शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नागपूर जिल्ह्यातील ३४ शाळांचा पट ५ पेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 10:43 IST

खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षण व्यवस्थेपुढे प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात जि.प.च्या शाळांची पटसंख्या घसरल्याने २४ शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे इतरत्र समायोजन केले होते. यंदाही मोठी गाज जि.प. शाळांवर पडण्याची शक्यता आहे. कारण ३४ शाळांचा पट हा ५ पेक्षाही कमी असून, भिवापूरच्या एका शाळेत तर विद्यार्थ्यांची पटसंख्या १ आहे. दिवसेंदिवस घसरत चाललेल्या पटसंख्येमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जि.प. च्या शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येत आहे. त्याचबरोबर शाळांचे डिजिटलायझेशन, शाळांची रंगरंगोटीच्या माध्यमातून शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाही जि.प.च्या शाळांचा पट दिवसेंदिवस घसरत आहे आणि शाळांना घरघर लागली आहे. गेल्यावर्षी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद करून, विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले होते. यंदा तर २० पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळांची यादी मोठी आहे. जिल्ह्यात जि.प.च्या १५३८ वर शाळा असून येथे ४३०० वर शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी जवळपास एक हजारावर शाळा डिजिटल आहेत. मात्र ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे जि.प. शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकतर बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळांमध्ये समायोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र