शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

‘नोगा’च्या खासगीकरणासाठी उद्योजकांकडून विचारणा; आक्रमक विपणन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 09:35 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांची मागणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर ‘नोगा’च्या (नागपूर आॅरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन) खासगीकरणासाठी उद्योजकांकडून विचारणा सुरू आहे.

ठळक मुद्देगडकरींची मागणी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांची मागणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर ‘नोगा’च्या (नागपूर आॅरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन) खासगीकरणासाठी उद्योजकांकडून विचारणा सुरू आहे. कुणी पुढे आल्यास त्यांना मदत करण्यासाठी ‘नोगा’चे अधिकारी सज्ज आहेत. नागपुरी संत्रा आणि त्यापासून तयार केलेली गुणवत्तेची उत्पादने राष्ट्रीय आणि जागतिकस्तरावर नेण्याचा गडकरी यांचा प्रयत्न आहे.‘नोगा’ची उत्पादने १०० टक्के शुद्ध‘नोगा’मध्ये उत्पादने तयार करण्यासाठी कच्चा माल शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येतो. संत्री, अननस आणि अन्य फळांपासून जवळपास सर्वोत्तम प्रतिची ५० उत्पादने तयार करण्यात येतात. पण तयार मालाच्या विक्रीसाठी ‘नोगा’कडे मॅगी किंवा किसान कंपनीसारखी कुठलीही आक्रमक विपणन व्यवस्था नाही. विपणनाअभावी स्पर्धेत टिकणे कठीण आहे; शिवाय राज्य शासनाचा फारसा पाठिंबा नसल्यामुळे ‘नोगा’ तोट्यात आहे. सध्या ६० कर्मचारी कार्यरत असून सीझनमध्ये १५० जणांची चमू असते. कोका कोला, जैन फूड, नोगा यांच्या संयुक्त प्रयत्नातून संत्र्याची उत्पादने बाजारात आणण्याचे गडकरींचे स्वप्न आहे, पण अजूनही प्रत्यक्षात आले नाही. ५१ टक्के वाट्यानुसार उद्योजकाला संचालनाचे अधिकार मिळाले तर ‘नोगा’ची निश्चितच भरभराट होईल, नागपुरी संत्र्याला मार्केट मिळेल आणि तो जागतिकस्तरावर जाईल, या गडकरी यांच्या संकल्पनेतूनच पुढे आलेला खासगीकरणाचा पर्याय सर्वोत्तम असल्याचे सूत्रांनी सांगितले.५१:४९ चा फॉर्म्युलालोकमतच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी यांनी तोट्यातील ‘नोगा’ला पुनरुज्जीवित करण्याची मागणी करतानाच प्रकल्पाचे संचालन खासगीरीत्या करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यात ५१ टक्के वाटा खासगी तर ४९ टक्के वाटा राज्य शासनाने आपल्याकडे ठेवण्याचे सुचविले होते. खासगी क्षेत्राकडून सक्षम मार्केटिंग झाल्यास नागपुरी संत्री आणि त्यापासून तयार केलेली उत्पादने जागतिकस्तरावर पोहोचतील, अशी संकल्पना गडकरी यांनी मांडली होती. त्यावेळी गडकरी यांची मागणी मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी ‘नोगा’ला पुनरुज्जीवित करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला २५ दिवस झाले आहेत. सक्षम उद्योजकाला आणण्यासाठी उच्चस्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.मोतीबाग येथे ५ एकर जागापूर्वी मोतीबाग येथील ५ एकरातील ‘नोगा’ कारखान्यात हजार कर्मचारी कार्यरत होते. हा कारखाना २००८ मध्ये हिंगणा नाक्याजवळील २ एकर जागेत शिफ्ट करण्यात आला. मोतीबाग येथील कारखान्याची सुरुवात १९४२ मध्ये सेंट्रल हिंदुस्थान आॅरेंज कोल्ड स्टोरेज (चॉक्स) या नावाने झाली. १९६० मध्ये नागपूर आॅरेंज ग्रोअर्स असोसिएशन (नोगा) या सहकारी संस्थेने चालवायला घेतला. पण सततच्या तोट्यामुळे संस्थेने कारखाना चालविण्याची विनंती राज्य शासनाकडे केली. त्यानुसार १९७२ पासून राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे (एमएआयडीसी) ‘नोगा’चे संचालन करण्यात येते. प्रारंभी कारखाना नफ्यात होता. पण जागतिकीकरणाच्या रेट्यात तोट्यात गेला. कारखाना उद्योजकाच्या हातात गेल्यास सुगीचे दिवस येतील, असे सूत्रांनी सांगितले... तर कारखाना येणार नफ्यातराज्य शासनाच्या इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (आयसीडीएस) कार्यक्रमांतर्गत सहा वर्षांखालील शाळकरी मुलांना आणि त्यांच्या मातांना सकस आणि पोषक आहार देण्याच्या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत उत्पादने निर्मितीची काही कामे ‘नोगा’ला दिल्यास हा कारखाना तोट्यातून नफ्यात येईल. पण शासनाच्या दुर्लक्षतेमुळे कारखाना सतत तोट्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी