शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नागपुरातील स्वयंचलित हवामान संच अखेर सुरू; राज्य शासनाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:12 IST

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासाठी उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान संचातील उपकरणे काही महिन्यांअगोदर चोरी गेली होती. राज्य शासनातर्फे याची दखल घेण्यात आली असून हा संच परत सुरू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘लोकमत’ने केला होता भंडाफोड

आॅनलाईन लोकमतनागपूर : शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासाठी उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान संचातील उपकरणे काही महिन्यांअगोदर चोरी गेली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने भंडाफोड केला होता. राज्य शासनातर्फे याची दखल घेण्यात आली असून हा संच परत सुरू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा म्हणून राज्य शासनाने ‘महावेध’ प्रकल्पांतर्गत राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत ३० एप्रिल २०१७ रोजी बुटीबोरी रोडवर डोंगरगाव येथे पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्राला पाच महिनेही पूर्ण झाले नसताना येथील उपकरण चोरीला गेले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या केंद्राचे उद्घाटन केले होते.१९ सप्टेंबर २०१७ च्या जवळपास अज्ञात इसमाने वर्धा मार्गावरील स्वयंचलित हवामान संचातील सौर ऊर्जा प्लेट, बॅटरी, लाईट हे साहित्य चोरून नेले होते. यासंदर्भात हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. यातील आरोपीला अटक झाली नसली तरी तपास सुरू आहे. या स्वयंचलित हवामान संचात आवश्यक ती उपकरणे लावून त्याला परत सुरू करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तराच्या माध्यमातून स्पष्ट केले.

टॅग्स :Governmentसरकार