शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

बाल्या बिनेकर हत्याकांड : पोलिसांची चुप्पी संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:45 IST

Balya Binekar murder case, Nagpur Crime Newsशहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड करणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी साधलेली चुप्पी प्रचंड संशय वाढवणारी आहे. त्यामुळे थातूरमातूर पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून पडद्यामागच्या गुन्हेगारांना साईडलाईन केले जाते की काय, अशी शंका घेतली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा कसलाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड करणाऱ्या बाल्या बिनेकर हत्याकांडाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी साधलेली चुप्पी प्रचंड संशय वाढवणारी आहे. त्यामुळे थातूरमातूर पद्धतीने या प्रकरणाचा तपास करून पडद्यामागच्या गुन्हेगारांना साईडलाईन केले जाते की काय, अशी शंका घेतली जात आहे.कुख्यात गुंड चेतन हजारे, रजत तांबे, असीम लुडेरकर, अनिकेत मंथापुरवार आणि भारत पंडित या पाच जणांनी अत्यंत वर्दळीच्या बोले पेट्रोल पंपाजवळच्या चौकात दिवसाढवळ्या बाल्या बिनेकरची निर्घृण हत्या केली. या गुन्ह्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे येथील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याची जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, सीताबर्डी पोलीस या हत्याकांडाचा तपास करत आहेत. आतापर्यंत सात गुन्हेगारांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी चेतन हजारे याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलीस चेतन हजारेच्या कथनावर विश्वास ठेवून चुप्पी साधून बसले आहेत. हजारेजवळ बाल्याच्या हत्येचे कारण आहे. मात्र इतर आरोपींनी गुन्ह्यात जो अमानुषपणा दाखवला, त्यातून त्यांना कशाचा सूड घ्यायचा होता, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पोलिसांजवळ त्याचे उत्तर नाही. शहरात आणि खुद्द पोलीस दलातही या गुन्ह्यात संबंधित असलेल्या संशयितांची नावे घेतली जात असताना तपास करणारे पोलिस जाणीवपूर्वक चुप्पी साधून बसले की काय, अशी शंका घेतली जात आहे.गुन्हे शाखेकडून अपेक्षाया प्रकरणातील पडद्यामागच्या सूत्रधारांना हुडकून काढण्याची कामगिरी गुन्हे शाखा बजावू शकते, अशीही जोरदार चर्चा शहरात आहे. दरम्यान, या हत्याकांडामुळे गुन्हेगारी वर्तुळात चर्चेत आलेल्या अनेक संशयितांनी आपापले मोबाईल बंद केल्यामुळे त्यांच्याभोवतीचा संशय अधिकच घट्ट झाला आहे.बाल्याचा परिवार दहशतीतया घटनेनंतर बाल्या बिनेकरचा परिवार प्रचंड दहशतीत आला असून त्याच्या पत्नीने काचीपुरा धरमपेठमधील भाड्याचे घरही खाली करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दुसरे म्हणजे, बाल्याच्या परिवारातील काही सदस्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :MurderखूनNagpur Policeनागपूर पोलीस