शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारे कोरोनापासून दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

सामाजिक भावनेतून काम करणाऱ्यांना स्वत:ची नाही तर कुटुंबीयांची चिंता लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. ...

सामाजिक भावनेतून काम करणाऱ्यांना स्वत:ची नाही तर कुटुंबीयांची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. आणखी किती दिवस कायम राहील, हे सांगता येणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आपलेेदेखील जवळ येत नाही. अशा लोकांची संख्या वाढतच आहे. मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणाऱ्यांच्या मनात सामाजिक भावना आहे. त्यांना स्वत:ची चिंता नाही. परंतु दुर्दैवाने कोरोनाची बाधा झाली. यात मृत्यू झाला तर आपल्या कुटुंंबीयांचे काय?असा प्रश्न या कोरोना योद्धांच्या मनात आहे. कोरोना योद्धांचा मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा झाली. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मनपातील १४ योद्धांच्या कुटुंबीयांना शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.

नागपूर शहरात १६ स्मशानभूमी आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मनपाच्या आरोग्य (स्वच्छता) विभागातील दहा कर्मचाऱ्यांची टीम आहे. बाधिताचा मृत्यू झाल्यास या टीमला मेसेज मिळतो. त्यानंतर या टीममधील कर्मचारी वाहनासह रुग्णालयात पोहचतात. मृतदेह प्लास्टिकमध्ये व्यवस्थित गुंडाळून वाहनातून स्मशानभूमीत आणतात. अंत्यसंस्कार करताना व मृतदेह आणताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. संसर्ग होऊ नये यासाठी प्लास्टिकचा ड्रेस, पीपीई किट व सॅनिटायझरचा वापर करूनच अंत्यसंस्कार करतात.

...

काही जणांकडून अपमानास्पद वागणूक

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कार करीत नाही. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीवर येण्याचे टाळतात. त्यांना आपल्या जीवाची भीती आहे. दुसकरीकडे अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी अनेक जण चांगले वागत नाही. अपमानास्पद वागणूक देतात. असे असूनही पथकातील कर्मचारी वाद न घालता आपले कर्तव्य बजावत आहेत.

....

खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार ()

कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करताना खबरदारी घ्यावीच लागते. सुरक्षा म्हणून पीपीई किट, मास्क व विशिष्ट प्रकारचा ड्रेस घालून व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागतात. घाटावरून घरी परतल्यानंतर दाराबाहेर कपडे, बूट काढून स्वत: निर्जंतूक व्हावे लागते. त्यानंतर अंघोळ करून घरात प्रवेश करावा लागतो. तोपर्यंत घरातील सदस्य संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते. मागील वर्षभरापासून हा नित्यक्रम सुरू आहे.

रमेश बिसमोगरे, सफाई कर्मचारी, मनपा

....

घरच्या सदस्यांपासून स्वत:ला दूर ठेवतो ()

कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर आपलेदेखील जवळ येत नाही. रुग्णालयातून मृत्यूचा कॉल आला की आमची टीम वाहनासह पोहचते. मृतदेह गाडीत ठेवण्यापासून तर अंत्यसंस्कारापर्यंतचे सर्व कार्य आमच्या टीमला करावे लागते. अंत्यसंस्कार करताना विशेष खबरदारी घेतो. सॅनिटायझर व किटचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागतात. घाटावरून घरी पोहचल्यानंतर अंगावरील कपडे, बूट पूर्णपणे निर्जंतूक करून अंघोळ केल्यानंतरच घरात प्रवेश करावा लागतो. तोपर्यंत घरातील सदस्य संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते.

मोहम्मद सलीम, सफाई कर्मचारी, मनपा

....

वर्षभरापासून अंत्यसंस्काराचे काम

मृतदेह गाडीत ठेवण्यापासून तर अंत्यसंस्कारापर्यंतचे सर्व कार्य आमच्या टीमला करावे लागते. अंत्यसंस्कार करताना विशेष खबरदारी घेतो. सॅनिटायझर व किटचा वापर करून अंत्यसंस्कार करावे लागतात. जोखमीचे काम करूनही अनेकदा मृताच्या कुटुंबीयांकडून चांगली वागणूक मिळत नाही. याचे वाईट वाटते. परंतु कोणताही वाद न करता आमचे पथक अंत्यसंस्काराचे काम मागील वर्षभरापासून करीत आहे. यात आम्हाला समाधान आहे.

कुणाल देलीकर, सफाई कर्मचारी, मनपा

....