शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बेंगळुरू धावपट्टी बंद, नागपुरात विमान आठ तास अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 21:53 IST

बेंगळुरू येथे काही तासांसाठी धावपट्टी बंद करण्यात आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ६ वाजता बेंगळुरूला जाणाऱ्या गो एअरच्या जी-८ ८११ विमानाने आठ तास उशिरा अर्थात दुपारी १.४५ वाजता उड्डाण भरले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेंगळुरू येथे काही तासांसाठी धावपट्टी बंद करण्यात आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ६ वाजता बेंगळुरूला जाणाऱ्या गो एअरच्या जी-८ ८११ विमानाने आठ तास उशिरा अर्थात दुपारी १.४५ वाजता उड्डाण भरले. सोमवारी बेंगळुरू येथे मुसळधार पाऊस आणि रन-वे क्लोजरमुळे उड्डाणाला उशीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तब्बल आठ तास उशीर झाल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. गो एअरचे सकाळी ६ वाजता बेंगळुरूला जाणारे विमान रात्री नागपुरात पार्किंगला असते.नागपूर-मुंबई विमान भोपाळमार्गेएअर इंडियाचे नागपूर-मुंबई विमान एआय-६२७ चार दिवस भोपाळमार्गे जाणार आहे, पण प्रवाशांना नागपूर ते भोपाळकरिता तिकीट देणे बंद आहे. तसेच मुंबईहून नागपूरला येणाऱ्या याच विमानात भोपाळला जाण्याकरिता मुंबईतच भोपाळकरिता बुकिंग देण्यात आले.एअर इंडियाचे विमान नागपुरातून मुंबईकडे सकाळी ८ वाजता जाते. पण सध्या चार दिवस थेट मुंबईला न जाता भोपाळमार्गे जाणार आहे. हे विमान ४५ मिनिटात भोपाळला पोहोचते. त्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ प्रवास करावा लागत आहे. हज यात्रेकरिता शेड्युलची तयारी आणि काही विमाने ग्राऊंड असल्यामुळे कंपनीला अशी कवायत करावी लागत असल्याची माहिती एअर इंडियाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :GoAirगो-एअरDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर