शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पैसे मागितले, सायकल घेतली, प्रवास सुरू केला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:03 IST

लॉकडाऊन संपेल, गाड्या सुरू होतील आणि आपण गावी जाऊ, हा विचार करीत दोन महिने उलटले पण ते झालेच नाही. उलट जवळचे सर्व पैसे संपले. आता राहायचे कसे, खायचे काय असे अनेक प्रश्न पुढे होते. शेवटी घरून पैसे मागविले, त्यातून वेळेवर सायकल विकत घेतली आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन संपेल, गाड्या सुरू होतील आणि आपण गावी जाऊ, हा विचार करीत दोन महिने उलटले पण ते झालेच नाही. उलट जवळचे सर्व पैसे संपले. आता राहायचे कसे, खायचे काय असे अनेक प्रश्न पुढे होते. शेवटी घरून पैसे मागविले, त्यातून वेळेवर सायकल विकत घेतली आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला.उत्तराखंडचा प्रेम कुमार आणि हिमाचल प्रदेशचे विवेक व अजयकुमार हैदराबाद येथे कंपनीत नोकरीला होते. ८ मे रोजी हैदराबादहून प्रवास सुरू करीत गुरुवारी ते नागपूरला पोहचले. पांजरी टोल नाक्याजवळ प्रशासनाच्या केंद्रावर गाडीची व्यवस्था होईल या आशेने थांबलेल्या या तरुणांना लोकमत प्रतिनिधीने बोलते केले. २० हजार रुपये पगार. मार्च महिन्याचा अर्धा पगार कंपनीने दिला. त्या भरवशावर पुढचे दिवस गेले. खोलीचे भाडे, जेवण व इतर खर्चात जवळचे पैसे संपले. लॉकडाऊन संपेल आणि काम पुन्हा सुरू होईल, ही अशा दिवसागणिक संपुष्टात आली. जवळ पैसे उरले नाहीत. आतापर्यंत घरी पैसे पाठवीत होतो पण आता पैसे मागविण्याची परिस्थिती आली. सोबतचे सर्व तरुण मिळेल त्या साधनाने निघून गेले. आम्ही तिघे जण उरलो. गावी जाण्यास काही वाहन मिळेल ही आशाही संपली. वेळेवर ४५०० रुपये याप्रमाणे तीन सायकल घेतल्या आणि प्रवास सुरूकेला. सोबत शेंगदाणे, बिस्कीट आणि काही इतर खायचे साहित्य घेतले. याच आधारावर पोटाची गरज भागवत इथपर्यंत प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात मिळाली मदततेलंगणा संपेपर्यंत कुठेही कोणतीही मदत मिळाली नाही. महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर काही लोकांनी मदत केली. पाणी दिले आणि जेवणही मिळाले. बसने थोड्या अंतराचा प्रवास झाला. त्यामुळे थोडा दिलासा मिळाल्याची भावना प्रेम कुमारने व्यक्त केली.सायकलमध्ये अडकला जीव!पांजरा नाक्यावर मध्य प्रदेश सीमेपर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे उत्तराखंड व हिमाचलसाठी गाडीची विचारपूस केली असता रेल्वे स्टेशनवरून ट्रेन मिळेल असे सांगण्यात आले. पण सायकल घेऊन जाण्यास नकार देण्यात आला. वेळेवर १३,५०० रु. खर्च करून घेतलेल्या नवीन सायकल कशा सोडून द्यायच्या, या विचाराने त्यांच्या जीवाची घालमेल सुरू होती. सायकलने पुढचा प्रवास करण्याचे त्राण अंगात नाही आणि ती सोडायचीही इच्छा नाही. मात्र सायकल नेण्याची व्यवस्था झाली नाही तर गाडी सोडून सायकलनेच गावापर्यंतचा प्रवास करू, अशी व्यथा त्या तरुणांनी मांडली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस