शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आकर्षक योजनांनी पाडली होती भुरळ!

By admin | Updated: May 16, 2014 00:07 IST

श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने गुंतवणूकदारांना चार योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखविले.

श्री सूर्या घोटाळा : काहींना घसघशीत परतावा

अजय डांगे - अकोला

श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने गुंतवणूकदारांना चार योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखविले. या योजनांमध्ये पैशांची गुतंवणूक करुन काही ठेवीदारांना कमी कालावधीत फायदा झाल्याची माहितीही उजेडात आली आहे. अकोल्यातील १६ गुतंवणूकदारांना ४३ लाख ३0 हजार ६00 रुपयांचा लाभ या योजनेतून झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे.

नागपूर श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने स्वत:चे औद्योगिक प्रकल्प सुरु केले. यामध्ये ऑईल मिल, पर्यटन आणि वाहतुकीसह इतरही प्रकल्पांचा समावेश होता. या उद्योगांसाठी कंपनीला पैशांची गरज भासली. त्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांमार्फत भांडवल उभे करण्याचा निर्णय घेतला. गुतंवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने योजना तयार केल्या. या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी कंपनीने नागपूर, अमरावती, अकोला आणि पुण्यासह अन्य शहरांमध्ये मेळावे घेतले. तत्पूर्वी, कंपनीने स्थानिक परिचितांना हाताशी धरुन त्यांची बिझनेस असोसिएट्स (एजंट) म्हणून नेमणूक केली. एजंटांनी मेळावे आयोजित करुन गुंतवणूकदरांना प्रोत्साहित करण्याची कामगिरी चोखपणे बजावली. अकोल्यातील अनेक मोठय़ा गुंतवणुकदारांनी १ कोटीपेक्षा जास्त रक्कम गुंतविली.

अशा होत्या फसव्या योजना..

-३ महिन्यांकरिता १ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारास १३ ते १५ टक्के व्याज देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. बिझनेस असोसिएट्सला (एजंट) ३ ते ५ टक्के कमिशनही दिले जाणार होते.

-दोन वर्षाच्या योजनेत किमान १ लाख रुपयांची गुतंवणूक करण्याचे बंधनकारक होते. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर संबंधित एजंटला कमिशनही देण्यात आले.

-तिसर्‍या योजनेमध्ये १८ महिन्यांकरिता १ लाख रुपये गुंतविल्यास गुंतवणूदाराला मुदतीनंतर २ लाख रुपये देण्यात येते होते; मात्र मुदत संपण्यापूर्वीच रक्कम काढल्यास गुंतवणूकदारास व्याज दिले जात नव्हते.