शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

धरण परिसरात घर बांधकामाचा मोह टाळा, नाही तर पडेल हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 07:00 IST

Nagpur News धरण परिसरातील २०० मीटर क्षेत्रात कोणत्याही बांधकामास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे धरणाच्या निसर्गरम्य परिसरात घर खरेदी करण्याचा किंवा बांधकाम करण्याचा विचार करीत असाल, तर विचार साेडून द्यावा लागेल.

ठळक मुद्देजलसंपदा अधिकारीच संभ्रमातपण अंमलबजावणी कशी करणार?

नागपूर : धरणांच्या व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील जलप्रदूषण रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. धरण परिसरातील २०० मीटर क्षेत्रात कोणत्याही बांधकामास राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे धरणाच्या निसर्गरम्य परिसरात घर खरेदी करण्याचा किंवा बांधकाम करण्याचा विचार करीत असाल, तर विचार साेडून द्यावा लागेल. सरकारने निर्णय घेतला असला, तरी अंमलबजावणी करण्यावरून जलसंपदा विभागच संभ्रमात आहे. पूर्वीच्या बांधकामांचे काय करायचे, सरकारी याेजनेच्या बांधकामाबाबत काय निर्णय घ्यायचा, यावरून अधिकारी संभ्रमात आहेत.

- जिल्ह्यात माेठी ५, मध्यम १३, शंभरावर लघु धरणे

नागपूर जिल्ह्यात ताेतलाडाेह, कामठी खैरी, खिंडसी रामटेक, नांद आणि वडगाव या ५ माेठ्या धरणांसह १३ मध्यम प्रकल्प आहेत आणि १०० च्यावर लघु प्रकल्प आहेत. या बहुतेक धरण परिसरात माेठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहे. केवळ नागपूर शहराचा विचार केल्यास अंबाझरी धरणाच्या बाजूलाच मेट्राे स्टेशन आणि असंख्य घरांचे बांधकाम आहे. याबाबत काय कारवाई करणार, हा प्रश्नच आहे.

- धरण क्षेत्रात फार्महाऊसचे फॅड

नदीचे पाणलाेट क्षेत्र आणि धरण परिसरालगत शेती लागलेली असते. मात्र या शेतीमध्ये फार्महाऊस तयार करण्याचे फॅड वाढले आहे. विशेषत: शहरात राहणारी मंडळी आठवड्याच्या शेवटी सुटी घालविण्यासाठी या फार्महाऊसवर जातात. काेणतीही परवानगी न घेता ही बांधकामे केली जातात.

- सांडपाणी सोडले जाते धरणात

नदी किंवा धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात काही बांधकाम केले, तर सहाजीकच त्याचे सांडपाणी हे नदी पात्रात जाईल आणि ही प्रक्रिया जलप्रदूषणासाठी कारणीभूत ठरेल. नागपुरात नाग नदीची झालेली दुरवस्था हे त्याचे माेठे उदाहरण आहे. उगमापासून ते अंतापर्यंत नाग नदी म्हणजे घाणपाणी वाहून नेणारा नाला झाला आहे. इतर नद्यांचीही तीच अवस्था हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- २०० मीटरपर्यंत बांधकामास बंदी

धरणातील पाणी प्रदूषण राेखण्यासाठी सर्व धरणांच्या पाणलाेट क्षेत्राच्या दाेन्ही बाजूस २०० मीटरच्या परिसरात काेणतेही बांधकाम करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. असे बांधकाम केल्यास जलसंपदा विभागाकडून कारवाई केली जाईल. यापूर्वी ७५ मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी हाेती. या नियमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्या-त्या धरणाच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर साेपविण्यात आली आहे.

- जलसंपदाचे अधिकारी म्हणतात, कल्पना नाही...

राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या नियमाच्या परिपत्रकाबाबत जलसंपदाच्या नागपूर विभागाचे अधिकारी मात्र अनभिज्ञ आहेत. कारवाई कुणावर करावी, सरकारी याेजनांबाबत काय निर्णय हाेईल, याबाबत त्यांच्यात संभ्रम आहे. जलसंपदाचे विदर्भाचे कार्यकारी संचालकांच्या गैरहजेरीत अधीक्षक अभियंता, नागपूर विभागाचे मुख्य अभियंता यांनी नव्या नियमाबाबत काही बाेलण्यास नकार दिला. नियमातील तरतुदींबाबत अभ्यास केल्यानंतरच बाेलता येईल, असे त्यांनी सांगितले.

नदीपात्रात बांधकाम करण्यावर यापूर्वीही बंदी हाेती. नदीच्या उगम क्षेत्रात ५०० मीटर, त्यापुढे २०० मीटरपर्यंतच्या क्षेत्रात बांधकाम करण्यास बंदी हाेती. मात्र २०१४ मध्ये सरकार बदलल्यानंतर सरकारला असे निर्णय घेण्याचा अधिकार नाही म्हणून नियम बदलण्यात आले. आता पुन्हा जाग आली असेल, असे वाटते.

- सुधीर पालिवाल, पर्यावरण तज्ज्ञ.

टॅग्स :Governmentसरकार