शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:00 IST

अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी येणार आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून शुक्रवारी रात्री जागोजागी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली.

ठळक मुद्देपोलीस सक्रिय : संशयित आणि सोशल मीडियावर विशेष नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी येणार आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून शुक्रवारी रात्री जागोजागी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली. रात्रीची गस्त वाढविण्यात आली. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील काही विशेष भागांवरही पोलिसांनी नजर रोखली आहे.संशयित व्यक्तींची नागपुरातील हजेरी आधीपासूनच चर्चेत राहिली आहे. समाजकंटकांकडून गडबड केली जाऊ शकते, अशी शंका गुप्तचर यंत्रणांकडून आधीच व्यक्त करण्यात आली आहे. संवेदनशिल स्थळांभोवती पोलिसांनी सुरक्षा कवच निर्माण केले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून नाहक वाद निर्माण करू पाहणाऱ्या उपद्रवींवरही पोलिसांनी नजर रोखली आहे. विविध जाती-धर्मातील मान्यवरांची बैठक घेऊन पोलीस आयुक्तांनी शहरातील सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, यासाठी आधीपासूनच प्रयत्न चालविले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि समाजकंटकांकडून कसला काही अनुचित प्रकार अवलंबला जात असेल, कुठे काही आक्षेपार्ह घडत असेल तर तातडीने पोलिसांना सूचित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.चिथावणीखोरांना इशाराशहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. मात्र, कुणी समाजकंटकांनी चिथावणीखोरांनी कोणत्याही प्रकारचा उपद्रव करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना दिला.

भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी     अयोध्येचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. हा निकाल कुणाच्याही बाजूने आल्यानंतर तो स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी.  अथवा निकाल आनंददायी आल्यानंतरही उन्माद करू नये, रस्त्यावर येऊन आनंद साजरा करून, इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही,  याची काळजी घ्यावी. अयोध्येच्या निकालानंतर समाजात सामंजस्य रहावे, या भावनेतून विविध हिंदुत्ववादी संघटनेने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. जेणेकरून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल. तशा सूचना पोलिसांना द्याव्या, अशी भावना व्यक्त केली. यावेळी महापौर नंदा जिचकार,  आमदार प्रा. अनिल सोले, आमदार विकास कुंभारे, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, प्रा. संजय भेंडे. कल्पना पांडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याNagpur Policeनागपूर पोलीस