शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सरासरी वीजबिल महागात पडणार; अधिक बिलाच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:57 IST

कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मीटर रिंडींग व छापील बिल देणे बंद केले आहे. सध्या ग्राहकांना सरासरी वीजबिल एसएमएस स्वरुपात पाठविले जात आहे. हे बिल उन्हाळ्यातील वापरापेक्षा कमी असल्याने ग्राहकांना सध्या आनंद वाटत आहे. परंतु हा आनंद केवळ औट घटकेचा ठरणार आहे.

ठळक मुद्देरिडींग, बिल वाटप सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मीटर रिंडींग व छापील बिल देणे बंद केले आहे. सध्या ग्राहकांना सरासरी वीजबिल एसएमएस स्वरुपात पाठविले जात आहे. हे बिल उन्हाळ्यातील वापरापेक्षा कमी असल्याने ग्राहकांना सध्या आनंद वाटत आहे. परंतु हा आनंद केवळ औट घटकेचा ठरणार आहे. लॉकडाऊननंतर रिडींगप्रमाणे बिलाची वसुली केली जाईल. तेव्हा हेच सरासरी बिल ऐन पावसाळ्यात ग्राहकांना महागात पडेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सरासरी बिल पाठवले जात आहे. त्यानुसार अनेकांना साधारणत: फेब्रुवारी महिन्यातील बिलाएवढेच एप्रिल व मे महिन्यातील बिल आले आहे. पण, मोठ्या संख्येने ग्राहक बिलच भरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महावितरणची बिलापोटी होणारी वसुली केवळ ४० टक्केच झाली तर मे महिन्यात वसुली २५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. वसुलीच कमी असल्याने आर्थिक ताळेबंद जुळविण्यासाठी लॉकडाऊननंतर ही वसुली भरून काढण्यात येणार आहे. सर्वाधिक वीज वापर असलेल्या महिन्यातील वीज वापराची रिडींगनुसार वसुली करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रेग्युलर बिलाचा आकडा चांगलाच वाढलेला राहणार आहे. प्रसंगी ग्राहकांचा आक्रोशही सहन करावा लागू शकतो. पावसाळ्यात होणारी ही अडचण लक्षात घेता महावितरणने रिडींग व बिल वाटप सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :electricityवीज