शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्लाेबल वार्मिंगच्या समस्येवर बांबू हे रामबाण औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

नागपूर : ग्लाेबल वार्मिंगमुळे येत्या काळात पृथ्वीवरील तापमान २ अंशाने वाढेल आणि भारतातील समुद्राजवळ असलेले मुंबईसह १२ शहरे समुद्राच्या ...

नागपूर : ग्लाेबल वार्मिंगमुळे येत्या काळात पृथ्वीवरील तापमान २ अंशाने वाढेल आणि भारतातील समुद्राजवळ असलेले मुंबईसह १२ शहरे समुद्राच्या पाण्यात बुडतील, असा धक्कादायक रिपाेर्ट आयपीसीसीने नुकताच दिला आहे. प्रचंड वाढलेला इंधनाचा वापर आणि औष्णिक वीज केंद्रातील कार्बनचे उत्सर्जन हे कारणीभूत ठरले आहे. या भीषण समस्येवर बांबूची लागवड हा रामबाण उपाय ठरू शकताे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

माजी आमदार व बांबू शेतीचे प्रणेते पाशा पटेल यांनी ग्लाेबल वार्मिंगची समस्या साेडविण्यासाठी बांबू लागडवडीचे महत्त्व विषद केले आहे. इंटरनॅशनल पॅनल ऑफ क्लायमेट चेंजच्या अहवालानुसार हवेतील कार्बन वाढले असून तापमान वाढले आहे. हे कमी करण्यासाठी काेळशापासून वीज निर्मिती बंद करावी लागेल आणि पेट्राेल, डिझेल या इंधनाचा वापर कमी करावा लागणार आहे. जमिनीच्या पाेटातून कार्बन काढणे, ही गाेष्ट मानवी विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. यासाठी बांबू हा माेठा पर्याय ठरू शकताे, असा विश्वास पाशा पटेल यांनी व्यक्त केला.

असे आहेत बांबूचे फायदे

- बांबूपासून इथेनाॅलची निर्मिती हाेते. हे इथेनाॅल पेट्राेल, डिझेलचा पर्याय आहे. एक लिटर पेट्राेल जाळल्याने ३ किलाे कार्बन उत्सर्जन हाेते.

- औष्णिक वीज केंद्रात वीज निर्मितीसाठी दगडी काेळशाचा वापर बंद करून बांबूचा वापर उत्तम पर्याय आहे. बांबूचा उष्मांक व काेळशाचा उष्मांक सारखाच आहे.

- बांबूचे वृक्ष तुलनेत ३० टक्के अधिक कार्बन नष्ट करते.

- माणसाला एका वर्षात २८० किलाे ऑक्सिजनची गरज पडते. बांबूचे एक झाड वर्षाला ३२० किलाे ऑक्सिजन साेडते.

- बांबूपासून तांदूळ तयार हाेतो. फर्निचर, इमारती, कापड, लाेणचे, मुरब्बा व इतर अनेक वस्तू तयार हाेतात.

- बांबू प्लास्टिकला, लाेखंडाला व सिमेंटलाही पर्याय ठरताे. चंद्रपूरच्या चिचपल्ली गावात शासनाने १०० काेटीची बांबूची इमारत तयार केली आहे.

- बांबू लागवड वाढली तर वनाच्छादनाचा टक्का वाढेल. शेतकऱ्यांना लाभ मिळेल, राेजगारही वाढेल.

२०२२ मध्ये इथेनाॅल रिफायनरी

आसामच्या लुमालीगड येथे भारत, फिनलॅंड व नेदरलॅंड या देशांच्या सहकार्याने ३००० काेटींची गुंतवणूक करून बांबूपासून इथेनाॅल निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑगस्ट २०२२ पर्यंत ही बांबू इथेनाॅल रिफायनरी सुरू हाेईल, अशी शक्यता आहे.

- गडचिराेलीत बांबूपासून वीज निर्मिती

सध्या गडचिराेलीजवळ वैनगंगा नदीच्या काठावर वायुनंदन पाॅवर लिमिटेडद्वारे बांबू, धानाचा भुसा व कपाशीच्या सरकीच्या मिश्रणातून यशस्वीपणे वीज निर्मिती केली जात आहे.

तर मानवजातीच्या विनाशाला सुरुवात

इंधनाचा वापर सुरू झाला तेव्हा कार्बनचे उत्सर्जन २८० पीपीएम हाेते. गेल्या वर्षी ते ४१२ पीपीएम हाेते व यावर्षी ते ४२२ पीपीएम आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टी सामान्य ठेवायची असेल तर कार्बन उत्सर्जन २३० पीपीएम मर्यादित राहणे गरजेचे आहे. उत्सर्जन ४५० पीपीएमवर गेल्यास मानवजातीच्या विनाशाला सुरुवात हाेईल.

यावर्षी आमच्या नर्सरीमधून शेतकऱ्यांनी ३ लाख बांबू राेपांची मागणी केली आहे. बांबूची लागवड नक्कीच वाढेल. राज्य शासनाने बांबूपासून वीज निर्मिती व्यवहार्य आहे का, हे तपासण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीचा रिपाेर्ट आल्यावर माेठ्या प्रमाणात बांबूची गरज भासणार आहे. यामुळे वनाच्छादन वाढेल व शेतकऱ्यांचा फायदाही.

- पाशा पटेल, बांबू शेतीचे प्रचारक