शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

अश्वघोषाने भारतीय विचार मांडला, फुटीरतावाद्यांनी त्याला वेगळ्या गटात नेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 21:44 IST

Nagpur News शास्त्रांतील तटस्थ विचारांचा आधार घेत फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावून त्याला वेगळ्या गटात नेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे दिली.

ठळक मुद्दे मदन कुळकर्णी-रेणुका बोकारे यांच्या ‘वज्रसूची टंक’ ग्रंथाचे प्रकाशन

नागपूर : सामाजिक भेदभाव मानणाऱ्यांच्या विरुद्ध बोलणारे सारेच आदर्श चरित्र आहेत. अश्वघोषाने ‘वज्रसूची उपनिषद’मध्ये याच भेदांचा विरोध करणारे सारे आकलन व संदर्भ प्राचीन भारतीय सनातन वैदिक ग्रंथाच्या आधारेच मांडले आहे. परंतु, त्याच शास्त्रांतील तटस्थ विचारांचा आधार घेत फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावून त्याला वेगळ्या गटात नेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे दिली.

शुक्रवारी विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोकारे संशोधित ‘वज्रसूची टंक’ या ग्रंथाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते मंडळाच्या डॉ. वा. वि. मिराशी सभागृहात करण्यात आले. व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, मंडळाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे उपस्थित होते.

जगभरातील सर्वच समाजात पूर्वजांनी चुका केल्या आहेत. याचा अर्थ ते सारेच कुटिल होते असे नाही. आपल्या देशातही हेच झाले. शास्त्र (कायदा) आणि मनुष्य, यात मनुष्य श्रेष्ठ आहे. परंतु, सामाजिक संतुलनासाठी कायदा पाळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कर्तव्यरूपी धर्म पाळणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच धर्म सर्वश्रेष्ठ मानला जातो. संतुलित व्यवहार शिकविण्यासाठीचे कर्तव्य म्हणजेच धर्म होय. महाभारत, रामायण, उपनिषदे आदी भारतीय शास्त्रांमध्ये अतिशय तटस्थतेने प्रत्येक विचार प्रस्थापित करण्यात आला आहे. त्यात नायक आणि खलनायकाचे विचारही तटस्थ विचार प्रक्षेपित झाले आहेत. परंतु, खलनायकाच्या विचारांवर जोर देऊन इंग्रज व अन्य फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावली आणि हेच भारतीय विचार असल्याचे बिंबविले आणि त्यात साराच समाज भ्रमिष्ट झाल्याने वाणीविवेक व कृतिविवेकाने पुढे जाणे गरजेचे असल्याचे डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव हळदे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले.

...........................

टॅग्स :literatureसाहित्य