शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

काव्यसौंदर्याने नटलेला ‘असेन मी नसेन मी’

By admin | Updated: June 16, 2014 01:12 IST

मराठी साहित्यातील अग्रगण्य लेखिका, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे ‘असेन मी नसेन मी’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पद्मगंधा प्रतिष्ठान : कवयित्री शांता शेळके स्मृती कार्यक्रम नागपूर : मराठी साहित्यातील अग्रगण्य लेखिका, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे ‘असेन मी नसेन मी’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शांताबार्इंसारख्या विलक्षण प्रतिभावंत व प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्वाचा वेध त्यांच्याच साहित्य कृतीतून घेणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे यांची होती. या कार्यक्रमात काव्यसौंदर्याने रसिकांना आनंद दिला. हा कार्यक्रम पद्मगंधा प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्यामकांत कुळकर्णी, उज्ज्वला अंधारे यांनी शांताबार्इंच्या लेख व कवितांचे अभिवाचन केले. वीणा कुळकर्णी, विद्या नामजोशी, पल्लवी राजदेरकर यांनी त्यांच्या लोकप्रिय गीतांचे भावपूर्ण सादरीकरण करून रसिकांना आनंद दिला. ६ जून २००२ साली शांताबार्इंचे निधन झाले. पण त्यांच्या कविता मात्र रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आहेत. त्यांच्या सुमधुर गीतांमुळे त्या घराघरांत प्रिय झाल्यात. प्रास्ताविकासह वर्षा देशपांडे यांनी शांताबाईच्या अफाट साहित्य कर्तृत्वाचा उपस्थितांना परिचय करून दिला. शांताबार्इंची सार्वत्रिक ओळख एक प्रतिभावंत कवयित्री असली तरी त्या उत्तम लेखिकाही होत्या. त्यांना रविकिरण मंडळाचे आकर्षण, कवी माधव ज्युलियन या आवडत्या कवीचा आदर्श आणि अंगभूत प्रतिभा यामुळे शांताबार्इंच्या मनातील शब्द व स्पर्श यांच्याबद्दलच्या अबोध आकर्षणावर प्रकाश टाकणाऱ्या कवितांचे वाचन रसिकांना अंतर्मुख करणारे होते. शब्द म्हणजे असतात केवळ बेटे, पाण्याने वेढलेली, एकमेकांपासून तुटलेली अशा त्यांच्या ओळींसह या भाववेड्या हळव्या कवयित्रीच्या मनोव्यथांना कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले. ‘असेन मी नसेन मी...फुलाफुलात येथल्या उद्या हसेल गीत हे...’ या शांताबार्इंच्या स्वलिखितावर प्रकाश टाकणाऱ्या सादरीकरणाने रसिकांची दाद घेतली. श्यामकांत कुळकर्णी यांनी शांताबार्इंच्या अपरिचित लेखनाबद्दल माहिती दिली. वीणा कुळकर्णी, विद्या नामजोशी, पल्लवी राजदेरकर या हौशी गायकांनी काही गीते सादर करून या कार्यक्रमात रंग भरला. गायिकांना पल्लवी राजदेरकर यांनी संवादिनीवर तर कांचन घाटोळे यांनी तबल्यावर साथसंगत केली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात साहित्य रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)