शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

अरविंद वाघमारे यांनी केला न्यायालयाचा अवमान : हायकोर्टाचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:13 IST

अ‍ॅड. अरविंद वाघमारे व इतर चौघांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवला. त्यानंतर न्यायालयाने पाचही जणांविरुद्धची फौजदारी अवमानना याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. तसेच, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून अवमानना कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली व यावर १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देकारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅड. अरविंद वाघमारे व इतर चौघांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवला. त्यानंतर न्यायालयाने पाचही जणांविरुद्धची फौजदारी अवमानना याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. तसेच, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून अवमानना कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली व यावर १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. इतर अवमानकर्त्यांमध्ये नागोराव इंगळे, त्यांची पत्नी ज्योती, मुले आशिष व नयन यांचा समावेश आहे. अवमानकर्त्यांनी बाल न्याय मंडळाचे न्यायाधीशांची गैरवर्तणूक व अवमाननाजनक कृतीची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडे तक्रार केली होती. त्याची एक प्रत नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्तींना सादर करण्यात आली होती. १९ जून २०१८ रोजी उच्च न्यायालयाने तक्रारीतील काही गंभीर आरोप लक्षात घेता या पाचही जनांविरुद्ध स्वत:च फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेतली. त्यानंतर या कारवाईविरुद्ध वाघमारे व इतरांनी अपील दाखल केले. या दोन्ही प्रकरणांवर एकत्र सुनावणी केली जात आहे.गेल्या तारखेला सुनावणीदरम्यान केलेल्या अवमानकारक कृतीमुळे न्यायालयाने वाघमारे यांना ताब्यात घेण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. त्यानुसार वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर वाघमारे यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना योग्य समज देऊन माफ केले होते. तसेच, मूळ अवमानना प्रकरण कायम ठेवून दुसरी अवमानना कारवाई मागे घेतली होती. न्यायालयात वाघमारे यांनी स्वत: बाजू मांडली. न्यायालय मित्र म्हणून अ‍ॅड. रजनीश व्यास तर, उच्च न्यायालय प्रशासनातर्फे वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल व अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.तो अर्ज खारीजहे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमक्ष सुनावणीसाठी ठेवण्यात यावे असा अर्ज वाघमारे यांनी दाखल केला होता. न्यायालयाने त्या अर्जावर सुनावणी घेतली व शेवटी विविध बाबी लक्षात घेता अर्ज फेटाळून लावला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल