शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

नागपुरात बार मालकाचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:52 IST

अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा यांना पहाटे गंभीर अवस्थेत ताब्यात घेतले.

ठळक मुद्देचार अट्टल गुन्हेगार गजाआड : साथीदार फरार : पाचपावलीतील घटनेने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा यांना पहाटे गंभीर अवस्थेत ताब्यात घेतले. तत्पूर्वीच चार आरोपींना अटक केली. काही आरोपी फरार आहेत. खंडणी वसुलीसाठी आणि आपली दहशत निर्माण करण्यासाठी हे अपहरण आणि हत्याकांड घडल्याचे पोलीस सांगतात.आकाश चिंचखेडे, मोनू समुद्रे, सौरभ तायवाडे आणि आकाश नागुलकर अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.वैशालीनगरातील रहिवासी तलरेजा यांचा पाचपावलीत कमाल चौकाजवळ बियर बार आहे. रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ते आपल्या बारसमोर बसून असताना उपरोक्त आरोपी तेथे आले. त्यांनी दारूच्या पैश्यावरून तलरेजा यांच्यासोबत वाद घातला. यानंतर त्यांना खंडणीची मागणी केली. त्यांनी नकार देताच घातक शस्त्राच्या धाकावर आरोपींनी तलरेजा यांना मारहाण करीत फरफटत नेले. काही अंतरावर असलेल्या कुख्यात अजय चिंचखेडेच्या घरी तलरेजा यांना आरोपी घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर तलवारीचे घाव घातल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांचा मृत्यू झाला, असे समजून आरोपींनी बाळाभाऊ पेठेतील ग्राऊंडजवळ नेऊन तलरेजांना फेकून दिले.दरम्यान, आरोपींनी परमानंद तलरेजा यांना शस्त्राच्या धाकावर पळवून नेल्याची माहिती बारमधील एकाने नियंत्रण कक्षात फोन करून कळविली. त्यानंतर पाचपावलीचा पोलीस ताफा बारमध्ये पोहचला. तेथून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी तलरेजा तसेच आरोपींचा शोध घेणे सुरू केले. आजुबाजुच्या पोलीस ठाण्यातही बारमालकाचे कुख्यात गुंडांनी अपहरण केल्याची माहिती कळविण्यात आली. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना पहाटे तीन ते चारच्या सुमारास आरोपींना नंदनवनमध्ये पकडले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तलरेजांबाबत विचारणा करण्यात आली. तलरेजांना बाळाभाऊ पेठेतील एका मैदानात मारून फेकल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले. पोलिसांनी लगेच आरोपींना घेऊन ते मैदान गाठले. तेथे रक्ताच्या थारोळ्यात तलरेजा पडून होते. ते जीवंत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना लगेच एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.मदतीला  धावलेल्यालाही मारलेपोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी कुख्यात गुन्हेगार आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्यांच्यावर एमपीडीएचीही कारवाई केली आहे. या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अजय चिंचखेडे हा १ मार्चलाच कारागृहातून बाहेर आला, हे विशेष!त्यांनी परमानंद यांना मारहाण करून त्यांचे बारसमोरून अपहरण केले, त्यावेळी बाजुला पान टपरी चालविणारा तलरेजा यांच्या मदतीला धावला. ते पाहून आरोपींनी त्या पान टपरीवाल्यालाही मारहाण केली. दरम्यान, पाचपावलीचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. केदारे यांनी प्रतीक परमानंद तलरेजा यांच्या तक्रारीवरून अपहरण करून हत्या करण्याच्या प्रयत्नाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर