शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बाप्पा घेऊन आले पाऊस

By admin | Updated: September 18, 2015 11:12 IST

आराध्य विघ्नहर्त्याला स्थापन करण्याचा उत्साह दरवर्षीच दांडगा असतो. श्री गणेश म्हणजे साक्षात विघ्नहर्ता.

पावसातही मिरवणुकीला उधाण : ढोल भिजले पण वाजलेनागपूर : आराध्य विघ्नहर्त्याला स्थापन करण्याचा उत्साह दरवर्षीच दांडगा असतो. श्री गणेश म्हणजे साक्षात विघ्नहर्ता. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना विघ्नहर्ता येतानाच थेट पाऊस घेऊन आला. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गणेश स्थापनेच्या वेळेपर्यंत उसंतच घेतली नाही. यामुळे धरणी शांत झाली आणि बळीराजाही सुखावला. बळीराजाच्या चेहऱ्यावर बाप्पाने येतानाच आनंद निर्माण केला. पण मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस सकाळ झाल्यावरही कोसळत असल्याने गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता पसरली. पण दुपारी पावसाचा जोर कमी झाला आणि गणेशमूर्तींचा घरोघरी प्रवास सुरू झाला. सकाळपासूनच पावसाने जराही उसंत न घेतल्याने गणेशभक्तांना घराबाहेर पडणे कठीण झाले. रेनकोट घालून बाहेर पडल्यावरही मातीची गणेशमूर्ती पावसात आणणे शक्य नव्हते. काहींनी सकाळी कारमधून श्रीं.ची मूर्ती घरी आणली. पण गणेश पूजनाचे साहित्य आणण्यासाठीही पावसामुळे समस्या निर्माण झाली होती. भद्रा काळातही गणेशाची स्थापना करण्यात काहीच गैर नव्हते कारण श्री साक्षात सारेच विघ्न दूर करणारा होता. पण अनेकांनी भद्रा काळ संपल्यावर दुपारी ११ नंतरच स्थापना करण्याचे ठरविले. दुपारी ११.४५च्या सुमारास पाऊस थांबला आणि भाविक चौकाचौकात पूजेचे साहित्य, फुले आणि नोंदणी केलेल्या गणेशमूर्ती घेण्यासाठी बाहेर पडल्याने शहरभरातील बाजारात अचानक गर्दी झाली. पाऊस असल्याने सक्करदरा चौक, गोकुळपेठ, इतवारी, महाल, मानेवाडा रोड, अयोध्यानगर, म्हाळगीनगर चौक, प्रतापनगर चौक, खामला येथील गणेश पूजनाची आणि गणेशमूर्तीची दुकाने ग्राहकांअभावी ओस पडली होती पण पावसाचा जोर कमी झाल्यावर सर्वच ठिकाणी गर्दी झाली.