शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

कलावंतांनी आपला कार्यक्रम समजून संमेलनात यावे : प्रसाद कांबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:47 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घरचा कार्यक्रम समजून नाट्य संमेलनात यायला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पूर्वरंगच्या कार्यक्रमात सहभागी कांबळी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देकलावंतांच्या मदतीसाठी योजना आखणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घरचा कार्यक्रम समजून नाट्य संमेलनात यायला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पूर्वरंगच्या कार्यक्रमात सहभागी कांबळी यांनी माध्यमांशी संवाद साधला.नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच कलावंतांना नाट्य संमेलनाची उत्सुकता असते आणि बहुतेक कलावंत सहभागी होतातही. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे किंवा शुटींगमुळे ते संमेलनात सहभागी होऊ शकत नाही. जवळच्या परिसरात संमेलन असेल तर शुटींग संपवून मध्यरात्रीही संमेलनात सहभागी होताना अनेक कलावंतांना पाहिल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित संमेलनाच्या तारखा ऐनवेळी ठरत असल्याने त्यांना येणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढच्या वेळेपासून किमान संमेलनाच्या तारखातरी वर्षभर आधी निश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. तरीही कलावंत सहभागी झाले नाही तर मात्र त्यांच्यावर टीका करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या वयोवृद्ध कलावंतांच्या मदतीबाबत मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली. नाट्य परिषदेकडे भक्कम आर्थिक निधी नाही व परिषदेचे बहुतेक उपक्रम हे सरकारच्या निधीवर सुरू असतात. राज्यभरात अशा गरजू कलावंतांची संख्या कमी नाही. मात्र नाट्य परिषद एवढी सक्षम नाही की त्यांना मदत करू शकेल. त्यामुळे परिषदेकडे कलावंतांच्या मदतीसाठी ठोस असा निधी उभा राहील यासाठी काही उपक्रम व योजना आखणे आवश्यक असल्याची भावना कांबळी यांनी व्यक्त केली. आतापर्यंत झालेल्या नाट्य संमेलनांचे डाक्युमेंटेशन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या एकूणच रंगभूमीच्या प्रथा, परंपरा, लकबी व कलावंतांची संवादफेक इथपासून या डाक्युमेंटेशनचे काम करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आठ महिन्याच्या कालावधीत दोन संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. मात्र या संमेलनात नवीन काही देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. केवळ हौशी आणि व्यावसायिकच नाही तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागाची सांस्कृतिक ओळख असलेल्या कलांनाही स्थान देण्यात येत आहे.वैदर्भीय झाडीपट्टी व दंडारप्रमाणे सर्व कलांना व कलावंतांना त्यांची कला सादरीकरण करायला मिळेल, हा उद्देश आहे. नागपूरचे संमेलनही यानुसार वेगळे आणि अलौकिक ठरेल, असा विश्वास प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केला.संगीत नाटकांना मरण नाही : कीर्ती शिलेदारअ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी संगीत नाटकांच्या अस्तित्वाबाबत विश्वास व्यक्त केला. मूळत: संगीत नाटकात अभिनय साकारून लोकप्रिय झालेल्या शिलेदार यांनी जोपर्यंत रंगभूमी जिवंत आहे तोपर्यंत संगीत नाटकांना मरण नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. बालरंगभूमी, हौशी आणि व्यावसायिक रंगभूमी अशा सर्व प्रकारांचे महाराष्ट्रात चांगले प्रयोग आणि उपक्रम सुरू आहेत. त्या स्वत:ही अभिनयाच्या व संगीत नाटकांच्या कार्यशाळा घेत आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे दोन-तीन तास बसून संगीत नाटक बघणारा प्रेक्षक राहिला नाही. लोकांना नाटक आवडते, बघायची इच्छाही असते, मात्र तेवढा वेळ देण्याची तयारी आणि शक्यताही नसते. लोकांना संगीत नाटकातील नाट्यपदे आवडतात व वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांना ती ऐकायला मिळतात. सोशल मीडिया हे रंगभूमीसाठी आव्हान आहे, असे त्यांना वाटत नाही. उलट हे नवे माध्यम कलावंतांना मिळाले आहे जे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचते आहे. मात्र कलावंतांना ते योग्यपणे हाताळता आले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. नागपूरचा प्रेक्षक हा चोखंदळ आहे. त्यांना सकस काही हवे असते, अशी भावना त्यांना व्यक्त केली.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी