शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तर रेशन दुकानदारांवर लावणार ‘एस्मा’ : प्रशासन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:48 IST

कोविड-१९ चे संकट राज्यावर असताना, सार्वजनिक वितरण व्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेशन दुकानदार संघटनांनी १ जूनपासून संप पुकारला आहे. रेशन दुकानदारांच्या संपाबाबत प्रशासन गंभीर असून, आपत्तीच्या काळात अडवणुकीचा प्रकार न्यायोचित नाही, अशी भूमिका घेत ‘एस्मा’ लावण्याचा इशाराही दिला आहे.

ठळक मुद्देआपत्तीच्या काळात अडवणूक न्यायोचित नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ चे संकट राज्यावर असताना, सार्वजनिक वितरण व्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेशन दुकानदार संघटनांनी १ जूनपासून संप पुकारला आहे. रेशन दुकानदारांच्या संपाबाबत प्रशासन गंभीर असून, आपत्तीच्या काळात अडवणुकीचा प्रकार न्यायोचित नाही, अशी भूमिका घेत ‘एस्मा’ लावण्याचा इशाराही दिला आहे.रेशन दुकानदार संघटनेने केलेल्या मागणीनुसार त्यांच्या सुरक्षेचा विचार करून ५० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण द्यावे. रेशन दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मासिक ३० ते ४० हजार रुपये वेतन द्यावे या मागण्या केल्या आहेत. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागाच्या सचिवांसोबत यासंदर्भात चर्चा केली आहे. अन्न पुरवठा विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार रेशन दुकानदारांच्या मागण्या प्रशासनाला मान्य नाहीत. शासनाने त्यांना जो परवाना दिला आहे, तो त्यांची उपजीविका व कुटुंब चालविण्यासाठी दिला आहे. कार्डधारकांना रेशन उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारीच आहे. प्रशासनाने त्यांना कोविड-१९ चे संक्रमण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. ५० लाख रुपयांचा विमा काढणे प्रशासनाला मान्य नाही. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे शक्यच नाही, अशीही प्रशासनाने भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या मते रेशन दुकानदार संघटनेने आपत्तीच्या काळात अडवणुकीची भूमिका घेतल्यास त्यांच्यावर ‘एस्मा’अन्वये कारवाई करून, परवाने रद्द करण्याचा शासनाचा मानस आहे.रेशन दुकानदारांनी दुकानांना कुलूप न लावता, जून महिन्याचे धान्य कार्डधारकांना वाटप करावे. ज्या मागण्या शासन नियमात बसत नाहीत, त्यावर अडून न राहता, तडजोडीची भूमिका ठेवण्याचेही आवाहन केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Strikeसंपfoodअन्न