असतांना सप्टेंबर २०२३ मध्ये काढण्यात आलेल्या निविदेला १७ जानेवारी २०२४ मध्ये कोणतेही कारण नसतांना रद्द करण्यात आले. त्याच धर्तीवर नाशीक व पुणे येथे सुद्धा सप्टेंबर मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात पुणे व नाशिक येथे नोव्हेंबर महिण्यात नविन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले.

प्रशिक्षण वर्गाची तिनही विभागात प्रत्येकी संख्या २०० प्रमाणे देण्यात आली होती. पण विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता बार्टीने पुणे विभागाला १००० प्रशिक्षणार्थी तसेच नाशिक विभागात ३०० प्रशिक्षणार्थीची निवड केली असे असतांना ज्या नागपूर ५०० च्या जवळपास प्रशिक्षणार्थी अपेक्षित होते त्याच नागपूर विभागाची निविदा का रद्द करण्यात आली हा प्रश्न उपस्थित होत आहे. एकतर एमपीएससी आयोगाच्या वेळापत्रकानुसार एप्रिल २०२४ मध्ये पूर्व परीक्षा नियोजित असून ऑगस्टमध्ये मुख्य परीक्षा होणार आहेत. असे असताना नागपूर विभागाला दूर्लक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होत आहे.

बार्टीतर्फे नेहमी विदर्भातील प्रशिक्षणार्थीना दूर्लक्षित करण्यात येते. यामागची भूमीका काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारीच एमपीएससीचा निकाल लागला. यात नागपूरच्या मुलांनी मोठ्या प्रमाणावर यश संपादित केले. तेव्हा राज्य शासनाने या संदर्भात जातीने दखल घेऊन रद्द करण्यात आलेले प्रशिक्षण तत्काळ सुरू करण्याचे आदेश देऊन विदर्भातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असं मानव अधिकार संरक्षण मंचाचे सचिव आशिष फुलझेले म्हणाले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाnagpurनागपूर