शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

'अरुण्यऋषी' चितमपल्ली आणि त्यांची छाया : वडिलांना सांभाळण्यासाठी मुलीने लग्नही केले नाही, पण तीही सोडून गेली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:46 IST

निसर्गप्रेमातून लेखन, आणि प्रेमातून समर्पण : चितमपल्ली पिता-पुत्रींची विरळ कथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मारुती चितमपल्ली यांच्या सेवानिवृत्तीनंतर पत्नीनेच त्यांचा सांभाळ केला. परंतु त्यांचा आजारपणात मृत्यू झाला. तेव्हा त्यांची एकुलती एक मुलगी छाया हिने त्यांचा सांभाळ केला. वयोवृद्ध वडिलांना सांभाळता यावे म्हणून तिने लग्नही केले नाही. परंतु तारुण्यातच अल्पआजारात तीही सोडून गेली.

अरुण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना छाया ही एकुलती एक मुलगी होती. तिने जर्नालिझम केले होते. वडिलांप्रमाणे तिलाही निसर्गाप्रति प्रेम होते. मारुती चितमपल्ली हे सेवानिवृत्तीनंतर लक्ष्मीनगरातील घरी स्थायिक झाले. येथून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. बहुतांश ग्रंथसंपदा त्यांनी नागपुरातील घरातूनच पूर्ण केली. त्यांची मुलगी छाया हीसुद्धा लिहायची. विशेषतः निसर्गावरच त्यांचे लिखाण अधिक असे. विविध वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायचे. निसर्गावरच आधारित त्यांनी एक पुस्तकही लिहिले. मारुती चितमपल्ली यांच्या पत्नीचे आजारपणात निधन झाले. त्यानंतर मुलगी छाया यांनीच चितमपल्ली यांचा सांभाळ केला, त्यांच्या सांभाळ करता यावे म्हणून त्यांनी लग्नही केले नाही. मात्र, अल्पशा आजाराने तारुण्यातच त्यांचाही मृत्यू झाला.

मी त्यांच्या सहवासात समृद्ध झालोमारुती चितमपल्ली यांच्या जाण्याचे अतीव दुःख आहे. लक्ष्मीनगर येथे ते वास्तव्यास असताना त्यांचा मोठा सहवास मला लाभला. ते फार कुणाशी बोलत नसत. प्रत्येक भेटीत ते जंगलातील अनेक अतर्क्स गोष्टी सांगायचे. आमच्या रामटेक येथील कॅपवर येऊन राहण्याची त्यांची खूप इच्छा होती. पण त्यांच्या प्रकृतीमुळे मी त्यांना नेऊ शकलो नाही. नागपूर सोडून ते सोलापूरला जातानाही त्यांना रामटेकला जाता आले नाही. आज तीच खंत मला जाणवत आहे. पण त्याच्या सहवासात मी खरोखर समृद्ध झालो.अमोल खंते, निसर्गप्रेमी

"पद्मश्री मारुती चितमपल्ली सोलापूरचे असले तरी त्यांच्या आयुष्याचा सर्वाधिक काळ विदर्भात गेला आहे. वनाधिकारी म्हणून ते नवेगाव-बांध अभयारण्यात आणि मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पात दीर्घकाळ होते. जंगल, जंगलातील गूढ व रहस्यमय जीवन, पशू आणि पक्षी हे त्यांच्या ललितलेखनाचे केंद्र होते. जंगलाकडे पाहण्याचा त्यांना तिसरा डोळा होता आणि अतिसंवेदनशील कान त्यांच्याजवळ होते. म्हणून अत्यंत हळुवार, निसर्गाची घडी न मोडता त्यांनी लिहिलेली पुस्तके मराठीत आगळीवेगळी ठरली. त्यांच्या या लेखनाने मराठी लोकमानस समृद्ध झाले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली."- प्रमोद मुनघाटे, सदस्य, म. रा. साहित्य व संस्कृती मंडळ

टॅग्स :nagpurनागपूर