शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

अवनीच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 20:21 IST

नरभक्षी झालेली वाघीण अवनीला मारण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष व वन्यप्रेमी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीमध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे समर्थन करीत नरभक्षी अवनीला मारल्याप्रकरणी राजकारण होऊ नये, असे म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी राज्यात कोट्यवधी झाडे लावली असून ते खरे वन्यप्रेमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुनगंटीवारांचे समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरभक्षी झालेली वाघीण अवनीला मारण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष व वन्यप्रेमी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीमध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे समर्थन करीत नरभक्षी अवनीला मारल्याप्रकरणी राजकारण होऊ नये, असे म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी राज्यात कोट्यवधी झाडे लावली असून ते खरे वन्यप्रेमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, अवनी प्रकरण दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांना स्वत:ला अवनीच्या मृत्यूचे दु:ख आहे. परंतु याचाही विचार करायला हवा की, अवनी ही नरभक्षी झाली होती. यवतमाळच्या पांढरकवडा परिसरात तिची दहशत होती. जवळपास १३ आदिवासी लोकांना तिने आपले शिकार बनवले होते. तिला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव तिला मारावे लागले. तिला मारले नसते तर तिने आणखी कितीतरी लोकांना आपले शिकार बनवले असते. यात मुनगंटीवार यांचा कुठलाही दोष नाही. परंतु या संदर्भात अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात आहे. उद्योगपतीचे नाव घेतले जात आहे. परंतु याचा कुणीही विचार करीत नाही की, ज्या १३ लोकांना अवनीने आपली शिकार बनवले आहे, त्या लोकांच्या कुटुंबीयांची दिवाळी कशी गेली असेल. अनेकदा असे निर्णय घ्यावे लागतात जे लोकप्रिय नसतात. याबाबतही असाच निर्णय घेतला गेला, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.आदिवासी नागरिकांच्या हिताचा निर्णयगडकरी म्हणाले, अवनीबाबतचा निर्णय हा आदिवासी, शोषित नागरिकांचे हित लक्षात घेऊन घेण्यात आला. परंतु याविरुद्ध विनाकारण वक्तव्य केले जात आहे. गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे कौतुक करीत सांगितले की, मुनगंटीवार हे वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अनेक कामे करीत आहे. नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून विकसित केले जात आहे. मुनगंटीवार यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रात एकाच दिवशी १४ कोटी वृक्षांचे रोपण शक्य होऊ शकले.

 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणNitin Gadkariनितीन गडकरी