शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

बाल्या बिनेकर हत्याकांड : पोलिसांची चुप्पी संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:45 IST

Balya Binekar murder case, Nagpur Crime Newsशहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड करणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी साधलेली चुप्पी प्रचंड संशय वाढवणारी आहे. त्यामुळे थातूरमातूर पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून पडद्यामागच्या गुन्हेगारांना साईडलाईन केले जाते की काय, अशी शंका घेतली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड करणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी साधलेली चुप्पी प्रचंड संशय वाढवणारी आहे. त्यामुळे थातूरमातूर पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून पडद्यामागच्या गुन्हेगारांना साईडलाईन केले जाते की काय, अशी शंका घेतली जात आहे.कुख्यात गुंड चेतन हजारे, रजत तांबे, असीम लुडेरकर, अनिकेत मंथापुरवार आणि भारत पंडित या पाच जणांनी अत्यंत वर्दळीच्या बोले पेट्रोल पंपाजवळच्या चौकात दिवसाढवळ्या बाल्या बिनेकरची निर्घृण हत्या केली. या गुन्ह्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे येथील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याची जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, सीताबर्डी पोलीस या हत्याकांडाचा तपास करत आहेत. आतापर्यंत सात गुन्हेगारांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी चेतन हजारे याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलीस चेतन हजारेच्या कथनावर विश्वास ठेवून चुप्पी साधून बसले आहेत. हजारेजवळ बाल्याच्या हत्येचे कारण आहे. मात्र इतर आरोपींनी गुन्ह्यात जो अमानुषपणा दाखवला, त्यातून त्यांना कशाचा सूड घ्यायचा होता, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पोलिसांजवळ त्याचे उत्तर नाही. शहरात आणि खुद्द पोलीस दलातही या गुन्ह्यात संबंधित असलेल्या संशयितांची नावे घेतली जात असताना तपास करणारे पोलिस जाणीवपूर्वक चुप्पी साधून बसले की काय, अशी शंका घेतली जात आहे.गुन्हे शाखेकडून अपेक्षाया प्रकरणातील पडद्यामागच्या सूत्रधारांना हुडकून काढण्याची कामगिरी गुन्हे शाखा बजावू शकते, अशीही जोरदार चर्चा शहरात आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे गुन्हेगारी वर्तुळात चर्चेत आलेल्या अनेक संशयितांनी आपापले मोबाईल बंद केल्यामुळे त्यांच्याभोवतीचा संशय अधिकच घट्ट झाला आहे.बाल्याचा परिवार दहशतीतया घटनेनंतर बाल्या बिनेकरचा परिवार प्रचंड दहशतीत आला असून त्याच्या पत्नीने काचीपुरा धरमपेठमधील भाड्याचे घरही खाली करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दुसरे म्हणजे, बाल्याच्या परिवारातील काही सदस्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :MurderखूनNagpur Policeनागपूर पोलीस