शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

नागपूर जिल्ह्यातील ३४ शाळांचा पट ५ पेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 10:43 IST

खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षण व्यवस्थेपुढे प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात जि.प.च्या शाळांची पटसंख्या घसरल्याने २४ शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे इतरत्र समायोजन केले होते. यंदाही मोठी गाज जि.प. शाळांवर पडण्याची शक्यता आहे. कारण ३४ शाळांचा पट हा ५ पेक्षाही कमी असून, भिवापूरच्या एका शाळेत तर विद्यार्थ्यांची पटसंख्या १ आहे. दिवसेंदिवस घसरत चाललेल्या पटसंख्येमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जि.प. च्या शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येत आहे. त्याचबरोबर शाळांचे डिजिटलायझेशन, शाळांची रंगरंगोटीच्या माध्यमातून शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाही जि.प.च्या शाळांचा पट दिवसेंदिवस घसरत आहे आणि शाळांना घरघर लागली आहे. गेल्यावर्षी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद करून, विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले होते. यंदा तर २० पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळांची यादी मोठी आहे. जिल्ह्यात जि.प.च्या १५३८ वर शाळा असून येथे ४३०० वर शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी जवळपास एक हजारावर शाळा डिजिटल आहेत. मात्र ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे जि.प. शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकतर बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळांमध्ये समायोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र