शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

‘आयुष्मान’ची गती झाली संथ; ९ लाखावर लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 11:05 IST

‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ या माध्यमातून जनतेला ५ लाख रुपयांपर्यंत उपचाराची हमी सरकारने दिली आहे. योजनेला सुरू होऊन वर्ष होत असतानाही योजनेच्या कामाची गती संथ असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे ७०१२४ लाभार्थ्यांनाच कार्ड वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारने आर्थिक निकष लक्षात घेऊन सामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य सेवेसाठी उपयुक्त पाऊल उचलले आहे. ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ या माध्यमातून जनतेला ५ लाख रुपयांपर्यंत उपचाराची हमी सरकारने दिली आहे. २३ सप्टेंबर २०१८ रोजी योजनेचा शुभारंभ झाला आहे. राज्यातील ८३.७२ लाख कुटुंबांना योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगितले जाते. नागपूर जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांची संख्या ९ लाख २० हजार ९४९ आहेत. यातील ७०१२४ लाभार्थ्यांना योजनेंतर्गत गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले आहे. योजनेला सुरू होऊन वर्ष होत असतानाही योजनेच्या कामाची गती संथ असल्याचे दिसून येत आहे.२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीवरून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. यात शासकीय रुग्णालयाबरोबरच व खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले आहे.आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर यांच्याकडे उपलब्ध आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका, प्रधानमंत्र्यांचे स्वाक्षरीचे वितरित करण्यात आलेले पत्र आणि आधारकार्डची आवश्यकता आहे. एखाद्या कुटुंबास प्रधानमंत्र्यांचे स्वाक्षरीचे पत्र वितरित झाले नसेल व त्यांचे नाव लाभार्थी यादीत असेल तर त्यांनी शिधापत्रिका व आधारकार्ड सोबत नेल्यास त्यांच्या नावाची नोंदणी केली जात आहे.ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर १५ लोकांचे पथक तयार केले. लाभार्थ्यांचे कागदपत्र जमा करुन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून पडताळणी करुन लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार