शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे संविधान हीच यशाची गुरूकिल्ली : सरन्यायाधीश न्या. भूषण गवई

By आनंद डेकाटे | Updated: August 2, 2025 14:59 IST

Nagpur : दीक्षाभूमीतील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधान यांच्या बळावरच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. विद्यार्थ्यांनो आपल्यालाही जीवनात मोठे व्हायचे असेल तर बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे संविधान आत्मसात करा, तुमची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही. हीच यशाची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी येथे केले. 

दीक्षाभूमी स्मारक समिती संचालीत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.  शनिवारी डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, डाॅ. कमलताई गवई प्रमुख  प्रामुख्याने होते. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजुर्न सुरेई ससाई अध्यक्षस्थानी होते.  

सरन्यायाधीश भूषण गवई विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, जीवनात यशाची शिखरं गाठा पण आपल्या समाजाला विसरू नका. समाजाचेही आपण काही देणं लाागतो याची जाणीव ठेवा. समाजातील शेवटच्या घटकातील लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करा. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. दादासाहेब गायकवाड, रा.सू.गवई, सदानंद फुलझेले, ना.ह. कुंभारे, वा.को. गाणार यांच्यामुळेच डाॅ.आंबेडकर महाविद्यालय हे उभे राहू शकले. त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी वरिष्ठ न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्या. अनिल किलोर, स्मारक समितीचे सदस्य डाॅ. राजेंद्र गवई, डाॅ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, डाॅ. प्रदीप आगलावे, एन.आर.सुटे, भंते नाग दीपांकर, ॲड. आनंद फुलझेले, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, कास्ट्राईबचे कृष्णा इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य दीपा पाणेकर यांनी भूमिका विषद केली. महाविद्यालयाच्या इतिहासावर प्रकाश टाकला.  

डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाने वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडविले : मुख्यमंत्री फडणवीसडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शिक्षण व शिक्षणाचा दर्जा मिळवत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजाला शिक्षणाचे दार उघडे करून दिले व त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले. गेल्या ६० वर्षांची गौरवशाली पंरपरा असणारे हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास विस्तारून नवनवीन शिखर गाठेल, असा विश्वास व्यक्त करत समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून या महाविद्यालयाने कार्य करावे, अशा अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सावी बुलकुंडे (युपीएससी उत्तीर्ण), चारूल विटाळकर, (सीए),रुचिका बाकरे, (सीए)भूमिका अग्रवाल आणि निखील मोटघरे यांचा समावेश आहे. सरन्यायाधीश गवई व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते स्मृती चिन्ह देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस