शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

नागपुरात बार मालकाचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:52 IST

अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा यांना पहाटे गंभीर अवस्थेत ताब्यात घेतले.

ठळक मुद्देचार अट्टल गुन्हेगार गजाआड : साथीदार फरार : पाचपावलीतील घटनेने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अट्टल गुन्हेगारांनी पाचपावलीतील बारमालक परमानंद तलरेजा यांचे अपहरण करून त्यांना तलवारीने मारून गंभीर जखमी केले. बेशुद्धावस्थेतील तलरेजा यांना मृत समजून आरोपींनी एका मैदानात फेकून दिले आणि पळून गेले. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रभर शोधाशोध करून तलरेजा यांना पहाटे गंभीर अवस्थेत ताब्यात घेतले. तत्पूर्वीच चार आरोपींना अटक केली. काही आरोपी फरार आहेत. खंडणी वसुलीसाठी आणि आपली दहशत निर्माण करण्यासाठी हे अपहरण आणि हत्याकांड घडल्याचे पोलीस सांगतात.आकाश चिंचखेडे, मोनू समुद्रे, सौरभ तायवाडे आणि आकाश नागुलकर अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.वैशालीनगरातील रहिवासी तलरेजा यांचा पाचपावलीत कमाल चौकाजवळ बियर बार आहे. रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास ते आपल्या बारसमोर बसून असताना उपरोक्त आरोपी तेथे आले. त्यांनी दारूच्या पैश्यावरून तलरेजा यांच्यासोबत वाद घातला. यानंतर त्यांना खंडणीची मागणी केली. त्यांनी नकार देताच घातक शस्त्राच्या धाकावर आरोपींनी तलरेजा यांना मारहाण करीत फरफटत नेले. काही अंतरावर असलेल्या कुख्यात अजय चिंचखेडेच्या घरी तलरेजा यांना आरोपी घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर तलवारीचे घाव घातल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांचा मृत्यू झाला, असे समजून आरोपींनी बाळाभाऊ पेठेतील ग्राऊंडजवळ नेऊन तलरेजांना फेकून दिले.दरम्यान, आरोपींनी परमानंद तलरेजा यांना शस्त्राच्या धाकावर पळवून नेल्याची माहिती बारमधील एकाने नियंत्रण कक्षात फोन करून कळविली. त्यानंतर पाचपावलीचा पोलीस ताफा बारमध्ये पोहचला. तेथून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी तलरेजा तसेच आरोपींचा शोध घेणे सुरू केले. आजुबाजुच्या पोलीस ठाण्यातही बारमालकाचे कुख्यात गुंडांनी अपहरण केल्याची माहिती कळविण्यात आली. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना पहाटे तीन ते चारच्या सुमारास आरोपींना नंदनवनमध्ये पकडले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तलरेजांबाबत विचारणा करण्यात आली. तलरेजांना बाळाभाऊ पेठेतील एका मैदानात मारून फेकल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले. पोलिसांनी लगेच आरोपींना घेऊन ते मैदान गाठले. तेथे रक्ताच्या थारोळ्यात तलरेजा पडून होते. ते जीवंत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना लगेच एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.मदतीला  धावलेल्यालाही मारलेपोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी कुख्यात गुन्हेगार आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्यांच्यावर एमपीडीएचीही कारवाई केली आहे. या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अजय चिंचखेडे हा १ मार्चलाच कारागृहातून बाहेर आला, हे विशेष!त्यांनी परमानंद यांना मारहाण करून त्यांचे बारसमोरून अपहरण केले, त्यावेळी बाजुला पान टपरी चालविणारा तलरेजा यांच्या मदतीला धावला. ते पाहून आरोपींनी त्या पान टपरीवाल्यालाही मारहाण केली. दरम्यान, पाचपावलीचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. केदारे यांनी प्रतीक परमानंद तलरेजा यांच्या तक्रारीवरून अपहरण करून हत्या करण्याच्या प्रयत्नाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर