शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

'अरुण्यऋषी' चितमपल्ली आणि त्यांची छाया : वडिलांना सांभाळण्यासाठी मुलीने लग्नही केले नाही, पण तीही सोडून गेली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:46 IST

निसर्गप्रेमातून लेखन, आणि प्रेमातून समर्पण : चितमपल्ली पिता-पुत्रींची विरळ कथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मारुती चितमपल्ली यांच्या सेवानिवृत्तीनंतर पत्नीनेच त्यांचा सांभाळ केला. परंतु त्यांचा आजारपणात मृत्यू झाला. तेव्हा त्यांची एकुलती एक मुलगी छाया हिने त्यांचा सांभाळ केला. वयोवृद्ध वडिलांना सांभाळता यावे म्हणून तिने लग्नही केले नाही. परंतु तारुण्यातच अल्पआजारात तीही सोडून गेली.

अरुण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना छाया ही एकुलती एक मुलगी होती. तिने जर्नालिझम केले होते. वडिलांप्रमाणे तिलाही निसर्गाप्रति प्रेम होते. मारुती चितमपल्ली हे सेवानिवृत्तीनंतर लक्ष्मीनगरातील घरी स्थायिक झाले. येथून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. बहुतांश ग्रंथसंपदा त्यांनी नागपुरातील घरातूनच पूर्ण केली. त्यांची मुलगी छाया हीसुद्धा लिहायची. विशेषतः निसर्गावरच त्यांचे लिखाण अधिक असे. विविध वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायचे. निसर्गावरच आधारित त्यांनी एक पुस्तकही लिहिले. मारुती चितमपल्ली यांच्या पत्नीचे आजारपणात निधन झाले. त्यानंतर मुलगी छाया यांनीच चितमपल्ली यांचा सांभाळ केला, त्यांच्या सांभाळ करता यावे म्हणून त्यांनी लग्नही केले नाही. मात्र, अल्पशा आजाराने तारुण्यातच त्यांचाही मृत्यू झाला.

मी त्यांच्या सहवासात समृद्ध झालोमारुती चितमपल्ली यांच्या जाण्याचे अतीव दुःख आहे. लक्ष्मीनगर येथे ते वास्तव्यास असताना त्यांचा मोठा सहवास मला लाभला. ते फार कुणाशी बोलत नसत. प्रत्येक भेटीत ते जंगलातील अनेक अतर्क्स गोष्टी सांगायचे. आमच्या रामटेक येथील कॅपवर येऊन राहण्याची त्यांची खूप इच्छा होती. पण त्यांच्या प्रकृतीमुळे मी त्यांना नेऊ शकलो नाही. नागपूर सोडून ते सोलापूरला जातानाही त्यांना रामटेकला जाता आले नाही. आज तीच खंत मला जाणवत आहे. पण त्याच्या सहवासात मी खरोखर समृद्ध झालो.अमोल खंते, निसर्गप्रेमी

"पद्मश्री मारुती चितमपल्ली सोलापूरचे असले तरी त्यांच्या आयुष्याचा सर्वाधिक काळ विदर्भात गेला आहे. वनाधिकारी म्हणून ते नवेगाव-बांध अभयारण्यात आणि मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पात दीर्घकाळ होते. जंगल, जंगलातील गूढ व रहस्यमय जीवन, पशू आणि पक्षी हे त्यांच्या ललितलेखनाचे केंद्र होते. जंगलाकडे पाहण्याचा त्यांना तिसरा डोळा होता आणि अतिसंवेदनशील कान त्यांच्याजवळ होते. म्हणून अत्यंत हळुवार, निसर्गाची घडी न मोडता त्यांनी लिहिलेली पुस्तके मराठीत आगळीवेगळी ठरली. त्यांच्या या लेखनाने मराठी लोकमानस समृद्ध झाले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली."- प्रमोद मुनघाटे, सदस्य, म. रा. साहित्य व संस्कृती मंडळ

टॅग्स :nagpurनागपूर