शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

नागपुरातील सरासरी मतदान साठ टक्क्यांच्या खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 10:55 IST

निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे.

ठळक मुद्दे१९६२ साली झाले सर्वाधिक ६८ टक्के मतदान मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकांना लोकशाहीचा उत्सव असे मानण्यात येते व मतदार याच्यात केंद्रबिंदू असतो. मात्र मतदानासंदर्भात मतदारांमध्ये उदासीनताच असल्याचे चित्र मागील ६७ वर्षांत दिसून आले आहे. नागपुरात १६ लोकसभा निवडणुकांमध्ये एकदाही मतदानाची टक्केवारी सत्तरी पार गेलेली नाही. तर सरासरी मतदान हे ५७ टक्क्यांच्या आसपासच राहिले आहे. अशा स्थितीत यंदा तरी मतदानाची टक्केवारी वाढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपुरात १९५२ साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक पार पडली. यात मतदानाची टक्केवारी ही ५९.५३ टक्के इतकी होती. त्याकाळी निवडणूक आयोगाकडे मर्यादित साधने होती. मात्र तरीदेखील मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढत गेली. १९६२ साली तर सर्वाधिक ६८.७ टक्के मतदान झाले होते. १९७१ ची निवडणूक वगळता १९६२ ते १९८९ या कालावधीतील सर्व निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही ६० टक्क्यांहून अधिक होती. मात्र त्यानंतर मतदानाचे प्रमाण खालावत गेले. मतदान जनजागृतीवर आयोगाने अधिक भर दिला, मात्र अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.१९९१ साली ४८.५५ टक्केच मतदान झाले. तर २००९ मध्ये मतदानाचा आकडा हा सर्वात कमी म्हणजे ४३.४० टक्के इतकाच होता. १९९१ नंतर सर्वाधिक मतदान २०१४ च्या निवडणुकांत झाले. मतदानाची टक्केवारी ही ५७.१२ टक्के इतकी होती. आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांचे एकूण सरासरी मतदान ५७.६७ टक्के इतके होते.

पाच वेळा विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मतेदरम्यान, मागील १६ लोकसभा निवडणुकांत नागपूर मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांची एकूण मते ही नेहमी ३५ टक्क्यांहून अधिक राहिली आहेत. १९९८ साली कॉंग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना सर्वाधिक ५७.४१ टक्के मते मिळाली होती. तर १९६७ साली कॉंग्रेसचे देवघरे यांना ३६.६ टक्के मते मिळाली होती. १९८०, १९८४, १९९८, १९९९ व २०१४ साली विजयी उमेदवारांना ५० टक्क्यांहून अधिक मते प्राप्त झाली.

टॅग्स :Votingमतदान