शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सदनिका बळकावण्याचा प्रयत्न, मागितली ८० लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 00:31 IST

सदनिकेचे जबरदस्तीने कुलूप तोडून त्यावर कब्जा करणाऱ्या तिघांनी नंतर सदनिका मालकाला मारहाण करून ८० लाखांची खंडणी मागितली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदनिकेचे जबरदस्तीने कुलूप तोडून त्यावर कब्जा करणाऱ्या तिघांनी नंतर सदनिका मालकाला मारहाण करून ८० लाखांची खंडणी मागितली. ४ एप्रिलला घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तब्बल पाच महिन्यानंतर, शुक्रवारी गुन्हा दाखल केला. रामदासपेठमधील रहिवासी पंकज प्रफुलकुमार भन्साली (वय ४८) यांची अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगरमध्ये सुकरांत अपार्टमेंटमध्ये ३०१ क्रमांकाची सदनिका आहे. आरोपी लालचंद वीरभान मोटवानी (वय ३२, रा. मॅजेस्टिक हाईट अपार्टमेंट), समीर शर्मा (वय ३५, कमल बिअरबारजवळ इंदोरा चौक) आणि राकेश रंजन (वय ३५, रा. साहिल ऑप्टिकल, रुफ नाईन धरमपेठ) या तिघांनी ४ एप्रिलला सकाळी ११ च्या सुमारास सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ही माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी भन्साली तेथे पोहोचले. त्यांनी विचारणा केल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करून ही सदनिका आमची आहे, असे सांगितले. तुम्हाला खाली करून पाहिजे असेल तर ८० लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून आरोपींनी भन्साली यांना गालावर आणि पाठीवर मारहाण केली. येथून निघून जा, नाहीतर तुझे अपहरण करून जिवे ठार मारू, अशी धमकीही दिली. याप्रकरणी भन्साली यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. आता तब्बल पाच महिन्यानंतर पोलिसांनी आरोपी मोटवानी, शर्मा आणि रंजन या तिघांविरुद्ध सदनिकेवर कब्जा करून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झाली नाही. तपास सुरू आहे, असे अंबाझरी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी