शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतांनी आपला कार्यक्रम समजून संमेलनात यावे : प्रसाद कांबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:47 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घरचा कार्यक्रम समजून नाट्य संमेलनात यायला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पूर्वरंगच्या कार्यक्रमात सहभागी कांबळी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देकलावंतांच्या मदतीसाठी योजना आखणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घरचा कार्यक्रम समजून नाट्य संमेलनात यायला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पूर्वरंगच्या कार्यक्रमात सहभागी कांबळी यांनी माध्यमांशी संवाद साधला.नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच कलावंतांना नाट्य संमेलनाची उत्सुकता असते आणि बहुतेक कलावंत सहभागी होतातही. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे किंवा शुटींगमुळे ते संमेलनात सहभागी होऊ शकत नाही. जवळच्या परिसरात संमेलन असेल तर शुटींग संपवून मध्यरात्रीही संमेलनात सहभागी होताना अनेक कलावंतांना पाहिल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित संमेलनाच्या तारखा ऐनवेळी ठरत असल्याने त्यांना येणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढच्या वेळेपासून किमान संमेलनाच्या तारखातरी वर्षभर आधी निश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. तरीही कलावंत सहभागी झाले नाही तर मात्र त्यांच्यावर टीका करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या वयोवृद्ध कलावंतांच्या मदतीबाबत मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली. नाट्य परिषदेकडे भक्कम आर्थिक निधी नाही व परिषदेचे बहुतेक उपक्रम हे सरकारच्या निधीवर सुरू असतात. राज्यभरात अशा गरजू कलावंतांची संख्या कमी नाही. मात्र नाट्य परिषद एवढी सक्षम नाही की त्यांना मदत करू शकेल. त्यामुळे परिषदेकडे कलावंतांच्या मदतीसाठी ठोस असा निधी उभा राहील यासाठी काही उपक्रम व योजना आखणे आवश्यक असल्याची भावना कांबळी यांनी व्यक्त केली. आतापर्यंत झालेल्या नाट्य संमेलनांचे डाक्युमेंटेशन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या एकूणच रंगभूमीच्या प्रथा, परंपरा, लकबी व कलावंतांची संवादफेक इथपासून या डाक्युमेंटेशनचे काम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आठ महिन्याच्या कालावधीत दोन संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. मात्र या संमेलनात नवीन काही देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. केवळ हौशी आणि व्यावसायिकच नाही तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागाची सांस्कृतिक ओळख असलेल्या कलांनाही स्थान देण्यात येत आहे.वैदर्भीय झाडीपट्टी व दंडारप्रमाणे सर्व कलांना व कलावंतांना त्यांची कला सादरीकरण करायला मिळेल, हा उद्देश आहे. नागपूरचे संमेलनही यानुसार वेगळे आणि अलौकिक ठरेल, असा विश्वास प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केला.संगीत नाटकांना मरण नाही : कीर्ती शिलेदारअ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी संगीत नाटकांच्या अस्तित्वाबाबत विश्वास व्यक्त केला. मूळत: संगीत नाटकात अभिनय साकारून लोकप्रिय झालेल्या शिलेदार यांनी जोपर्यंत रंगभूमी जिवंत आहे तोपर्यंत संगीत नाटकांना मरण नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. बालरंगभूमी, हौशी आणि व्यावसायिक रंगभूमी अशा सर्व प्रकारांचे महाराष्ट्रात चांगले प्रयोग आणि उपक्रम सुरू आहेत. त्या स्वत:ही अभिनयाच्या व संगीत नाटकांच्या कार्यशाळा घेत आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे दोन-तीन तास बसून संगीत नाटक बघणारा प्रेक्षक राहिला नाही. लोकांना नाटक आवडते, बघायची इच्छाही असते, मात्र तेवढा वेळ देण्याची तयारी आणि शक्यताही नसते. लोकांना संगीत नाटकातील नाट्यपदे आवडतात व वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांना ती ऐकायला मिळतात. सोशल मीडिया हे रंगभूमीसाठी आव्हान आहे, असे त्यांना वाटत नाही. उलट हे नवे माध्यम कलावंतांना मिळाले आहे जे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचते आहे. मात्र कलावंतांना ते योग्यपणे हाताळता आले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. नागपूरचा प्रेक्षक हा चोखंदळ आहे. त्यांना सकस काही हवे असते, अशी भावना त्यांना व्यक्त केली.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी