शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागपुरातील सरासरी मतदान साठ टक्क्यांच्या खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 10:55 IST

निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे.

ठळक मुद्दे१९६२ साली झाले सर्वाधिक ६८ टक्के मतदान मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे. नागपुरात १६ लोकसभा निवडणुकांमध्ये एकदाही मतदानाची टक्केवारी सत्तरी पार गेलेली नाही. तर सरासरी मतदान हे ५७ टक्क्यांच्या आसपासच राहिले आहे. अशा स्थितीत यंदा तरी मतदानाची टक्केवारी वाढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपुरात १९५२ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक पार पडली. यात मतदानाची टक्केवारी ही ५९.५३ टक्के इतकी होती. त्याकाळी निवडणूक आयोगाकडे मर्यादित साधने होती. मात्र तरीदेखील मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढत गेली. १९६२ साली तर सर्वाधिक ६८.७ टक्के मतदान झाले होते. १९७१ ची निवडणूक वगळता १९६२ ते १९८९ या कालावधीतील सर्व निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही ६० टक्क्यांहून अधिक होती. मात्र त्यानंतर मतदानाचे प्रमाण खालावत गेले. मतदान जनजागृतीवर आयोगाने अधिक भर दिला, मात्र अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.१९९१ साली ४८.५५ टक्केच मतदान झाले. तर २००९ मध्ये मतदानाचा आकडा हा सर्वात कमी म्हणजे ४३.४० टक्के इतकाच होता. १९९१ नंतर सर्वाधिक मतदान २०१४ च्या निवडणुकांत झाले. मतदानाची टक्केवारी ही ५७.१२ टक्के इतकी होती. आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांचे एकूण सरासरी मतदान ५७.६७ टक्के इतके होते.

पाच वेळा विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मतेदरम्यान, मागील १६ लोकसभा निवडणुकांत नागपूर मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांची एकूण मते ही नेहमी ३५ टक्क्यांहून अधिक राहिली आहेत. १९९८ साली कॉंग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना सर्वाधिक ५७.४१ टक्के मते मिळाली होती. तर १९६७ साली कॉंग्रेसचे देवघरे यांना ३६.६ टक्के मते मिळाली होती. १९८०, १९८४, १९९८, १९९९ व २०१४ साली विजयी उमेदवारांना ५० टक्क्यांहून अधिक मते प्राप्त झाली.

टॅग्स :Votingमतदान