शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

बाल्या बिनेकर हत्याकांड : पोलिसांची चुप्पी संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:45 IST

Balya Binekar murder case, Nagpur Crime Newsशहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड करणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी साधलेली चुप्पी प्रचंड संशय वाढवणारी आहे. त्यामुळे थातूरमातूर पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून पडद्यामागच्या गुन्हेगारांना साईडलाईन केले जाते की काय, अशी शंका घेतली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड करणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी साधलेली चुप्पी प्रचंड संशय वाढवणारी आहे. त्यामुळे थातूरमातूर पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून पडद्यामागच्या गुन्हेगारांना साईडलाईन केले जाते की काय, अशी शंका घेतली जात आहे.कुख्यात गुंड चेतन हजारे, रजत तांबे, असीम लुडेरकर, अनिकेत मंथापुरवार आणि भारत पंडित या पाच जणांनी अत्यंत वर्दळीच्या बोले पेट्रोल पंपाजवळच्या चौकात दिवसाढवळ्या बाल्या बिनेकरची निर्घृण हत्या केली. या गुन्ह्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे येथील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याची जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, सीताबर्डी पोलीस या हत्याकांडाचा तपास करत आहेत. आतापर्यंत सात गुन्हेगारांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी चेतन हजारे याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलीस चेतन हजारेच्या कथनावर विश्वास ठेवून चुप्पी साधून बसले आहेत. हजारेजवळ बाल्याच्या हत्येचे कारण आहे. मात्र इतर आरोपींनी गुन्ह्यात जो अमानुषपणा दाखवला, त्यातून त्यांना कशाचा सूड घ्यायचा होता, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पोलिसांजवळ त्याचे उत्तर नाही. शहरात आणि खुद्द पोलीस दलातही या गुन्ह्यात संबंधित असलेल्या संशयितांची नावे घेतली जात असताना तपास करणारे पोलिस जाणीवपूर्वक चुप्पी साधून बसले की काय, अशी शंका घेतली जात आहे.गुन्हे शाखेकडून अपेक्षाया प्रकरणातील पडद्यामागच्या सूत्रधारांना हुडकून काढण्याची कामगिरी गुन्हे शाखा बजावू शकते, अशीही जोरदार चर्चा शहरात आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे गुन्हेगारी वर्तुळात चर्चेत आलेल्या अनेक संशयितांनी आपापले मोबाईल बंद केल्यामुळे त्यांच्याभोवतीचा संशय अधिकच घट्ट झाला आहे.बाल्याचा परिवार दहशतीतया घटनेनंतर बाल्या बिनेकरचा परिवार प्रचंड दहशतीत आला असून त्याच्या पत्नीने काचीपुरा धरमपेठमधील भाड्याचे घरही खाली करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दुसरे म्हणजे, बाल्याच्या परिवारातील काही सदस्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :MurderखूनNagpur Policeनागपूर पोलीस