शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

कचरा संकलन कंपन्यांची मुजोरी; सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 13:14 IST

Nagpur News एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. ते सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाही, अशी तक्रार विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेत्यांनी नोंदविला आक्षेपचौकशी समितीने कंपनी प्रमुखांचे मत मागितले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाने शहरातील कचरा संकलन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी कंपनीकडे सोपविली आहे. परंतु कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. ते सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचाही फोन उचलत नाही, अशी तक्रार विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केली.

कचरा संकलन कंपन्यांच्या कामकाजाबाबत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. मंगळवारी या समितीपुढे तानाजी वनवे यांनी आपले मत मांडले. वस्त्यांमध्ये सहा ते सात दिवसानंतर कचरा गाड्या येतात. नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करतात. पण नगरसेवकांच्या फोनला कंपनीचे अधिकारी प्रतिसाद देत नाही. कंपनीमध्ये नोकरी लावण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांकडून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप वनवे यांनी केला. यासंदर्भात कंपनी प्रमुखांचे मत मागविण्याचे निर्देश अविनाश ठाकरे यांनी दिले.

समिती सदस्य वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, नगरसेवक नितीन साठवणे, सदस्य अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे,उपायुक्त राजेश भगत, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ. गजेंद्र महल्ले, निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्यासह दहाही झोनचे अधिकारी आणि दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

९ जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये आमदार प्रवीण दटके आणि विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत आपले मत मांडण्यांसदर्भात समितीकडे पत्र सादर केले होते. त्यानुसार मंगळवारी वनवे हे प्रत्यक्षात उपस्थित झाले तर आमदार प्रवीण दटके लेखी स्वरूपात आपले मत नोंदविणार आहेत.

कचऱ्याच्या ट्रकमध्ये माती

बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार यांच्याद्वारे दाखल व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये माती मिश्रीत कचरा असल्याचे गेल्या बैठकीत निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधित ट्रक चालक व मालक यांचे बयाण नोंदविण्यात आले. त्या सर्व बयाणांचे कंपनीच्या प्रतिनिधीकडून वाचन करण्यात आले.

पुरावे समितीपुढे ठेवा

दोन्ही कंपन्यांच्या कर्मचारी भरतीमधील भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांकडे कुठलेही पुरावे असल्यास त्यांनी ते समितीपुढे ठेवण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या अभिप्रायामध्ये मांडलेले मुद्दे गंभीर आहेत. याबाबत चौकशी होणे आवश्यक असल्याने संबंधित कंपनी प्रमुखांचे अभिप्राय नोंदविण्याचे निर्देश अविनाश ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न