शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पैसे मागितले, सायकल घेतली, प्रवास सुरू केला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:03 IST

लॉकडाऊन संपेल, गाड्या सुरू होतील आणि आपण गावी जाऊ, हा विचार करीत दोन महिने उलटले पण ते झालेच नाही. उलट जवळचे सर्व पैसे संपले. आता राहायचे कसे, खायचे काय असे अनेक प्रश्न पुढे होते. शेवटी घरून पैसे मागविले, त्यातून वेळेवर सायकल विकत घेतली आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन संपेल, गाड्या सुरू होतील आणि आपण गावी जाऊ, हा विचार करीत दोन महिने उलटले पण ते झालेच नाही. उलट जवळचे सर्व पैसे संपले. आता राहायचे कसे, खायचे काय असे अनेक प्रश्न पुढे होते. शेवटी घरून पैसे मागविले, त्यातून वेळेवर सायकल विकत घेतली आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला.उत्तराखंडचा प्रेम कुमार आणि हिमाचल प्रदेशचे विवेक व अजयकुमार हैदराबाद येथे कंपनीत नोकरीला होते. ८ मे रोजी हैदराबादहून प्रवास सुरू करीत गुरुवारी ते नागपूरला पोहचले. पांजरी टोल नाक्याजवळ प्रशासनाच्या केंद्रावर गाडीची व्यवस्था होईल या आशेने थांबलेल्या या तरुणांना लोकमत प्रतिनिधीने बोलते केले. २० हजार रुपये पगार. मार्च महिन्याचा अर्धा पगार कंपनीने दिला. त्या भरवशावर पुढचे दिवस गेले. खोलीचे भाडे, जेवण व इतर खर्चात जवळचे पैसे संपले. लॉकडाऊन संपेल आणि काम पुन्हा सुरू होईल, ही अशा दिवसागणिक संपुष्टात आली. जवळ पैसे उरले नाहीत. आतापर्यंत घरी पैसे पाठवीत होतो पण आता पैसे मागविण्याची परिस्थिती आली. सोबतचे सर्व तरुण मिळेल त्या साधनाने निघून गेले. आम्ही तिघे जण उरलो. गावी जाण्यास काही वाहन मिळेल ही आशाही संपली. वेळेवर ४५०० रुपये याप्रमाणे तीन सायकल घेतल्या आणि प्रवास सुरूकेला. सोबत शेंगदाणे, बिस्कीट आणि काही इतर खायचे साहित्य घेतले. याच आधारावर पोटाची गरज भागवत इथपर्यंत प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात मिळाली मदततेलंगणा संपेपर्यंत कुठेही कोणतीही मदत मिळाली नाही. महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर काही लोकांनी मदत केली. पाणी दिले आणि जेवणही मिळाले. बसने थोड्या अंतराचा प्रवास झाला. त्यामुळे थोडा दिलासा मिळाल्याची भावना प्रेम कुमारने व्यक्त केली.सायकलमध्ये अडकला जीव!पांजरा नाक्यावर मध्य प्रदेश सीमेपर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे उत्तराखंड व हिमाचलसाठी गाडीची विचारपूस केली असता रेल्वे स्टेशनवरून ट्रेन मिळेल असे सांगण्यात आले. पण सायकल घेऊन जाण्यास नकार देण्यात आला. वेळेवर १३,५०० रु. खर्च करून घेतलेल्या नवीन सायकल कशा सोडून द्यायच्या, या विचाराने त्यांच्या जीवाची घालमेल सुरू होती. सायकलने पुढचा प्रवास करण्याचे त्राण अंगात नाही आणि ती सोडायचीही इच्छा नाही. मात्र सायकल नेण्याची व्यवस्था झाली नाही तर गाडी सोडून सायकलनेच गावापर्यंतचा प्रवास करू, अशी व्यथा त्या तरुणांनी मांडली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस