शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

नागपुरात गाभारे सजले, विठ्ठलभक्तांना दर्शनाची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 08:05 IST

लॉकडाऊनच्या काळातही शेकडो भक्तांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. शहरातील सर्वच मंदिरांनी पारंपरिक सोहळे रद्द करून यंदा साधेपणाने आषाढी एकादशीचे पर्व साजरे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हजारो वारकरी पंढरपूरला जाण्यापासून वंचित राहिले. अनेकांची वारी हुकली तरी, गावातील मंदिरात असलेल्या विठुरायाचे दर्शन घेऊन विठ्ठलभक्तांनी आपल्या मनीची आस पूर्ण केली. लॉकडाऊनच्या काळातही शेकडो भक्तांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. शहरातील सर्वच मंदिरांनी पारंपरिक सोहळे रद्द करून यंदा साधेपणाने आषाढी एकादशीचे पर्व साजरे केले.भारतमाता चौक विठ्ठल रुख्मिणी मंदिरभारतमाता चौकातील ३५० वर्षे पुरातन संत उपासराव महाराज मठामधील विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्ये शेकडो भक्तांनी दिवसभरात दर्शन घेतले. सुरक्षा आणि फिजिकल डिस्टन्स पाळून भक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. यंदा प्रथमच मंदिराच्या वतीने साधेपणाने आषाढी एकादशीचे पर्व पार पडले. पहाटे मूर्तीला स्नान, काकडा, भजनादी कार्यक्रम करण्यात आले. सायंकाळी हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम झाला. दरवर्षी दिंडीचा प्रघात आहे. यंदा तो रद्द करण्यात आला.लक्ष्मीनारायण मंदिर (भोसलेकालीन)सक्करदरा येथील पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर (भोसलेकालीन) येथे यंदा पूर्वापार परंपरांना फाटा देऊन प्रथमच साधेपणाने आषाढीचा कार्यक्रम पार पडला. पहाटे ३.३० वाजता मूर्तीला अभिषेक करण्यात आला. मूर्तीला साज चढवून तुळशीमाळांनी सुशोभित करण्यात आले. शिवलिंगाची आणि लक्ष्मीनारायण मूर्तीचीही सजावट करण्यात आली. सायंकाळी आरतीनंतर मंदिर बंद करण्यात आले. दुपारपर्यंत सुमारे ४०० वर भक्तांनी भेटी दिल्या.नबाबपुरा विठ्ठल रुख्मिणी मंदिरनबाबपुरा येथील भुतेश्वर मठामधील विठ्ठल रुख्मिणी मंदिरातही आषाढीचा कार्यक्रम पार पडला. सुमारे ८५ वर्षे पुरातन असलेल्या या मंदिरात संत नामदेव महाराज सरोदे यांच्या हस्ते नित्यपूजा आणि अभिषेक करण्यात आला. मंदिरात असलेल्या पांडुरंगाच्या आणि रु ख्मिणी मातेच्या सजीव मूर्तीची सजावट करून अभिषेक व पूजा करण्यात आली. दुपारी प्रसाद वाटप झाला. मंदिरात भाविकांना मात्र यंदा कोरोनामुळे प्रवेश देण्यात आला नाही. मंदिरातून दरवर्षी पंढरपूरला दिंडी जाते, मात्र यंदा ती रद्द करण्यात आली.प्रेमनगर हरिहर मंदिरप्रेमनगर येथील हरिहर मंदिरामध्ये असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करून अभिषेक करण्यात आला. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर आषाढीचा कार्यक्रम घेतला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे आटोपशीर कार्यक्रम झाला. दुपारी हनुमंतांच्या मूर्तीच्या प्रदक्षिणेचा औपचारिक विधी पार पडला. श्रीधर महाराज राऊत यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. दरवर्षी येथून पंढरपूरसाठी दिंडी निघते. मात्र यंदा ती रद्द करण्यात आली. 

 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी