शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ला प्रकरण : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर सव्वा महिन्यानंतर अंमल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:12 IST

महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आरोपींवर दाखल कलमात वाढ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर नंदनवन पोलिसांनी तब्बल सव्वा महिन्यानंतर अंमल केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आयुक्त कार्यालयामार्फत नंदनवन पोलीस ठाण्याला पोहोचण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले. जिल्हाधिकारीसारख्या अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्र शहरातल्या शहरात पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या पत्रांना पोलीस विभाग किती गांभीर्याने घेत असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देनंदनवन ठाण्याला १५ दिवसानंतर पोहोचले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आरोपींवर दाखल कलमात वाढ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर नंदनवन पोलिसांनी तब्बल सव्वा महिन्यानंतर अंमल केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आयुक्त कार्यालयामार्फत नंदनवन पोलीस ठाण्याला पोहोचण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले. जिल्हाधिकारीसारख्या अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्र शहरातल्या शहरात पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या पत्रांना पोलीस विभाग किती गांभीर्याने घेत असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.२३ एप्रिल रोजी खरबी रोड येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी महसूल विभागाचे पथक गेले होते. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर वाळू माफियाने अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. वाळू माफियाने कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली. तसेच सर्व अवैध ट्रकही पळवून लावले. नंदनवन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळाले नाही. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अनेक तास बसवून ठेवल्याची माहिती आहे. तसेच तक्रारीत नमूद असताना अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केल्याचे कलमच लावले नाही. फक्त आयपीसीचे कलम ३५३ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांचे अवैध वाळू वाहतुकीला पाठबळ असल्याचा आरोप महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांशी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पत्रव्यवहार केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नंदनवन पोलिसांना पाठविले. नंदनवन पोलिसांना १५ दिवसानंतर म्हणजे १८ मे रोजी मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करण्याच्या उद्देशाने आवश्यक बयाण नोंदविण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना बोलावले. मात्र मतमोजणीचे कारण पुढे करीत कर्मचारी गेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर जवळपास सव्वा महिन्याने नंदनवन पोलिसांनी कलमांमध्ये वाढ केली.बयाण न घेताच कलमात वाढजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर तक्रार अधिकारी नायब तहसीलदार सुनील साळवे यांना बयाण नोंदविण्यासाठी नंदनवन पोलिसांनी बोलावले होते. मात्र मतमोजणी असल्याने ते गेले नाही. बयाणच नव्याने नोंदविण्यात आले नसल्याने साळवे यांनी सांगितले. असे असताना पोलिसांनी आयपीसीच्या ३०७, १२० (ब),१५२,५०४,५०६,१०९ व माईन्स अ‍ॅण्ड मिनरल अ‍ॅक्ट १९५७ चे कलम २१ (१), २१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बयाण न घेताच गुन्ह्यात वाढ केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयPolice Stationपोलीस ठाणे