शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पैसे मागितले, सायकल घेतली, प्रवास सुरू केला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:03 IST

लॉकडाऊन संपेल, गाड्या सुरू होतील आणि आपण गावी जाऊ, हा विचार करीत दोन महिने उलटले पण ते झालेच नाही. उलट जवळचे सर्व पैसे संपले. आता राहायचे कसे, खायचे काय असे अनेक प्रश्न पुढे होते. शेवटी घरून पैसे मागविले, त्यातून वेळेवर सायकल विकत घेतली आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन संपेल, गाड्या सुरू होतील आणि आपण गावी जाऊ, हा विचार करीत दोन महिने उलटले पण ते झालेच नाही. उलट जवळचे सर्व पैसे संपले. आता राहायचे कसे, खायचे काय असे अनेक प्रश्न पुढे होते. शेवटी घरून पैसे मागविले, त्यातून वेळेवर सायकल विकत घेतली आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला.उत्तराखंडचा प्रेम कुमार आणि हिमाचल प्रदेशचे विवेक व अजयकुमार हैदराबाद येथे कंपनीत नोकरीला होते. ८ मे रोजी हैदराबादहून प्रवास सुरू करीत गुरुवारी ते नागपूरला पोहचले. पांजरी टोल नाक्याजवळ प्रशासनाच्या केंद्रावर गाडीची व्यवस्था होईल या आशेने थांबलेल्या या तरुणांना लोकमत प्रतिनिधीने बोलते केले. २० हजार रुपये पगार. मार्च महिन्याचा अर्धा पगार कंपनीने दिला. त्या भरवशावर पुढचे दिवस गेले. खोलीचे भाडे, जेवण व इतर खर्चात जवळचे पैसे संपले. लॉकडाऊन संपेल आणि काम पुन्हा सुरू होईल, ही अशा दिवसागणिक संपुष्टात आली. जवळ पैसे उरले नाहीत. आतापर्यंत घरी पैसे पाठवीत होतो पण आता पैसे मागविण्याची परिस्थिती आली. सोबतचे सर्व तरुण मिळेल त्या साधनाने निघून गेले. आम्ही तिघे जण उरलो. गावी जाण्यास काही वाहन मिळेल ही आशाही संपली. वेळेवर ४५०० रुपये याप्रमाणे तीन सायकल घेतल्या आणि प्रवास सुरूकेला. सोबत शेंगदाणे, बिस्कीट आणि काही इतर खायचे साहित्य घेतले. याच आधारावर पोटाची गरज भागवत इथपर्यंत प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात मिळाली मदततेलंगणा संपेपर्यंत कुठेही कोणतीही मदत मिळाली नाही. महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर काही लोकांनी मदत केली. पाणी दिले आणि जेवणही मिळाले. बसने थोड्या अंतराचा प्रवास झाला. त्यामुळे थोडा दिलासा मिळाल्याची भावना प्रेम कुमारने व्यक्त केली.सायकलमध्ये अडकला जीव!पांजरा नाक्यावर मध्य प्रदेश सीमेपर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे उत्तराखंड व हिमाचलसाठी गाडीची विचारपूस केली असता रेल्वे स्टेशनवरून ट्रेन मिळेल असे सांगण्यात आले. पण सायकल घेऊन जाण्यास नकार देण्यात आला. वेळेवर १३,५०० रु. खर्च करून घेतलेल्या नवीन सायकल कशा सोडून द्यायच्या, या विचाराने त्यांच्या जीवाची घालमेल सुरू होती. सायकलने पुढचा प्रवास करण्याचे त्राण अंगात नाही आणि ती सोडायचीही इच्छा नाही. मात्र सायकल नेण्याची व्यवस्था झाली नाही तर गाडी सोडून सायकलनेच गावापर्यंतचा प्रवास करू, अशी व्यथा त्या तरुणांनी मांडली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस