शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:00 IST

अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी येणार आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून शुक्रवारी रात्री जागोजागी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली.

ठळक मुद्देपोलीस सक्रिय : संशयित आणि सोशल मीडियावर विशेष नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी येणार आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून शुक्रवारी रात्री जागोजागी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली. रात्रीची गस्त वाढविण्यात आली. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील काही विशेष भागांवरही पोलिसांनी नजर रोखली आहे.संशयित व्यक्तींची नागपुरातील हजेरी आधीपासूनच चर्चेत राहिली आहे. समाजकंटकांकडून गडबड केली जाऊ शकते, अशी शंका गुप्तचर यंत्रणांकडून आधीच व्यक्त करण्यात आली आहे. संवेदनशिल स्थळांभोवती पोलिसांनी सुरक्षा कवच निर्माण केले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून नाहक वाद निर्माण करू पाहणाऱ्या उपद्रवींवरही पोलिसांनी नजर रोखली आहे. विविध जाती-धर्मातील मान्यवरांची बैठक घेऊन पोलीस आयुक्तांनी शहरातील सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, यासाठी आधीपासूनच प्रयत्न चालविले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि समाजकंटकांकडून कसला काही अनुचित प्रकार अवलंबला जात असेल, कुठे काही आक्षेपार्ह घडत असेल तर तातडीने पोलिसांना सूचित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.चिथावणीखोरांना इशाराशहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. मात्र, कुणी समाजकंटकांनी चिथावणीखोरांनी कोणत्याही प्रकारचा उपद्रव करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना दिला.

भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी     अयोध्येचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. हा निकाल कुणाच्याही बाजूने आल्यानंतर तो स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी.  अथवा निकाल आनंददायी आल्यानंतरही उन्माद करू नये, रस्त्यावर येऊन आनंद साजरा करून, इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही,  याची काळजी घ्यावी. अयोध्येच्या निकालानंतर समाजात सामंजस्य रहावे, या भावनेतून विविध हिंदुत्ववादी संघटनेने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. जेणेकरून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल. तशा सूचना पोलिसांना द्याव्या, अशी भावना व्यक्त केली. यावेळी महापौर नंदा जिचकार,  आमदार प्रा. अनिल सोले, आमदार विकास कुंभारे, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, प्रा. संजय भेंडे. कल्पना पांडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याNagpur Policeनागपूर पोलीस