शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नागपुरातील स्वयंचलित हवामान संच अखेर सुरू; राज्य शासनाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:12 IST

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासाठी उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान संचातील उपकरणे काही महिन्यांअगोदर चोरी गेली होती. राज्य शासनातर्फे याची दखल घेण्यात आली असून हा संच परत सुरू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘लोकमत’ने केला होता भंडाफोड

आॅनलाईन लोकमतनागपूर : शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासाठी उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान संचातील उपकरणे काही महिन्यांअगोदर चोरी गेली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने भंडाफोड केला होता. राज्य शासनातर्फे याची दखल घेण्यात आली असून हा संच परत सुरू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने ‘महावेध’ प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत ३० एप्रिल २०१७ रोजी बुटीबोरी रोडवर डोंगरगाव येथे पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्राला पाच महिनेही पूर्ण झाले नसताना येथील उपकरण चोरीला गेले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या केंद्राचे उद्घाटन केले होते.१९ सप्टेंबर २०१७ च्या जवळपास अज्ञात इसमाने वर्धा मार्गावरील स्वयंचलित हवामान संचातील सौर ऊर्जा प्लेट, बॅटरी, लाईट हे साहित्य चोरून नेले होते. यासंदर्भात हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. यातील आरोपीला अटक झाली नसली तरी तपास सुरू आहे. या स्वयंचलित हवामान संचात आवश्यक ती उपकरणे लावून त्याला परत सुरू करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तराच्या माध्यमातून स्पष्ट केले.

टॅग्स :Governmentसरकार