शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी ३७० कलम हे महत्त्वाचे पाऊल : अरुण कुमार यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:49 IST

राष्ट्रनिर्माण, देशभक्ती आणि एकात्मतेच्या भावनेतून जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करण्यात आले आहे. भविष्यात देशाला अखंड राखून आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीर स्टडी सेंटरच्या वतीने व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक राष्ट्र, एक संविधान आणि एक नागरिक हा देशाला एका धाग्यात जोडण्याचा सोपा मार्ग आहे. राष्ट्रनिर्माण, देशभक्ती आणि एकात्मतेच्या भावनेतून जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करण्यात आले आहे. भविष्यात देशाला अखंड राखून आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी व्यक्त केले.जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरच्या वतीने चिटणवीस सेंटरमध्ये ‘कलम ३७० नंतर जम्मू-काश्मिरातील स्थिती’ या विषयावर बुधवारी सायंकाळी अरुण कुमार यांचे व्याख्यान पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर स्टडी सेंटरच्या अध्यक्ष मीरा खडक्कार, सचिव अभिनंदन पळसापुरे होते. अरुण कुमार म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पातून उचललेले हे पाऊल आहे. देशपे्रमातून या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.३७० कलम लागू झाल्याने मागील ७२ वर्षानंतर प्रथमच खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरला सार्वभौमत्व प्राप्त झाले आहे. भारतीय संविधानातील घटनात्मक तरतुदीनुसार हे कलम लागू करून आता त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेनुसारच कामकाज चालणार आहे. जुने सर्व कायदे आणि नियम रद्द करून भारताचे संविधान तिथे लागू करणारा हा योग्य व देशहिताचा निर्णय आहे. मात्र अनेक जण हे कलम न वाचताच त्यावर चर्चा करीत आहेत. ३७० कलम लागू करण्याच्या घटनेची टीकाकारांकडून ‘जम्मू-काश्मीरचा विश्वासघात’ अशी अवहेलना होत आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील घटनांचा मागोवा घेतला तर हा विश्वासघात नसून खरा न्याय असल्याचे व विश्वासघात यापूर्वीच झाला होता, याची कल्पना येईल.जम्मू-काश्मीरचा भूभाग पाकिस्तानात राहावा, ही ब्रिटनची इच्छा होती. मात्र राजा हरिसिंग यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हे शक्य झाले नाही. पुढे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी यासाठी जागृती केली. त्यांच्यासह १८ जणांनी देशात बलिदान दिले. पाच हजारांवर लोकांना कारागृहात डांबण्यात आले. स्वातंत्र्यानंतर झालेल्या बलिदानांपैकी ७५ टक्के बलिदान काश्मिरात घडले. चार पिढ्या आणि ७२ वर्षांच्या संघर्षानंतर काश्मीरमध्ये आता हक्काचे राज्य आले आहे.प्रारंभी नागपुरातील काश्मिरी परिवारांकडून अरुण कुमार यांचे स्वागत करण्यात आले. सीएसआयआरचे वरिष्ठ प्रधान संशोधक डॉ. अवतार कृष्ण रैना यांनी प्रास्ताविक केले. मीरा खडक्कार यांनी ३७० कलम लागू झाल्याबद्दल अभिनंदनपत्राचे वाचन केले, तर अभिनंदन पळसापुरे यांनी अरुण कुमार यांचा परिचय करून दिला. संचालन प्रसन्ना चौधरी यांनी केले तर, उपस्थितांचे आभार सतीश मराठे यांनी मानले. व्याख्यानाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ