शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कलावंतांनी आपला कार्यक्रम समजून संमेलनात यावे : प्रसाद कांबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:47 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घरचा कार्यक्रम समजून नाट्य संमेलनात यायला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पूर्वरंगच्या कार्यक्रमात सहभागी कांबळी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देकलावंतांच्या मदतीसाठी योजना आखणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घरचा कार्यक्रम समजून नाट्य संमेलनात यायला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पूर्वरंगच्या कार्यक्रमात सहभागी कांबळी यांनी माध्यमांशी संवाद साधला.नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच कलावंतांना नाट्य संमेलनाची उत्सुकता असते आणि बहुतेक कलावंत सहभागी होतातही. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे किंवा शुटींगमुळे ते संमेलनात सहभागी होऊ शकत नाही. जवळच्या परिसरात संमेलन असेल तर शुटींग संपवून मध्यरात्रीही संमेलनात सहभागी होताना अनेक कलावंतांना पाहिल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित संमेलनाच्या तारखा ऐनवेळी ठरत असल्याने त्यांना येणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढच्या वेळेपासून किमान संमेलनाच्या तारखातरी वर्षभर आधी निश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. तरीही कलावंत सहभागी झाले नाही तर मात्र त्यांच्यावर टीका करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या वयोवृद्ध कलावंतांच्या मदतीबाबत मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली. नाट्य परिषदेकडे भक्कम आर्थिक निधी नाही व परिषदेचे बहुतेक उपक्रम हे सरकारच्या निधीवर सुरू असतात. राज्यभरात अशा गरजू कलावंतांची संख्या कमी नाही. मात्र नाट्य परिषद एवढी सक्षम नाही की त्यांना मदत करू शकेल. त्यामुळे परिषदेकडे कलावंतांच्या मदतीसाठी ठोस असा निधी उभा राहील यासाठी काही उपक्रम व योजना आखणे आवश्यक असल्याची भावना कांबळी यांनी व्यक्त केली. आतापर्यंत झालेल्या नाट्य संमेलनांचे डाक्युमेंटेशन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या एकूणच रंगभूमीच्या प्रथा, परंपरा, लकबी व कलावंतांची संवादफेक इथपासून या डाक्युमेंटेशनचे काम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आठ महिन्याच्या कालावधीत दोन संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. मात्र या संमेलनात नवीन काही देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. केवळ हौशी आणि व्यावसायिकच नाही तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागाची सांस्कृतिक ओळख असलेल्या कलांनाही स्थान देण्यात येत आहे.वैदर्भीय झाडीपट्टी व दंडारप्रमाणे सर्व कलांना व कलावंतांना त्यांची कला सादरीकरण करायला मिळेल, हा उद्देश आहे. नागपूरचे संमेलनही यानुसार वेगळे आणि अलौकिक ठरेल, असा विश्वास प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केला.संगीत नाटकांना मरण नाही : कीर्ती शिलेदारअ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी संगीत नाटकांच्या अस्तित्वाबाबत विश्वास व्यक्त केला. मूळत: संगीत नाटकात अभिनय साकारून लोकप्रिय झालेल्या शिलेदार यांनी जोपर्यंत रंगभूमी जिवंत आहे तोपर्यंत संगीत नाटकांना मरण नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. बालरंगभूमी, हौशी आणि व्यावसायिक रंगभूमी अशा सर्व प्रकारांचे महाराष्ट्रात चांगले प्रयोग आणि उपक्रम सुरू आहेत. त्या स्वत:ही अभिनयाच्या व संगीत नाटकांच्या कार्यशाळा घेत आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे दोन-तीन तास बसून संगीत नाटक बघणारा प्रेक्षक राहिला नाही. लोकांना नाटक आवडते, बघायची इच्छाही असते, मात्र तेवढा वेळ देण्याची तयारी आणि शक्यताही नसते. लोकांना संगीत नाटकातील नाट्यपदे आवडतात व वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांना ती ऐकायला मिळतात. सोशल मीडिया हे रंगभूमीसाठी आव्हान आहे, असे त्यांना वाटत नाही. उलट हे नवे माध्यम कलावंतांना मिळाले आहे जे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचते आहे. मात्र कलावंतांना ते योग्यपणे हाताळता आले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. नागपूरचा प्रेक्षक हा चोखंदळ आहे. त्यांना सकस काही हवे असते, अशी भावना त्यांना व्यक्त केली.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी