शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

बांगलादेशी घुसखोरांचे सर्वत्र तगडे ‘नेटवर्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:40 IST

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घुसखोरी करून भारतात शिरलेल्या बांगलादेशींनी मध्य भारतात ठिकठिकाणी उधळी लावली आहे. नागपूरला येण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या करून अनेक ठिकाणी डेरा टाकलेला आहे. भारतात बिनबोभाट बेकायदा वास्तव्य करून या घुसखोरांनी ठिकठिकाणच्या प्रशासनासोबत नागरिकांशीही बनवाबनवी केली आहे. त्यामुळे घुसखोरांच्या नेटवर्कची पाळेमुळे शोधून काढण्याचे तपास यंत्रणांपुढे आव्हान निर्माण ...

ठळक मुद्देअनेक ठिकाणी वास्तव्य पाळेमुळे शोधून काढण्याचे तपास यंत्रणांपुढे आव्हान

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घुसखोरी करून भारतात शिरलेल्या बांगलादेशींनी मध्य भारतात ठिकठिकाणी उधळी लावली आहे. नागपूरला येण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या करून अनेक ठिकाणी डेरा टाकलेला आहे. भारतात बिनबोभाट बेकायदा वास्तव्य करून या घुसखोरांनी ठिकठिकाणच्या प्रशासनासोबत नागरिकांशीही बनवाबनवी केली आहे. त्यामुळे घुसखोरांच्या नेटवर्कची पाळेमुळे शोधून काढण्याचे तपास यंत्रणांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, या घुसखोरांनी पोलीस तपासात दिलेल्या माहितीची गिट्टीखदान पोलीस, गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि गुप्तचर यंत्रणा आपापल्या पद्धतीने शहानिशा करीत आहेत.नागपुरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर वास्तव्याला असल्याचे कळल्यानंतर विशेष शाखेने तब्बल दोन महिने कसून तपास केला. त्यानंतर २३ आॅगस्टला गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करणारे रॉकी विमल बरुवा ऊर्फ रॉकी चौधरी (वय २६, मूळ पत्ता शहाबीनगर, बरुआपारा, रांगोनिया, जि. चिंत्ताग्राम, बांगलादेश), सुदर्शन नयन बरुवा ऊर्फ नयनसुमन तालुकदार अनंतमोहन (वय ३०, रा. शेगाटा धोपाचुरी, त. शतकानी. जि. चट्टाग्राम, बांगलादेश), विप्लब शिशिर बरुवा ऊर्फ विप्लब शिशिर तालुकदार (वय ३४, रा. शिरकुब, मोकिंचर माब्कली, जि. खटकग्राम, बांगलादेश) आणि प्रदीप चित्तरंजन बरुवा ऊर्फ नंदप्रिय तपन बरुवा (वय २८, रा. पुट्टीविला एमसरहाट, लोहागडा, जि. चट्टग्राम, बांगलादेश) या चौघांना अटक केली. ते सुरेंद्रगडमधील गांधी पुतळ्याजवळच्या दीनानाथ निखारे यांच्याकडे भाड्याने राहत होते. तीन दिवस त्यांची विशेष शाखेने कसून चौकशी केल्यानंतर त्यांना गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली केले. ते सध्या गिट्टीखदान पोलिसांच्या कस्टडीत आहेत. त्यांच्याकडून अनेक धक्कादायक खुलासेवजा माहिती उघड झाली आहे. या घुसखोरांकडे मतदार ओळखपत्रापासून आधारकार्डपर्यंत सर्वच कागदपत्रे आहेत. त्यावरून त्यांनी ते बांगलादेशी घुसखोर नसून भारतीय नागरिक असल्याचा दिखावा निर्माण करण्यात यश मिळवले होते.त्यांनी महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगालसह अन्य राज्यात नेटवर्क निर्माण केले. नागपूरपूर्वी त्यांनी अनेक शहरात वास्तव्य केले आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वप्रथम हे कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे राहिले. तेथून त्यांनी रायपूर (छत्तीसगड) गाठले. तेथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर त्यांनी थेट मुंबईला धाव घेतली. मुंबईत बरेच दिवस काढल्यानंतर ते नागपुरात आले. अशाप्रकारे तीन राज्याच्या राजधानींच्या महानगरात त्यांनी बराच कालावधी मुक्काम ठोकला होता. त्या ठिकाणच्या वास्तव्यात त्यांनी काय उपद्रव केला, ते पुढे आलेले नाही. आम्ही धर्मप्रचारकाचे काम करीत होतो, असे ते पोलिसांना सांगत आहेत. मात्र, त्यांच्या कथनात किती सत्यता आहे, हा तपासाचा विषय ठरला आहे. गिट्टीखदान पोलीस, विशेष शाखा आणि गुप्तचर यंत्रणा त्याची स्वतंत्र चौकशी करीत आहेत.

खाण्यापिण्याचे वांदे अन् हवाई सफरचार दिवसांच्या पोलीस कस्टडीत उल्लेखित घुसखोरांनी ‘बांगलादेशातून आम्ही रोजगाराच्या शोधात पळून आलो. आमचे तेथे खाण्यापिण्याचे वांदे होते’, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. घातलेल्या कपड्यांसह पळून आलेल्या या घुसखोरांनी वेगवेगळ्या वेळी थायलंड, मलेशिया, सिंगापूर यासारख्या देशात विदेशी सफर कशी केली. ही हवाई सफर करण्याएवढी त्यांची आर्थिक स्थिती कशी भक्कम झाली, असा प्रश्न आहे. या प्रश्नासह घुसखोरांनी कुठे कुठे कशा पद्धतीने उधळी लावली, त्याचाही शोध घेण्याचे तपास यंत्रणांपुढे आव्हान ठाकले आहे.

बाकीच्यांचे काय?सूत्रांच्या माहितीनुसार, हे केवळ चौघेच नव्हे तर असे अनेक बांगलादेशी घुसखोर नागपुरात बिनबोभाट वास्तव्य करीत आहेत. या चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्यासारखेच ऐषोआरामाचे जीवन जगणारे नागपुरातून पळून गेले. काहींनी आपले ठिकाण बदलवले. दरम्यान, या व अशाच प्रकारे अनेकांनी बनावट कागदपत्रे, पासपोर्ट तयार करून सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर विविध राज्याच्या प्रशासकीय यंत्रणांचीही फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Courtन्यायालय