शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘नोगा’च्या खासगीकरणासाठी उद्योजकांकडून विचारणा; आक्रमक विपणन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 09:35 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांची मागणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर ‘नोगा’च्या (नागपूर आॅरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन) खासगीकरणासाठी उद्योजकांकडून विचारणा सुरू आहे.

ठळक मुद्देगडकरींची मागणी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांची मागणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर ‘नोगा’च्या (नागपूर आॅरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन) खासगीकरणासाठी उद्योजकांकडून विचारणा सुरू आहे. कुणी पुढे आल्यास त्यांना मदत करण्यासाठी ‘नोगा’चे अधिकारी सज्ज आहेत. नागपुरी संत्रा आणि त्यापासून तयार केलेली गुणवत्तेची उत्पादने राष्ट्रीय आणि जागतिकस्तरावर नेण्याचा गडकरी यांचा प्रयत्न आहे.‘नोगा’ची उत्पादने १०० टक्के शुद्ध‘नोगा’मध्ये उत्पादने तयार करण्यासाठी कच्चा माल शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येतो. संत्री, अननस आणि अन्य फळांपासून जवळपास सर्वोत्तम प्रतिची ५० उत्पादने तयार करण्यात येतात. पण तयार मालाच्या विक्रीसाठी ‘नोगा’कडे मॅगी किंवा किसान कंपनीसारखी कुठलीही आक्रमक विपणन व्यवस्था नाही. विपणनाअभावी स्पर्धेत टिकणे कठीण आहे; शिवाय राज्य शासनाचा फारसा पाठिंबा नसल्यामुळे ‘नोगा’ तोट्यात आहे. सध्या ६० कर्मचारी कार्यरत असून सीझनमध्ये १५० जणांची चमू असते. कोका कोला, जैन फूड, नोगा यांच्या संयुक्त प्रयत्नातून संत्र्याची उत्पादने बाजारात आणण्याचे गडकरींचे स्वप्न आहे, पण अजूनही प्रत्यक्षात आले नाही. ५१ टक्के वाट्यानुसार उद्योजकाला संचालनाचे अधिकार मिळाले तर ‘नोगा’ची निश्चितच भरभराट होईल, नागपुरी संत्र्याला मार्केट मिळेल आणि तो जागतिकस्तरावर जाईल, या गडकरी यांच्या संकल्पनेतूनच पुढे आलेला खासगीकरणाचा पर्याय सर्वोत्तम असल्याचे सूत्रांनी सांगितले.५१:४९ चा फॉर्म्युलालोकमतच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी यांनी तोट्यातील ‘नोगा’ला पुनरुज्जीवित करण्याची मागणी करतानाच प्रकल्पाचे संचालन खासगीरीत्या करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यात ५१ टक्के वाटा खासगी तर ४९ टक्के वाटा राज्य शासनाने आपल्याकडे ठेवण्याचे सुचविले होते. खासगी क्षेत्राकडून सक्षम मार्केटिंग झाल्यास नागपुरी संत्री आणि त्यापासून तयार केलेली उत्पादने जागतिकस्तरावर पोहोचतील, अशी संकल्पना गडकरी यांनी मांडली होती. त्यावेळी गडकरी यांची मागणी मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी ‘नोगा’ला पुनरुज्जीवित करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला २५ दिवस झाले आहेत. सक्षम उद्योजकाला आणण्यासाठी उच्चस्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.मोतीबाग येथे ५ एकर जागापूर्वी मोतीबाग येथील ५ एकरातील ‘नोगा’ कारखान्यात हजार कर्मचारी कार्यरत होते. हा कारखाना २००८ मध्ये हिंगणा नाक्याजवळील २ एकर जागेत शिफ्ट करण्यात आला. मोतीबाग येथील कारखान्याची सुरुवात १९४२ मध्ये सेंट्रल हिंदुस्थान आॅरेंज कोल्ड स्टोरेज (चॉक्स) या नावाने झाली. १९६० मध्ये नागपूर आॅरेंज ग्रोअर्स असोसिएशन (नोगा) या सहकारी संस्थेने चालवायला घेतला. पण सततच्या तोट्यामुळे संस्थेने कारखाना चालविण्याची विनंती राज्य शासनाकडे केली. त्यानुसार १९७२ पासून राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे (एमएआयडीसी) ‘नोगा’चे संचालन करण्यात येते. प्रारंभी कारखाना नफ्यात होता. पण जागतिकीकरणाच्या रेट्यात तोट्यात गेला. कारखाना उद्योजकाच्या हातात गेल्यास सुगीचे दिवस येतील, असे सूत्रांनी सांगितले... तर कारखाना येणार नफ्यातराज्य शासनाच्या इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस (आयसीडीएस) कार्यक्रमांतर्गत सहा वर्षांखालील शाळकरी मुलांना आणि त्यांच्या मातांना सकस आणि पोषक आहार देण्याच्या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत उत्पादने निर्मितीची काही कामे ‘नोगा’ला दिल्यास हा कारखाना तोट्यातून नफ्यात येईल. पण शासनाच्या दुर्लक्षतेमुळे कारखाना सतत तोट्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी