शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठेक्याने घेतली सात एकर, पुराने हिरावली भाकर; राखेमुळे उगवलेल्या पिकांची झाली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 13:02 IST

काेराडी वीज केंद्रातील राख साचलेल्या तलावाचा बंधारा फुटल्याने जीवितहानी झाली नसली तरी राखेच्या पुराचे दुष्परिणाम अनेक दिवस परिसरातील नागरिकांना भाेगावे लागणार आहेत.

ठळक मुद्देभाजीपाला खराब,  शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी

निशांत वानखेडे/मेहा शर्मा

नागपूर : काेराडी ॲशपाॅण्ड फुटले, त्यानंतर आलेल्या राखमिश्रित पाण्याच्या लाेंढ्याने परिसरातील शेतकऱ्यांची सारी स्वप्नेच धुळीस मिळाली आहेत. येथील राखेचा पूर ओसरला असला तरी स्वप्नांची राख आता तेवढी मागे उरली आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांपुढे आता पुढचे दिवस कसे काढायचे हा प्रश्न असला, तरी अद्यापही ठोस मदतीचा निर्णय झालेला नाही.

काेराडी वीज केंद्रातील राख साचलेल्या तलावाचा बंधारा फुटल्याने जीवितहानी झाली नसली तरी राखेच्या पुराचे दुष्परिणाम अनेक दिवस परिसरातील नागरिकांना भाेगावे लागणार आहेत. ॲशपाॅण्डमधील राखमिश्रित पाणी खसाळा, मसाळा, कवठा आदी गावांतील काही शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आणि उगवलेल्या पिकांची माती झाली. त्यातीलच एक म्हणजे दामू कुमरे. दामू यांच्यावर दाेन मुली, पुतण्या, वृद्ध आई आणि गेल्या वर्षी मृत्यू पावलेल्या भावाच्या कुटुंबाचीही जबाबदारी आहे. ज्या मालकाकडे ते शेतमजुरी करायचे, त्या शेतकऱ्याची ७ एकर जमीन ५० हजार रुपयांच्या करारावर ठेक्याने कसायला घेतली हाेती. यात त्यांनी कपाशी, तूर व अर्ध्या भागात भेंडी, दाेडके आदी भाजीपाल्याची लागवड केली. चांगले पीक हाेईल आणि कुटुंबाला सुखाची भाकर मिळेल, हे स्वप्न मनात हाेते. स्वत:जवळची जमापुंजी लावली. मात्र, राखेच्या पुराने त्यांच्या कुटुंबाची भाकरच हिरावून नेली.

लाखावर नुकसान झाले असले तरी कराराप्रमाणे ठेक्याचे ५० हजार रुपये त्यांना द्यावेच लागणार आहेत. ताे पैसा कुठून भरून द्यायचा, कुटुंबाचे पालनपाेषण कसे करायचे, अशा असंख्य विचारांचे काहूर त्यांच्या मनात चालले आहे. या जमिनीवर शेती करण्याचा विचारही केला तरी दिवाळीपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्यानंतर गहू व चणा पेरण्याचा त्यांचा विचार आहे; पण शेतात राख मिसळल्याने ते पीक कसे येईल, ही चिंताही त्यांना लागली आहे.

इतर शेतकऱ्यांचेही हेच हाल

उप्पलवाडी निवासी रामेश्वर उमाठे यांची अवस्थाही तीच आहे. त्यांनी सात एकरात पालक, चवळी भाजी, वांग्याची लागवड केली हाेती. जवळ वाहणाऱ्या नाल्यावाटे ॲशपाॅण्डचे पाणी शेतात घुसले आणि सर्व नष्ट झाले. आता शेतात निव्वळ राखेचा चिखल पसरला आहे. आता पीक येईल की नाही, ही चिंता त्यांना लागली आहे. रेल्वे अंडरब्रिजजवळ फार्महाउस असलेल्या लखबीरसिंग साेहल यांनी दीड एकरात संत्रा, माेसंबी, सीताफळ, आंबे, सागवान आदींची ४०० झाडे लावली हाेती. ती सारी झाडे राखेच्या पुराने खराब झाली आहेत. जवळच्या इतर काही शेतकऱ्यांनाही फटका बसला असल्याची माहिती म्हसाळा व कवठा गटग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद माकडे यांनी दिली.

सुपीकता यायला तीन वर्षे लागतील

तज्ज्ञांच्या मते राखमिश्रित पाण्यामुळे जमिनीची सुपीकता धाेक्यात आली असून त्यामुळे उत्पादकता घटण्याचा धाेका आहे. स्थिती पूर्वपदावर यायला किमान तीन वर्षे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीfloodपूरkoradi damकोराडी प्रकल्प