शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
11
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
12
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
13
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
14
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
15
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
16
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
17
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
18
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
19
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
20
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...

बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे संविधान हीच यशाची गुरूकिल्ली : सरन्यायाधीश न्या. भूषण गवई

By आनंद डेकाटे | Updated: August 2, 2025 14:59 IST

Nagpur : दीक्षाभूमीतील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधान यांच्या बळावरच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. विद्यार्थ्यांनो आपल्यालाही जीवनात मोठे व्हायचे असेल तर बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे संविधान आत्मसात करा, तुमची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही. हीच यशाची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी येथे केले. 

दीक्षाभूमी स्मारक समिती संचालीत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.  शनिवारी डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, डाॅ. कमलताई गवई प्रमुख  प्रामुख्याने होते. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजुर्न सुरेई ससाई अध्यक्षस्थानी होते.  

सरन्यायाधीश भूषण गवई विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, जीवनात यशाची शिखरं गाठा पण आपल्या समाजाला विसरू नका. समाजाचेही आपण काही देणं लाागतो याची जाणीव ठेवा. समाजातील शेवटच्या घटकातील लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करा. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. दादासाहेब गायकवाड, रा.सू.गवई, सदानंद फुलझेले, ना.ह. कुंभारे, वा.को. गाणार यांच्यामुळेच डाॅ.आंबेडकर महाविद्यालय हे उभे राहू शकले. त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी वरिष्ठ न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्या. अनिल किलोर, स्मारक समितीचे सदस्य डाॅ. राजेंद्र गवई, डाॅ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, डाॅ. प्रदीप आगलावे, एन.आर.सुटे, भंते नाग दीपांकर, ॲड. आनंद फुलझेले, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, कास्ट्राईबचे कृष्णा इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य दीपा पाणेकर यांनी भूमिका विषद केली. महाविद्यालयाच्या इतिहासावर प्रकाश टाकला.  

डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाने वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडविले : मुख्यमंत्री फडणवीसडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शिक्षण व शिक्षणाचा दर्जा मिळवत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजाला शिक्षणाचे दार उघडे करून दिले व त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले. गेल्या ६० वर्षांची गौरवशाली पंरपरा असणारे हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास विस्तारून नवनवीन शिखर गाठेल, असा विश्वास व्यक्त करत समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून या महाविद्यालयाने कार्य करावे, अशा अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सावी बुलकुंडे (युपीएससी उत्तीर्ण), चारूल विटाळकर, (सीए),रुचिका बाकरे, (सीए)भूमिका अग्रवाल आणि निखील मोटघरे यांचा समावेश आहे. सरन्यायाधीश गवई व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते स्मृती चिन्ह देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस