शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अश्वघोषाने भारतीय विचार मांडला, फुटीरतावाद्यांनी त्याला वेगळ्या गटात नेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 21:44 IST

Nagpur News शास्त्रांतील तटस्थ विचारांचा आधार घेत फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावून त्याला वेगळ्या गटात नेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे दिली.

ठळक मुद्दे मदन कुळकर्णी-रेणुका बोकारे यांच्या ‘वज्रसूची टंक’ ग्रंथाचे प्रकाशन

नागपूर : सामाजिक भेदभाव मानणाऱ्यांच्या विरुद्ध बोलणारे सारेच आदर्श चरित्र आहेत. अश्वघोषाने ‘वज्रसूची उपनिषद’मध्ये याच भेदांचा विरोध करणारे सारे आकलन व संदर्भ प्राचीन भारतीय सनातन वैदिक ग्रंथाच्या आधारेच मांडले आहे. परंतु, त्याच शास्त्रांतील तटस्थ विचारांचा आधार घेत फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावून त्याला वेगळ्या गटात नेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे दिली.

शुक्रवारी विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोकारे संशोधित ‘वज्रसूची टंक’ या ग्रंथाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते मंडळाच्या डॉ. वा. वि. मिराशी सभागृहात करण्यात आले. व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, मंडळाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे उपस्थित होते.

जगभरातील सर्वच समाजात पूर्वजांनी चुका केल्या आहेत. याचा अर्थ ते सारेच कुटिल होते असे नाही. आपल्या देशातही हेच झाले. शास्त्र (कायदा) आणि मनुष्य, यात मनुष्य श्रेष्ठ आहे. परंतु, सामाजिक संतुलनासाठी कायदा पाळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कर्तव्यरूपी धर्म पाळणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच धर्म सर्वश्रेष्ठ मानला जातो. संतुलित व्यवहार शिकविण्यासाठीचे कर्तव्य म्हणजेच धर्म होय. महाभारत, रामायण, उपनिषदे आदी भारतीय शास्त्रांमध्ये अतिशय तटस्थतेने प्रत्येक विचार प्रस्थापित करण्यात आला आहे. त्यात नायक आणि खलनायकाचे विचारही तटस्थ विचार प्रक्षेपित झाले आहेत. परंतु, खलनायकाच्या विचारांवर जोर देऊन इंग्रज व अन्य फुटीरतावाद्यांनी लोकांची माथी भडकावली आणि हेच भारतीय विचार असल्याचे बिंबविले आणि त्यात साराच समाज भ्रमिष्ट झाल्याने वाणीविवेक व कृतिविवेकाने पुढे जाणे गरजेचे असल्याचे डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव हळदे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी केले.

...........................

टॅग्स :literatureसाहित्य