शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अवनीच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 20:21 IST

नरभक्षी झालेली वाघीण अवनीला मारण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष व वन्यप्रेमी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीमध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे समर्थन करीत नरभक्षी अवनीला मारल्याप्रकरणी राजकारण होऊ नये, असे म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी राज्यात कोट्यवधी झाडे लावली असून ते खरे वन्यप्रेमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुनगंटीवारांचे समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरभक्षी झालेली वाघीण अवनीला मारण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष व वन्यप्रेमी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीमध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे समर्थन करीत नरभक्षी अवनीला मारल्याप्रकरणी राजकारण होऊ नये, असे म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी राज्यात कोट्यवधी झाडे लावली असून ते खरे वन्यप्रेमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, अवनी प्रकरण दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांना स्वत:ला अवनीच्या मृत्यूचे दु:ख आहे. परंतु याचाही विचार करायला हवा की, अवनी ही नरभक्षी झाली होती. यवतमाळच्या पांढरकवडा परिसरात तिची दहशत होती. जवळपास १३ आदिवासी लोकांना तिने आपले शिकार बनवले होते. तिला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव तिला मारावे लागले. तिला मारले नसते तर तिने आणखी कितीतरी लोकांना आपले शिकार बनवले असते. यात मुनगंटीवार यांचा कुठलाही दोष नाही. परंतु या संदर्भात अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात आहे. उद्योगपतीचे नाव घेतले जात आहे. परंतु याचा कुणीही विचार करीत नाही की, ज्या १३ लोकांना अवनीने आपली शिकार बनवले आहे, त्या लोकांच्या कुटुंबीयांची दिवाळी कशी गेली असेल. अनेकदा असे निर्णय घ्यावे लागतात जे लोकप्रिय नसतात. याबाबतही असाच निर्णय घेतला गेला, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.आदिवासी नागरिकांच्या हिताचा निर्णयगडकरी म्हणाले, अवनीबाबतचा निर्णय हा आदिवासी, शोषित नागरिकांचे हित लक्षात घेऊन घेण्यात आला. परंतु याविरुद्ध विनाकारण वक्तव्य केले जात आहे. गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे कौतुक करीत सांगितले की, मुनगंटीवार हे वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अनेक कामे करीत आहे. नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून विकसित केले जात आहे. मुनगंटीवार यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रात एकाच दिवशी १४ कोटी वृक्षांचे रोपण शक्य होऊ शकले.

 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणNitin Gadkariनितीन गडकरी