शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

आष्टनकर कुटुंबात नव‘चैतन्य’

By admin | Updated: January 10, 2016 03:26 IST

गुरुवारी नागपुरात एकच चर्चा होती. ती म्हणजे चैतन्य या १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाची. ज्या पॉप्युलर सोसायटीमध्ये तो राहत होता, ...

पॉप्युलर सोसायटी सुखावली : शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी नागपूर : गुरुवारी नागपुरात एकच चर्चा होती. ती म्हणजे चैतन्य या १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाची. ज्या पॉप्युलर सोसायटीमध्ये तो राहत होता, तेथे तर जणू आपल्या घरातीलच मुलाचे अपहरण झाल्याचे वातावरण होते. चैतन्यचे आई-वडील आणि बहिणींची स्थिती आणखीनच बिकट झाली होती. परंतु शुक्रवारी रात्री अपहृत चैतन्य अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप घरी परतला आणि आष्टनकर कुटुबीयांना जीवनातील सर्वात सुंदर आनंद मिळाला. आष्टनकर कुटुंबीयासह संपूर्ण पॉप्युलर सोसायटी सुखावली. आष्टनकर कुटुंबीयांनी शनिवारी आनंदोत्सव साजरा केला. सुभाष आणि सुनंदा आष्टनकर या शिक्षक दाम्पत्याचा १४ वर्षीय मुलगा चैतन्य याचे गुरुवारी दुपारी त्याच्या घराजवळूनच अपहरण करण्यात आले होते. त्याचा वर्गमित्र गौरवच्या समोरच अपहरणकर्त्यांनी त्याला व्हॅनमध्ये डांबून नेले होते. आष्टनकर यांना दोन मुली आणि चैतन्य हा एकमेव मुलगा होता. एकमेव मुलाचे अपहरण झाल्याने आष्टनकर कुटुंबीय घाबरून गेले होते. मुलाचे काही बरे वाईट तर होणार नाही, ना या भीतीने त्यांना ग्रासले होते. आष्टनकर कुटुंबीयांचे संपूर्ण नातलग, ओळखीच्या व्यक्ती आणि परिसरातील नागरिकांनी आष्टनकर यांच्या घरी येऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. चैतन्य सुखरूप परत येईल, असा विश्वास दिला. चैतन्यचे वडील सुभाष आष्टनकर हे दिवसभर पोलिसांसोबतच फिरत राहिले. पोलिसांनी सुद्धा आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली. अखेर शक्रवारी रात्री चैतन्यचा शोध लागला. त्याला सुखरूप घरी आणण्यात आले. चैतन्यला सुखरूप पाहून आई वडील, बहिणींसह संपूर्ण आष्टनकर कुटुंबीयांसाठी दसरा-दिवाळीपेक्षाही मोठा आनंदाचा क्षण ठरला. आष्टनकर यांच्या घरी संपूर्ण नातलग जमा झाले होते. शनिवारी सकाळपासूनच लोकांचे येणे सुरु होते. लोक भेट देऊन विचारपूस करून मुलगा सुखरूप परतल्याबद्दल शुभेच्छाही देत होते. मंदिरात जाऊन केली पूजा चैतन्य सुखरूप परत आल्याचा आनंद सर्वांनाच होता. शनिवारी सकाळपासून मीडियाच्या मंडळींनी सुद्धा आष्टनकर यांच्या घरी गर्दी केली. दुपारपर्यंतचा वेळ हा मीडियाला मुलाखती व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यातच गेला. त्यानंतर अंघोळ करून सुभाष आष्टनकर चैतन्यला घेऊन जवळच्या मारुतीच्या मंदिरात गेले आणि तिथे पूजा केली.