शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपुरात बार मालकाचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:52 IST

अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा यांना पहाटे गंभीर अवस्थेत ताब्यात घेतले.

ठळक मुद्देचार अट्टल गुन्हेगार गजाआड : साथीदार फरार : पाचपावलीतील घटनेने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा यांना पहाटे गंभीर अवस्थेत ताब्यात घेतले. तत्पूर्वीच चार आरोपींना अटक केली. काही आरोपी फरार आहेत. खंडणी वसुलीसाठी आणि आपली दहशत निर्माण करण्यासाठी हे अपहरण आणि हत्याकांड घडल्याचे पोलीस सांगतात.आकाश चिंचखेडे, मोनू समुद्रे, सौरभ तायवाडे आणि आकाश नागुलकर अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.वैशालीनगरातील रहिवासी तलरेजा यांचा पाचपावलीत कमाल चौकाजवळ बियर बार आहे. रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ते आपल्या बारसमोर बसून असताना उपरोक्त आरोपी तेथे आले. त्यांनी दारूच्या पैश्यावरून तलरेजा यांच्यासोबत वाद घातला. यानंतर त्यांना खंडणीची मागणी केली. त्यांनी नकार देताच घातक शस्त्राच्या धाकावर आरोपींनी तलरेजा यांना मारहाण करीत फरफटत नेले. काही अंतरावर असलेल्या कुख्यात अजय चिंचखेडेच्या घरी तलरेजा यांना आरोपी घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर तलवारीचे घाव घातल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांचा मृत्यू झाला, असे समजून आरोपींनी बाळाभाऊ पेठेतील ग्राऊंडजवळ नेऊन तलरेजांना फेकून दिले.दरम्यान, आरोपींनी परमानंद तलरेजा यांना शस्त्राच्या धाकावर पळवून नेल्याची माहिती बारमधील एकाने नियंत्रण कक्षात फोन करून कळविली. त्यानंतर पाचपावलीचा पोलीस ताफा बारमध्ये पोहचला. तेथून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी तलरेजा तसेच आरोपींचा शोध घेणे सुरू केले. आजुबाजुच्या पोलीस ठाण्यातही बारमालकाचे कुख्यात गुंडांनी अपहरण केल्याची माहिती कळविण्यात आली. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना पहाटे तीन ते चारच्या सुमारास आरोपींना नंदनवनमध्ये पकडले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तलरेजांबाबत विचारणा करण्यात आली. तलरेजांना बाळाभाऊ पेठेतील एका मैदानात मारून फेकल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले. पोलिसांनी लगेच आरोपींना घेऊन ते मैदान गाठले. तेथे रक्ताच्या थारोळ्यात तलरेजा पडून होते. ते जीवंत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना लगेच एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.मदतीला  धावलेल्यालाही मारलेपोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी कुख्यात गुन्हेगार आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्यांच्यावर एमपीडीएचीही कारवाई केली आहे. या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अजय चिंचखेडे हा १ मार्चलाच कारागृहातून बाहेर आला, हे विशेष!त्यांनी परमानंद यांना मारहाण करून त्यांचे बारसमोरून अपहरण केले, त्यावेळी बाजुला पान टपरी चालविणारा तलरेजा यांच्या मदतीला धावला. ते पाहून आरोपींनी त्या पान टपरीवाल्यालाही मारहाण केली. दरम्यान, पाचपावलीचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. केदारे यांनी प्रतीक परमानंद तलरेजा यांच्या तक्रारीवरून अपहरण करून हत्या करण्याच्या प्रयत्नाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर