शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

Ayodhya Verdict :कम्युनिटी पुलिसिंग कामी आली, नागपुरात सीपी टू पीसी सकाळपासून रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 23:01 IST

कम्युनिटी पुलिसिंगवर भर देऊन पब्लिक-पोलीस कनेक्टीव्हीटी वाढविण्यात पोलीस आयुक्तांनी यश मिळविल्यामुळे अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतरही शहरात कसलीही अनुचित घटना घडली नाही.

ठळक मुद्देपब्लिक कनेक्टीव्हीटीमुळे सर्व सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कम्युनिटी पुलिसिंगवर भर देऊन पब्लिक-पोलीस कनेक्टीव्हीटी वाढविण्यात पोलीस आयुक्तांनी यश मिळविल्यामुळे अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतरही शहरात कसलीही अनुचित घटना घडली नाही. उपराजधानीतील सामाजिक सौहार्दाला कसलाही धक्का लागला नाही. 

सत्ताकेंद्र म्हणून नागपूरकडे देशाचे सध्या लक्ष आहे. दिवाळी, प्रकाशपर्व, ईद मिलाद आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी असा सारखा दोन आठवड्यांपासूनचा बंदोबस्त सांभाळणाऱ्या शहर पोलिसांना शनिवारी अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार असल्याचे कळाले आणि पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच उपराजधानीत बंदोबस्ताचे नव्याने नियोजन केले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शुक्रवारी सायंकाळी सुमारे एक तासभर वायरलेसवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कनेक्ट करून अतिसतर्कतेच्या उपाययोजनांवर चर्चा केली. ठिकठिकाणी नाकेबंदी करून रात्रीपासून गस्त वाढविली. शनिवारी सकाळी ७ वाजतापासून पोलीस आयुक्तांपासून तो पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत (सीपी टू पीसी) रस्त्यावर होते. सर्व गर्दीची ठिकाणं, बाजारपेठा, रेल्वेस्थानक, बसस्थानक, महत्त्वाची ठिकाणं, संवेदनशील वस्त्या आदी ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. ऐनवेळी धावपळ नको म्हणून पोलीस मुख्यालयात, नियंत्रण कक्षात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त मनुष्यबळ ठेवण्यात आले होते.विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी चार दिवसांपूर्वीच विविध धर्मातील तसेच समाजातील ज्येष्ठांचा, मान्यवरांचा समावेश असलेल्या शांतता समितीची एक बैठक घेतली होती . या बैठकीत सर्वधर्मसमभाव जपणाºया नागपूर शहराच्या प्रतिमेला कसलाही धक्का लागणार नाही, याची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करताना सोशल मीडियांवर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. प्रत्येक पोलीस अधिकारी पब्लिक कनेक्टिव्हीटीवर भर देऊन होते. त्याचाच अत्यंत चांगला परिणाम समोर आला. उपराजधानीत आज नेहमीसारखीच चहलपहल राहिली. बाजारपेठांतील वर्दळही रोजच्यासारखीच राहिली. 
घरगुती जबाबदारीला जयहिंद!अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बी. जी. गायकर येथे कार्यरत आहेत. मितभाषी, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडे पुण्याला शुभकार्य असल्याने ते सुटीवर गेले होते. मात्र, अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत आपली घरगुती जबाबदारीला तात्पुरता जयहिंद करत त्यांनी लगोलग नागपूर गाठले अन् कर्तव्यावर रुजू झाले.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याNagpur Policeनागपूर पोलीस