शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कळमन्यात सर्वच बाजारपेठांमध्ये आवक अत्यल्प : सहा दिवस व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:43 IST

मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.

ठळक मुद्देसोमवारपासून आवक सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.कोट्यवधींचे व्यवहार ठप्पलोकसभा निवडणुकीची मतमोजणी समितीच्या मार्केट यार्डमध्ये २३ मे रोजी पार पडली. पण कायदा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी अणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी मार्केट यार्ड २१ मेच्या सायंकाळी ७ पासून २४ मेच्या सायंकाळपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याकरिता बाजारात सुरक्षा यंत्रणातैनात करण्यात आली होती. बाजारात गाड्या जाण्यावर बंदी होती. बंदची माहिती शेतकरी, ग्राहक आणि विक्रेत्यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी २१ मेपासून बाजारात मालाची आवक बंद केली. जवळपास सहा दिवसात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहिल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प राहिल्याची माहिती अडतियांनी दिली.दररोज दीड लाख पोती धान्य, कडधान्याच्या विक्रीला फटकाकळमन्यात उन्हाळ्यात धान्याचा हंगाम असतो. या दिवसात दररोज १० हजार पोती हरभरा, चार हजार पोती तूर, दोन हजार पोती सोयाबीन आणि जवळपास ८ ते १० हजार पोती गहू अशी एकूण २४ ते २५ हजार पोती धान्य व कडधान्याची विक्री होते. या सहा दिवसात दीड लाख पोत्यांची विक्री झाली नाही. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांना नुकसान सोसावे लागले. शनिवारी धान्य बाजार सुरू झाल्यानंतर शेतकरी आणि ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली. व्यवहार सोमवारपासून पूर्ववत होतील, असे धान्य बाजाराचे विक्रेते व अडतिये कमलाकर घाटोळे यांनी दिली.भाजी बाजारात आवक, पण ग्राहक कमीकळमन्यात धान्य, फळे, मिरची, आलू-कांदे, भाजीपाला, न्यू ग्रेन आदी सहा मुख्य बाजारपेठा आहेत. भाजीपाला बाजारात आवक रात्रीपासून सुरू होते. पण मार्केट यार्ड २४ मे सायंकाळपर्यंत बंद राहिल्यामुळे शनिवार, २५ मे रोजी हव्या त्या प्रमाणात भाजीपाला आला नाही. स्थानिकांकडून आवक होती, पण त्या प्रमाणात ग्राहक नव्हते. त्यामुळे सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९businessव्यवसाय