शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

नागपुरातील सरासरी मतदान साठ टक्क्यांच्या खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 10:55 IST

निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे.

ठळक मुद्दे१९६२ साली झाले सर्वाधिक ६८ टक्के मतदान मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे. नागपुरात १६ लोकसभा निवडणुकांमध्ये एकदाही मतदानाची टक्केवारी सत्तरी पार गेलेली नाही. तर सरासरी मतदान हे ५७ टक्क्यांच्या आसपासच राहिले आहे. अशा स्थितीत यंदा तरी मतदानाची टक्केवारी वाढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपुरात १९५२ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक पार पडली. यात मतदानाची टक्केवारी ही ५९.५३ टक्के इतकी होती. त्याकाळी निवडणूक आयोगाकडे मर्यादित साधने होती. मात्र तरीदेखील मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढत गेली. १९६२ साली तर सर्वाधिक ६८.७ टक्के मतदान झाले होते. १९७१ ची निवडणूक वगळता १९६२ ते १९८९ या कालावधीतील सर्व निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही ६० टक्क्यांहून अधिक होती. मात्र त्यानंतर मतदानाचे प्रमाण खालावत गेले. मतदान जनजागृतीवर आयोगाने अधिक भर दिला, मात्र अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.१९९१ साली ४८.५५ टक्केच मतदान झाले. तर २००९ मध्ये मतदानाचा आकडा हा सर्वात कमी म्हणजे ४३.४० टक्के इतकाच होता. १९९१ नंतर सर्वाधिक मतदान २०१४ च्या निवडणुकांत झाले. मतदानाची टक्केवारी ही ५७.१२ टक्के इतकी होती. आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांचे एकूण सरासरी मतदान ५७.६७ टक्के इतके होते.

पाच वेळा विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मतेदरम्यान, मागील १६ लोकसभा निवडणुकांत नागपूर मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांची एकूण मते ही नेहमी ३५ टक्क्यांहून अधिक राहिली आहेत. १९९८ साली कॉंग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना सर्वाधिक ५७.४१ टक्के मते मिळाली होती. तर १९६७ साली कॉंग्रेसचे देवघरे यांना ३६.६ टक्के मते मिळाली होती. १९८०, १९८४, १९९८, १९९९ व २०१४ साली विजयी उमेदवारांना ५० टक्क्यांहून अधिक मते प्राप्त झाली.

टॅग्स :Votingमतदान