शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

अरिजितचा रोमांच अन् स्वरधारांची बरसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 10:46 IST

‘यंगिस्तान’पासून ते थेट जुन्या पिढीतील नागरिकांना वेड लावणारा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंग याने आपल्या ‘रुमानी’ आवाजाने नागपूरकरांना संगीताची एक वेगळीच अनुभूती दिली.

ठळक मुद्देअरिजितच्या स्वरांनी बरसल्या जलधारा नागपूरकरांनी अनुभवले मंतरलेले क्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तो येणार..तो येणार या भावनेनेच रोमांचित झालेल्या रसिकांनी खचाखच भरलेल्या मंतरलेल्या वातावरणात त्याने हृदयाची वीणा छेडणारे सप्तसूर लावले अन् स्वरमैफिलीत आलेला प्रत्येक रसिक संगीताच्या दुनियेत हरवला. ‘कभी जो बादल बरसे’ हे गीत गात असताना स्वरधारा बरसल्याचा अनुभव आला अन् काही वेळातच खरोखर जलधारांनी रसिकप्रेक्षक चिंब भिजले. ‘यंगिस्तान’पासून ते थेट जुन्या पिढीतील नागरिकांना वेड लावणारा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंग याने आपल्या ‘रुमानी’ आवाजाने नागपूरकरांना संगीताची एक वेगळीच अनुभूती दिली. अरिजित नागपुरात बेफाम गायला आणि त्याच्या गायनाच्या कैफात आकंठ बुडालेल्या रसिकप्रेक्षकांनी कधी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत तर कधी त्याच्या शब्दावर ताल धरीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘जयंती नगरी-७’ या भव्य टाऊनशिप प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी अरिजित सिंग याचा रविवारी आयोजित ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरला.अभिजित रिअल्टर्स अ‍ॅण्ड इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि. यांच्यातर्फे बेसा पिपळा रोडवरील प्रकल्पस्थळीच आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, अभिजित रिअल्टर्स अ‍ॅण्ड इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जे.के.मजुमदार, संचालक अभिजित मजुमदार, जयंती मजुमदार, इनू मजुमदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’च्या सुरुवातीलाच अरिजित सिंगने आपल्या अनोख्या शैलीत संवाद साधत नागपूरकरांना जिंकले. गायनाची सुरुवातच त्याने ‘ऐ दिल है मुश्किल’ या गाण्याने केली. त्यानंतर त्याने रसिकांच्या मनाला साद घालणाऱ्या गाण्यांने सर्वांना तृप्त केले. ‘तुझको मै रखलू वहां’, ‘कभी जो बादल बरसे’, ‘ये मौसम की बारीश’ यासारख्या इतर अनेक गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण केले. ‘जो भेजी थी दुवा’ हे गाणे सादर करत असताना त्याने कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिल से’, ‘बॉम्बे’ चित्रपटातील गाणे गाऊन त्याने प्रेक्षकांमधील उत्साह जागविला. ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ हे गाणे तर त्याने ‘क्लासिक’ पद्धतीने गायले अन् थेट उपस्थितांच्या हृदयालाच हात घातला.कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाची शक्यता लक्षात घेता ‘ओ कबिरा..’ या गाण्याने त्याने नागपूरकरांचा निरोप घेतला. कार्यक्रमाचे संचालन आर.जे.पल्लवी आणि आर.जे.कुणाल यांनी केले.

टॅग्स :Arijit singhअरिजीत सिंह