शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सरासरी वीजबिल महागात पडणार; अधिक बिलाच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:57 IST

कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मीटर रिंडींग व छापील बिल देणे बंद केले आहे. सध्या ग्राहकांना सरासरी वीजबिल एसएमएस स्वरुपात पाठविले जात आहे. हे बिल उन्हाळ्यातील वापरापेक्षा कमी असल्याने ग्राहकांना सध्या आनंद वाटत आहे. परंतु हा आनंद केवळ औट घटकेचा ठरणार आहे.

ठळक मुद्देरिडींग, बिल वाटप सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मीटर रिंडींग व छापील बिल देणे बंद केले आहे. सध्या ग्राहकांना सरासरी वीजबिल एसएमएस स्वरुपात पाठविले जात आहे. हे बिल उन्हाळ्यातील वापरापेक्षा कमी असल्याने ग्राहकांना सध्या आनंद वाटत आहे. परंतु हा आनंद केवळ औट घटकेचा ठरणार आहे. लॉकडाऊननंतर रिडींगप्रमाणे बिलाची वसुली केली जाईल. तेव्हा हेच सरासरी बिल ऐन पावसाळ्यात ग्राहकांना महागात पडेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सरासरी बिल पाठवले जात आहे. त्यानुसार अनेकांना साधारणत: फेब्रुवारी महिन्यातील बिलाएवढेच एप्रिल व मे महिन्यातील बिल आले आहे. पण, मोठ्या संख्येने ग्राहक बिलच भरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महावितरणची बिलापोटी होणारी वसुली केवळ ४० टक्केच झाली तर मे महिन्यात वसुली २५ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. वसुलीच कमी असल्याने आर्थिक ताळेबंद जुळविण्यासाठी लॉकडाऊननंतर ही वसुली भरून काढण्यात येणार आहे. सर्वाधिक वीज वापर असलेल्या महिन्यातील वीज वापराची रिडींगनुसार वसुली करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रेग्युलर बिलाचा आकडा चांगलाच वाढलेला राहणार आहे. प्रसंगी ग्राहकांचा आक्रोशही सहन करावा लागू शकतो. पावसाळ्यात होणारी ही अडचण लक्षात घेता महावितरणने रिडींग व बिल वाटप सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :electricityवीज