शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

अति खाणे टाळा, घरचेच जेवण घ्या; जागतिक मेंदू दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 11:39 IST

जेवल्यानंतर काही खाऊ नका. दुसऱ्या दिवशीचा ‘ब्रेकफास्ट’ उशिरा करा. ‘पॉलिअनसॅच्युरेटेड’ तेलाचा वापर बंद करा. नियमित व्यायामाला महत्त्व द्या, असा सल्ला वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ व ‘वर्ल्ड ट्रॉपिकल न्यूरॉलॉजी’चे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिला.

ठळक मुद्देचंद्रशेखर मेश्राम यांचा सल्ला 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढते वजन ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. वजन कमी करणे अवघड जरूर आहे, पण अशक्य मात्र नाही. गरज आहे, ती वजन का वाढते आणि ते आटोक्यात कसे ठेवता येते, ते समजून घेण्याची. आहार व लठ्ठपणा यांचा मेंदूशी संबंध आहे. योग्य आहार घेतल्यास आणि ‘सेच्युरेटेड फॅट्स’ व ‘हाय कोलेस्ट्रॉल’ असणाऱ्या खाद्य पदार्थांचे सेवन कमी केल्यास याचा नक्कीच फायदा होतो. दिवसातून दोन किंवा तीन वेळा घरचेच जेवण करा. रात्रीचे जेवण लवकर करा. जेवल्यानंतर काही खाऊ नका. दुसऱ्या दिवशीचा ‘ब्रेकफास्ट’ उशिरा करा. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. ‘पॉलिअनसॅच्युरेटेड’ तेलाचा वापर बंद करा. नियमित व्यायामाला महत्त्व द्या, असा सल्ला वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ व ‘वर्ल्ड ट्रॉपिकल न्यूरॉलॉजी’चे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिला.न्यूरो सोसायटी, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन आणि सायकॅट्रिक सोसायटी नागपूर यांच्यावतीने रविवारी जागतिक मेंदू दिवसानिमित्त आय. टी. पार्क येथील पर्सिस्टंटच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात ‘कुठलेही डायटिंग न करता वजन कसे कमी करावे’, या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जसलोक व लीलावती हॉस्पिटलचे डोकेदुखी रोग तज्ज्ञ डॉ. के. रविशंकर उपस्थित होते.डॉ. मेश्राम म्हणाले, अति खाणं, दिवसभरात अनेकदा खाणं आणि ‘अनहेल्दी फूड’ खाणे हे लठ्ठपणाला कारणीभूत असलेले मुख्य कारण आहे. आपल्या आहारातून केकस्, कुकीज, बिस्कीट, मैद्याचे संपूर्ण पदार्थ, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न, पोटॅटो चिप्स, कुरकुरे, बिस्कीट, प्रोझन फूट, ब्रेड, मिठाई, कोल्डड्रिंक आदी ‘प्रोसेस फूड’ खाणे बंद केल्याने वजन कमी करण्यास मोठा फायदा होतो. उपवास केल्याने आणि दिवसातून केवळ दोन किंवा तीन वेळा जेवल्यानेही शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करता येऊ शकते. ‘पॉलिअनसॅच्युरेटेड’ तेल यात सूर्यमुखी, सोयाबीन आदी तेल खाणे बंद केल्यास लठ्ठपणा नियंत्रणात आणण्यास मदत होते. याच्या जोडीला रोजचा व्यायाम व दिवसभरात शारीरिक हालचाली वाढविल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते, असेही डॉ. मेश्राम म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यूरो सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्याम बाभूळकर यांनी केले. संचालन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी केले.डोकेदुखीवर स्वत:हून औषधे घेणे टाळा-डॉ. रविशंकरडॉ. के. रविशंकर यांनी डोके का दुखते आणि त्यावरील उपचार याची माहिती दिली. ते म्हणाले, अनेकजण डोकेदुखी करता डोळ्याचे डॉक्टर, ‘ईएनटी’चे डॉक्टर तर काही हाडाचे डॉक्टरांकडे जातात. परंतु डोकेदुखीचे महत्त्वाचे कारण ‘मायग्रेन’ म्हणजे अर्धशिशी हे आहे. मायग्रेनमध्ये ४० टक्के लोकांना डोक्याच्या एका बाजूला तर इतर लोकांना डोक्याच्या दोन्ही भागाला दुखते. डोकेदुखीवर स्वत:हून औषधे घेण्याचा प्रकार धोकादायक होऊ शकतो. रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मायग्रेन १५ ते ५० वयोगटात होते आणि नंतर त्याचे प्रमाण कमी होत जाते. ‘मायग्रेन’वर उपचार व औषधे उपलब्ध आहेत. नुकतीच बाजारात नवी लस आली आहे, परंतु तिची किमत फार जास्त आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.हृदयस्पर्शी ‘ब्युटीफूल मार्इंड’या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘ब्युटीफूल मार्इंड’ या चित्रपटाचे खास सादरीकरण करण्यात आले. मानवी भावना, गुणधर्म आणि जागतिकीकरणाच्या आंतरसंबंधामधील विधान करणारा हा चित्रपट हृदयस्पर्शी ठरला. अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित प्रा. जॉन फॉर्ब्स नॅश यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रसेल क्रो या अभिनेत्याने नॅश यांना होणारे ‘हॅल्युसलेशन’ (आभासी विश्व) सुरेखरीत्या साकारले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य