शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

धरण परिसरात घर बांधकामाचा मोह टाळा, नाही तर पडेल हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 07:00 IST

Nagpur News धरण परिसरातील २०० मीटर क्षेत्रात कोणत्याही बांधकामास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे धरणाच्या निसर्गरम्य परिसरात घर खरेदी करण्याचा किंवा बांधकाम करण्याचा विचार करीत असाल, तर विचार साेडून द्यावा लागेल.

ठळक मुद्देजलसंपदा अधिकारीच संभ्रमातपण अंमलबजावणी कशी करणार?

नागपूर : धरणांच्या व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील जलप्रदूषण रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. धरण परिसरातील २०० मीटर क्षेत्रात कोणत्याही बांधकामास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे धरणाच्या निसर्गरम्य परिसरात घर खरेदी करण्याचा किंवा बांधकाम करण्याचा विचार करीत असाल, तर विचार साेडून द्यावा लागेल. सरकारने निर्णय घेतला असला, तरी अंमलबजावणी करण्यावरून जलसंपदा विभागच संभ्रमात आहे. पूर्वीच्या बांधकामांचे काय करायचे, सरकारी याेजनेच्या बांधकामाबाबत काय निर्णय घ्यायचा, यावरून अधिकारी संभ्रमात आहेत.

- जिल्ह्यात माेठी ५, मध्यम १३, शंभरावर लघु धरणे

नागपूर जिल्ह्यात ताेतलाडाेह, कामठी खैरी, खिंडसी रामटेक, नांद आणि वडगाव या ५ माेठ्या धरणांसह १३ मध्यम प्रकल्प आहेत आणि १०० च्यावर लघु प्रकल्प आहेत. या बहुतेक धरण परिसरात माेठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहे. केवळ नागपूर शहराचा विचार केल्यास अंबाझरी धरणाच्या बाजूलाच मेट्राे स्टेशन आणि असंख्य घरांचे बांधकाम आहे. याबाबत काय कारवाई करणार, हा प्रश्नच आहे.

- धरण क्षेत्रात फार्महाऊसचे फॅड

नदीचे पाणलाेट क्षेत्र आणि धरण परिसरालगत शेती लागलेली असते. मात्र या शेतीमध्ये फार्महाऊस तयार करण्याचे फॅड वाढले आहे. विशेषत: शहरात राहणारी मंडळी आठवड्याच्या शेवटी सुटी घालविण्यासाठी या फार्महाऊसवर जातात. काेणतीही परवानगी न घेता ही बांधकामे केली जातात.

- सांडपाणी सोडले जाते धरणात

नदी किंवा धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात काही बांधकाम केले, तर सहाजीकच त्याचे सांडपाणी हे नदी पात्रात जाईल आणि ही प्रक्रिया जलप्रदूषणासाठी कारणीभूत ठरेल. नागपुरात नाग नदीची झालेली दुरवस्था हे त्याचे माेठे उदाहरण आहे. उगमापासून ते अंतापर्यंत नाग नदी म्हणजे घाणपाणी वाहून नेणारा नाला झाला आहे. इतर नद्यांचीही तीच अवस्था हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- २०० मीटरपर्यंत बांधकामास बंदी

धरणातील पाणी प्रदूषण राेखण्यासाठी सर्व धरणांच्या पाणलाेट क्षेत्राच्या दाेन्ही बाजूस २०० मीटरच्या परिसरात काेणतेही बांधकाम करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. असे बांधकाम केल्यास जलसंपदा विभागाकडून कारवाई केली जाईल. यापूर्वी ७५ मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी हाेती. या नियमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्या-त्या धरणाच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर साेपविण्यात आली आहे.

- जलसंपदाचे अधिकारी म्हणतात, कल्पना नाही...

राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या नियमाच्या परिपत्रकाबाबत जलसंपदाच्या नागपूर विभागाचे अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत. कारवाई कुणावर करावी, सरकारी याेजनांबाबत काय निर्णय हाेईल, याबाबत त्यांच्यात संभ्रम आहे. जलसंपदाचे विदर्भाचे कार्यकारी संचालकांच्या गैरहजेरीत अधीक्षक अभियंता, नागपूर विभागाचे मुख्य अभियंता यांनी नव्या नियमाबाबत काही बाेलण्यास नकार दिला. नियमातील तरतुदींबाबत अभ्यास केल्यानंतरच बाेलता येईल, असे त्यांनी सांगितले.

नदीपात्रात बांधकाम करण्यावर यापूर्वीही बंदी हाेती. नदीच्या उगम क्षेत्रात ५०० मीटर, त्यापुढे २०० मीटरपर्यंतच्या क्षेत्रात बांधकाम करण्यास बंदी हाेती. मात्र २०१४ मध्ये सरकार बदलल्यानंतर सरकारला असे निर्णय घेण्याचा अधिकार नाही म्हणून नियम बदलण्यात आले. आता पुन्हा जाग आली असेल, असे वाटते.

- सुधीर पालिवाल, पर्यावरण तज्ज्ञ.

टॅग्स :Governmentसरकार