शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

भारताच्या पुनर्बांधणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा

By admin | Updated: April 13, 2016 03:10 IST

स्वातंत्र्यानंतर जे जे प्रश्न देशापुढे निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केले आहे.

सुखदेव थोरात : वीज वितरण कंपनीतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्याननागपूर : स्वातंत्र्यानंतर जे जे प्रश्न देशापुढे निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केले आहे. देशाचे राजकीय स्वातंत्र्य, देशाची राज्यघटना, आर्थिक धोरणे, सामाजिक बांधणी अशा समस्त बाबींवर त्यांनी विचार मांडले आणि या बाबींशी निगडित समस्यांवर उपायही सुचविले. त्यांच्या सूचना त्यावेळी स्वीकाराव्या लागल्या व आजही त्याच विचारांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे अखंड भारताच्या पुनर्बांधणीत डॉ. आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन भारतीय समाज विज्ञान व संशोधन परिषदेचे अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी केले.महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व डॉ. आंबेडकर जयंती संयुक्त उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. थोरात बोलत होते. डॉ. थोरात यांनी १९२० पासून १९५६ पर्यंतच्या देशातील राजकीय घडमोडींचा लेखाजोखाच यावेळी मांडला. धर्मनिरपेक्ष राष्ट्र, समान न्याय, समान संधी, जातीविरहित समाज या बाबींसह देशाचा आर्थिक व राजकीय विकास या सर्व गोष्टी देशाला स्वीकाराव्या लागल्या. मजूर मंत्री असताना स्त्रियांना समान अधिकार, गरोदर महिलांना रजा, कामगारांसाठी सवलती, रविवारची सुटी अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. शिवाय गोदावरी व्हॅली, हिराकुंड धरण, भाकरानांगल धरण, सोन धरण उभारण्यात डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कृती मोलाची ठरली आहे. सेंटर वॉटर कमिशन व सेंटर पॉवर कमिशन त्यांनीच स्थापन केले आहे. त्यांच्यामुळेच देशाला जलसंपदा व ऊर्जा मंत्रालय स्थापन करावे लागले. आजची आर्थिक धोरणे त्यांच्या विचारातून तयार झाली आहेत. विकासासाठी लहान राज्यांची संकल्पना त्यांनीच देशाला दिली आहे. हे सर्व केवळ दलितांसाठी नाही तर राष्ट्रासाठी आहे. स्वातंत्र्यापूर्वी व नंतर देशातील असा कोणताच मुद्दा नाही ज्यावर डॉ. बाबासाहेबांनी विचार मांडले नाही. त्यामुळेच आज राजकारण्यांना कोणत्याही मुद्यावर त्यांच्याच विचारांचा व तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. दुर्दैवाने त्यांचे योगदान जाणूनबुजून झाकले गेल्याची टीका डॉ. थोरात यांनी केली. या कार्यक्रमाला भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, कामगार नेते जे.एस. पाटील प्रमुख वक्ते तर मंचावर वीज कंपनीचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, यु.बी. शहारे, सम्राट वाघमारे, राकेश जनबंधू, प्रकाश पवार, महेंद्र ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश पवार व संचालन नाईक यांनी केले.(प्रतिनिधी)