शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

हिरवळीच्या नावाखाली नाल्याच्या पात्रात बांबूची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:39 IST

विकासाच्या नावाखाली शहरात अवैध वृक्षतोड सुरू असतानाच हिरवळ व वृक्षलागवडीच्या नावाखाली नाल्याच्या पात्रात झाडे लावण्याचा प्रताप उद्यान विभागाने हाती घेतला आहे. लक्ष्मीनगर झोनमधील खामला भागातील शास्त्री ले-आऊ ट येथील नाल्याच्या पात्रात बांबूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. दोन-चार वर्षात बांबूची झाडे वाढल्यानंतर नाल्याच्या प्रवाहात बाधा निर्माण होणार आहे. पूर आल्यास बांबूच्या झाडामुळे आजूबाजूच्या वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण होणार आहे. तसेच घाणीमुळे डासांचाही प्रकोप वाढला आहे. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांनी याला विरोध दर्शविल्यानतंरही महापालिकेच्या उद्यान विभागाने येथे बांबूची झाडे लावली आहेत.

ठळक मुद्देउद्यान विभागाचा प्रताप : पुराचे पाणी वस्त्यात शिरण्याचा धोका : घाणीमुळे आजूबाजूचे नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकासाच्या नावाखाली शहरात अवैध वृक्षतोड सुरू असतानाच हिरवळ व वृक्षलागवडीच्या नावाखाली नाल्याच्या पात्रात झाडे लावण्याचा प्रताप उद्यान विभागाने हाती घेतला आहे. लक्ष्मीनगर झोनमधील खामला भागातील शास्त्री ले-आऊ ट येथील नाल्याच्या पात्रात बांबूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. दोन-चार वर्षात बांबूची झाडे वाढल्यानंतर नाल्याच्या प्रवाहात बाधा निर्माण होणार आहे. पूर आल्यास बांबूच्या झाडामुळे आजूबाजूच्या वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण होणार आहे. तसेच घाणीमुळे डासांचाही प्रकोप वाढला आहे. विशेष म्हणजे परिसरातील नागरिकांनी याला विरोध दर्शविल्यानतंरही महापालिकेच्या उद्यान विभागाने येथे बांबूची झाडे लावली आहेत.शास्त्रीनगर भागातून वाहणारा हा नाला पुढे स्वावलंबीनगर, जीवनछायानगर, रवींद्रनगर, जयप्रकाशनगर व बेलतरोडी भागात पोहरा नदीला मिळतो. या नाल्यात परिसरातील वस्त्यातील सिवरेज प्रक्रिया न करता सोडले जाते. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होतो. त्यातच आता बांबूची लागवड करण्यात आल्याने हा त्रास आणखी वाढणार असल्याचे स्थानिक रहिवासी रवींद्रसिंग खुराणा डॉ. मोहन देशपांडे यांनी सांगितले. नाल्याच्या परिसरातील वस्त्यातील सिवरेज थेट नाल्यात न सोडता गडर लाईनच्या माध्यमातून ट्रक लाईनला जोडण्याची नागरिकांची मागणी आहे. लाईन टाकण्यात आली परंतु अद्याप कार्यान्वित झालेली नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली.पुराच्या पाण्यामुळे जमीन वाहू नये यासाठी बांबूची झाडे लावली जातात. परंतु नाल्याला दोन्ही बाजूला संरक्षण भिंत असताना जमीन वाहून जाण्याचा धोका नाही. उलट बांबूची झाडे लावल्याने नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार आहे. त्यातच नाल्यात सिवरेज सोडले जात असल्याने पाण्याचा प्रवाह थांबल्यास आजूबाजूच्या लोकांचा त्रास वाढणार आहे.पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील नदी, नाले सफाई अभियान राबविले जाते. नदी-नाल्यातील गाळ काढण्यासोबतच पात्रातील झाडे, झुडपे तोडून पाण्याच्या प्रवाहातील अडसर दूर केला जातो. दुसरीकडे उद्यान विभागानेच नाल्याच्या पात्रात बांबूची झाडे लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शहरातील नदी-नाले ओव्हर फ्लो झाले होते. यात शास्त्रीनगर येथील नाल्याचाही समावेश होता. याची जाणीव असतानाही नाल्याच्या पात्रात बांबूची लागवड करण्यात आली आहे.डासांमुळे नागरिक त्रस्तनागपूर शहर व जिल्ह्यात स्क्रब टायफस आजारासोबतच डेंग्यूचे रुग्ण वाढले आहे. परिसरात स्वच्छता नसल्याने, पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतो. शास्त्रीनगर येथील नाल्यात पाणी साचून असते. त्यात बांबूच्या झाडांची भर पडली आहे. नाल्यात जंतुनाशक औषधाची फवारणी केली जात नाही. डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने परिसरातील नागरिक डासांच्या त्रासामुळे त्रस्त आहेत.नाल्यातून पावसाचेच पाणी वाहून जावेनाल्यात सोडण्यात येणारे सिवरेज रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घ्यावी. नाल्यातून फक्त पावसाचेच पाणी वाहून जाईल, अशी परिस्थिती निर्माण करावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. परंतु प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती रवींद्र सिंग खुराणा व डॉ. मोहन देशपांडे यांनी दिली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर