शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अटलबहादूर सिंग खरे ‘किंगमेकर’

By admin | Updated: March 3, 2017 02:43 IST

राजकारणात असूनदेखील सरदार अटलबहादूर सिंग यांनी आयुष्यभर मतभिन्नता बाजूला ठेवून सदैव माणसे जोडण्याचे काम केले.

नितीन गडकरी : अमृतमहोत्सवानिमित्त भव्य सत्कारनागपूर : राजकारणात असूनदेखील सरदार अटलबहादूर सिंग यांनी आयुष्यभर मतभिन्नता बाजूला ठेवून सदैव माणसे जोडण्याचे काम केले. त्यांनी संवेदनशीलता जपत नागपुरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक वर्ष तर ते म्हणतील, त्या दिशेने नागपूरचे राजकारण चालले. खऱ्या अर्थाने ते ‘किंगमेकर’ ठरले, या शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी गौरवोद्गार काढले. शहरातील सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका वठविणारे नागपूरचे माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचा अमृतमहोत्सव सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.साई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य, आ.अनिल सोले, आ.जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, महापौर प्रवीण दटके, माजी महापौर कुंदाताई विजयकर, गिरीश गांधी, मोहब्बतसिंग तुली उपस्थित होते. अटलबहादूर सिंग यांनी राजकारणासोबतच शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात स्वत:ची छाप सोडली. प्रत्येकाला ते आपले वाटतात. वेगवेगळ्या पक्षात असूनदेखील सामाजिक मंचांवर एकत्र येण्याची परंपरा त्यांनी वेगाने समोर नेली. त्यांचे नागपूर नगरीवर मोठे ऋणच आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.अटलबहादूर सिंग यांचा रिपब्लिकन चळवळीशीदेखील जवळचा संबंध राहिला आहे. राजकारणी कसा असावा याचे त्यांनी उदाहरणच मांडले, असे प्रतिपादन जोगेंद्र कवाडे यांनी केले. यावेळी नागपूर महानगरपालिकेतर्फेदेखील अटलबहादूर सिंग यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भावी महापौर नंदा जिचकार यादेखील यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला हरिभाऊ केदार, उमेश चौबे, भाऊ लोखंडे, मधुकर वासनिक, रोमिला महाजन हेदेखील उपस्थित होते. डॉ. सतीश चतुर्वेदी यांनी अटलबहादूर सिंग यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. नितीन राऊत यांनी संचालन केले तर कुंदाताई विजयकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी यावेळी अटलबहादूर सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मांडले. अटलबहादूर सिंग हे एक ‘जिंदादिल’ व्यक्ती आहेत. त्यांच्या स्वभावगुणांमुळे ते अलौकिक कर्तृत्वाचे धनी झाले. त्यांचा अनेकांशी वैचारिक संघर्ष राहिला. मात्र कुणाशीही मनभेद झाले नाहीत. खऱ्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्त्व हे विराट राहिले, अशा भावना दर्डा यांनी बोलून दाखविल्या. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांचादेखील अटलबहादूर सिंग यांच्यावर विशेष जिव्हाळा होता, ही आठवणदेखील दर्डा यांनी सांगितली. १९९४ साली सकल जैन समाजातर्फे नागपुरात जैन साध्वी प्रीतीसुधाजी महाराज यांच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हेदेखील त्या कार्यक्रमात आले होते. प्रीतीसुधाजींना नागपुरात येण्याची विनंती करण्यासाठी अटलबहादूर सिंग स्वत: गेले होते. अटलबहादूर सिंग यांनी कधीही जातपात मानली नाही व सर्व धर्म-पंथ त्यांच्यासाठी समान आहेत, असे दर्डा म्हणाले.(प्रतिनिधी)दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्नयावेळी अटलबहादूर सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केला. मी आयुष्यात अनेक जोडले. मैत्री व जिव्हाळा माझ्यासाठी खूप काही आहे. म्हणूनच मी दिलेला शब्द पाळण्याचाच प्रयत्न करतो. डोक्यावरील पगडी व दिलेला शब्द हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. नागपूर नगरीने मला घडविले.माझ्यावर संस्कार केले. आज नागपुरात माझ्या जवळचा एकही नातेवाईक नाही. मला सगळे पंजाबमध्ये बोलवतात. मात्र मी कधीच नागपूरला सोडणार नाही, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.