शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अवनीच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 20:21 IST

नरभक्षी झालेली वाघीण अवनीला मारण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष व वन्यप्रेमी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीमध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे समर्थन करीत नरभक्षी अवनीला मारल्याप्रकरणी राजकारण होऊ नये, असे म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी राज्यात कोट्यवधी झाडे लावली असून ते खरे वन्यप्रेमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुनगंटीवारांचे समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरभक्षी झालेली वाघीण अवनीला मारण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष व वन्यप्रेमी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व घडामोडीमध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे समर्थन करीत नरभक्षी अवनीला मारल्याप्रकरणी राजकारण होऊ नये, असे म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी राज्यात कोट्यवधी झाडे लावली असून ते खरे वन्यप्रेमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, अवनी प्रकरण दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांना स्वत:ला अवनीच्या मृत्यूचे दु:ख आहे. परंतु याचाही विचार करायला हवा की, अवनी ही नरभक्षी झाली होती. यवतमाळच्या पांढरकवडा परिसरात तिची दहशत होती. जवळपास १३ आदिवासी लोकांना तिने आपले शिकार बनवले होते. तिला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव तिला मारावे लागले. तिला मारले नसते तर तिने आणखी कितीतरी लोकांना आपले शिकार बनवले असते. यात मुनगंटीवार यांचा कुठलाही दोष नाही. परंतु या संदर्भात अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात आहे. उद्योगपतीचे नाव घेतले जात आहे. परंतु याचा कुणीही विचार करीत नाही की, ज्या १३ लोकांना अवनीने आपली शिकार बनवले आहे, त्या लोकांच्या कुटुंबीयांची दिवाळी कशी गेली असेल. अनेकदा असे निर्णय घ्यावे लागतात जे लोकप्रिय नसतात. याबाबतही असाच निर्णय घेतला गेला, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.आदिवासी नागरिकांच्या हिताचा निर्णयगडकरी म्हणाले, अवनीबाबतचा निर्णय हा आदिवासी, शोषित नागरिकांचे हित लक्षात घेऊन घेण्यात आला. परंतु याविरुद्ध विनाकारण वक्तव्य केले जात आहे. गडकरी यांनी मुनगंटीवार यांचे कौतुक करीत सांगितले की, मुनगंटीवार हे वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अनेक कामे करीत आहे. नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून विकसित केले जात आहे. मुनगंटीवार यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रात एकाच दिवशी १४ कोटी वृक्षांचे रोपण शक्य होऊ शकले.

 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणNitin Gadkariनितीन गडकरी