शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव सप्टेंबरपासून

By आनंद डेकाटे | Updated: July 31, 2024 17:07 IST

वर्षभर कार्यक्रम, रिपब्लिकन चळवळीचा आढावा घेणारा गौरव ग्रंथ निघणार : राष्ट्रीय स्तरावर साजरा होणार महोत्सव

नागपूर : आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचे येत्या २५ सप्टेंबरपासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्याच्या उद्देशाने २५ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव राबविण्यात येणार आहे. अतिशय व्यापक आणि राष्ट्रीय स्तरावर हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय नियोजन सभेत घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात होते. तर ज्येष्ठ रिपब्लिकन नेते प्रा. अशोक गोडघाटे, आंबेडकरी साहित्यिक व समीक्षक ताराचंद खांडेकर, कवी इ.मो. नारनवरे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य भदंत नाग दीपंकर आणि माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘संविधान संवर्धन शिखर परिषद’च्या आयोजनाने या जन्मशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ होणार असून या परिषदेत राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनातज्ञ, संशोधक आणि विचारवंत सहभागी होतील. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे तसेच रिपब्लिकन चळवळीचा आढावा घेणारा गौरव ग्रंथ आणि स्मरणिका प्रकाशित करण्याचेही निश्चित करण्यात आले. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान यांच्या पालकत्वाखाली आयोजित होणाऱ्या या जन्मशताब्दी महोत्सवात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटना सहभागी झाल्या असून या महोत्सवादरम्यान महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात येतील.प्रास्ताविक एन.टी. मेश्राम यांनी केले. संचालन भीमराव वैद्य यांनी केले. अशोक कोल्हटकर यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर