शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

बाप्पा घेऊन आले पाऊस

By admin | Updated: September 18, 2015 11:12 IST

आराध्य विघ्नहर्त्याला स्थापन करण्याचा उत्साह दरवर्षीच दांडगा असतो. श्री गणेश म्हणजे साक्षात विघ्नहर्ता.

पावसातही मिरवणुकीला उधाण : ढोल भिजले पण वाजलेनागपूर : आराध्य विघ्नहर्त्याला स्थापन करण्याचा उत्साह दरवर्षीच दांडगा असतो. श्री गणेश म्हणजे साक्षात विघ्नहर्ता. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना विघ्नहर्ता येतानाच थेट पाऊस घेऊन आला. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गणेश स्थापनेच्या वेळेपर्यंत उसंतच घेतली नाही. यामुळे धरणी शांत झाली आणि बळीराजाही सुखावला. बळीराजाच्या चेहऱ्यावर बाप्पाने येतानाच आनंद निर्माण केला. पण मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सकाळ झाल्यावरही कोसळत असल्याने गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता पसरली. पण दुपारी पावसाचा जोर कमी झाला आणि गणेशमूर्तींचा घरोघरी प्रवास सुरू झाला. सकाळपासूनच पावसाने जराही उसंत न घेतल्याने गणेशभक्तांना घराबाहेर पडणे कठीण झाले. रेनकोट घालून बाहेर पडल्यावरही मातीची गणेशमूर्ती पावसात आणणे शक्य नव्हते. काहींनी सकाळी कारमधून श्रीं.ची मूर्ती घरी आणली. पण गणेश पूजनाचे साहित्य आणण्यासाठीही पावसामुळे समस्या निर्माण झाली होती. भद्रा काळातही गणेशाची स्थापना करण्यात काहीच गैर नव्हते कारण श्री साक्षात सारेच विघ्न दूर करणारा होता. पण अनेकांनी भद्रा काळ संपल्यावर दुपारी ११ नंतरच स्थापना करण्याचे ठरविले. दुपारी ११.४५च्या सुमारास पाऊस थांबला आणि भाविक चौकाचौकात पूजेचे साहित्य, फुले आणि नोंदणी केलेल्या गणेशमूर्ती घेण्यासाठी बाहेर पडल्याने शहरभरातील बाजारात अचानक गर्दी झाली. पाऊस असल्याने सक्करदरा चौक, गोकुळपेठ, इतवारी, महाल, मानेवाडा रोड, अयोध्यानगर, म्हाळगीनगर चौक, प्रतापनगर चौक, खामला येथील गणेश पूजनाची आणि गणेशमूर्तीची दुकाने ग्राहकांअभावी ओस पडली होती पण पावसाचा जोर कमी झाल्यावर सर्वच ठिकाणी गर्दी झाली.