शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ला प्रकरण : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर सव्वा महिन्यानंतर अंमल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:12 IST

महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आरोपींवर दाखल कलमात वाढ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर नंदनवन पोलिसांनी तब्बल सव्वा महिन्यानंतर अंमल केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आयुक्त कार्यालयामार्फत नंदनवन पोलीस ठाण्याला पोहोचण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले. जिल्हाधिकारीसारख्या अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्र शहरातल्या शहरात पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या पत्रांना पोलीस विभाग किती गांभीर्याने घेत असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देनंदनवन ठाण्याला १५ दिवसानंतर पोहोचले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आरोपींवर दाखल कलमात वाढ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर नंदनवन पोलिसांनी तब्बल सव्वा महिन्यानंतर अंमल केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आयुक्त कार्यालयामार्फत नंदनवन पोलीस ठाण्याला पोहोचण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले. जिल्हाधिकारीसारख्या अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्र शहरातल्या शहरात पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या पत्रांना पोलीस विभाग किती गांभीर्याने घेत असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.२३ एप्रिल रोजी खरबी रोड येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी महसूल विभागाचे पथक गेले होते. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर वाळू माफियाने अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. वाळू माफियाने कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली. तसेच सर्व अवैध ट्रकही पळवून लावले. नंदनवन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळाले नाही. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अनेक तास बसवून ठेवल्याची माहिती आहे. तसेच तक्रारीत नमूद असताना अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केल्याचे कलमच लावले नाही. फक्त आयपीसीचे कलम ३५३ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांचे अवैध वाळू वाहतुकीला पाठबळ असल्याचा आरोप महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांशी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पत्रव्यवहार केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नंदनवन पोलिसांना पाठविले. नंदनवन पोलिसांना १५ दिवसानंतर म्हणजे १८ मे रोजी मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करण्याच्या उद्देशाने आवश्यक बयाण नोंदविण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना बोलावले. मात्र मतमोजणीचे कारण पुढे करीत कर्मचारी गेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर जवळपास सव्वा महिन्याने नंदनवन पोलिसांनी कलमांमध्ये वाढ केली.बयाण न घेताच कलमात वाढजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर तक्रार अधिकारी नायब तहसीलदार सुनील साळवे यांना बयाण नोंदविण्यासाठी नंदनवन पोलिसांनी बोलावले होते. मात्र मतमोजणी असल्याने ते गेले नाही. बयाणच नव्याने नोंदविण्यात आले नसल्याने साळवे यांनी सांगितले. असे असताना पोलिसांनी आयपीसीच्या ३०७, १२० (ब),१५२,५०४,५०६,१०९ व माईन्स अ‍ॅण्ड मिनरल अ‍ॅक्ट १९५७ चे कलम २१ (१), २१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बयाण न घेताच गुन्ह्यात वाढ केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयPolice Stationपोलीस ठाणे