शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

परत ‘येरे माझ्या मागल्या’

By admin | Updated: June 22, 2015 02:44 IST

एकेकाळी ज्या अभियांत्रिकी शाखेवर विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या तेथे जागा भरण्यासाठी कसरतच करावी लागत आहे.

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया :  केवळ ७० टक्के अर्जच दाखलनागपूर : एकेकाळी ज्या अभियांत्रिकी शाखेवर विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या तेथे जागा भरण्यासाठी कसरतच करावी लागत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत उपलब्ध जागांच्या केवळ ७० टक्के अर्ज आल्यामुळे यंदा रिक्त जागांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ न केल्यामुळे महाविद्यालयांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे. रविवारी अभियांत्रिकी शाखेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. नागपूर विभागातील ५७ महाविद्यालयांमध्ये २४ हजार ९९२ जागा आहेत. यंदा १८ हजार ५२८ ‘अप्लिकेशन किट’ विकल्या गेल्या होत्या. यापैकी केवळ १७ हजार ४४० म्हणजेच केवळ ६९.७८ टक्के विद्यार्थ्यांनीच अर्ज दाखल करुन अर्ज निश्चिती केली आहे. यातीलही अनेक विद्यार्थी इतर विभागांतील महाविद्यालयांत किंवा इतर अभ्यासक्रमात प्रवेश घेतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा शिल्लक राहण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)जागा भरण्यासाठी कसरतकमी प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे सगळ्यात मोठा दबाव महाविद्यालय प्रशासनावर आला आहे. अगोदरच अभियांत्रिकीची कमी होत असलेली ‘क्रेझ’, त्यातच दरवर्षी रिक्त जागांची वाढणारी संख्या व चढाओढीची स्पर्धा यातून महाविद्यालयांना जागा भरण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागणार आहे. नागपूर विभागात गेल्यावर्षी ११ हजार ८३१ जागा रिकाम्या राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा विद्यार्थी आपल्याकडे यावे यासाठी महाविद्यालयांचे निरनिराळ्या तऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत.व्यवस्थापन कोट्यावर भिस्तमागील काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची क्रेझ कमी झाली आहे. विभागातील काही मोजक्या महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता पसंती देण्यात येते. इतर महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून शक्य तितक्या जागा भरण्यावरच भर ठेवला आहे.