शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

कळमन्यात सर्वच बाजारपेठांमध्ये आवक अत्यल्प : सहा दिवस व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:43 IST

मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.

ठळक मुद्देसोमवारपासून आवक सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.कोट्यवधींचे व्यवहार ठप्पलोकसभा निवडणुकीची मतमोजणी समितीच्या मार्केट यार्डमध्ये २३ मे रोजी पार पडली. पण कायदा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी अणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी मार्केट यार्ड २१ मेच्या सायंकाळी ७ पासून २४ मेच्या सायंकाळपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याकरिता बाजारात सुरक्षा यंत्रणातैनात करण्यात आली होती. बाजारात गाड्या जाण्यावर बंदी होती. बंदची माहिती शेतकरी, ग्राहक आणि विक्रेत्यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी २१ मेपासून बाजारात मालाची आवक बंद केली. जवळपास सहा दिवसात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहिल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प राहिल्याची माहिती अडतियांनी दिली.दररोज दीड लाख पोती धान्य, कडधान्याच्या विक्रीला फटकाकळमन्यात उन्हाळ्यात धान्याचा हंगाम असतो. या दिवसात दररोज १० हजार पोती हरभरा, चार हजार पोती तूर, दोन हजार पोती सोयाबीन आणि जवळपास ८ ते १० हजार पोती गहू अशी एकूण २४ ते २५ हजार पोती धान्य व कडधान्याची विक्री होते. या सहा दिवसात दीड लाख पोत्यांची विक्री झाली नाही. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांना नुकसान सोसावे लागले. शनिवारी धान्य बाजार सुरू झाल्यानंतर शेतकरी आणि ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली. व्यवहार सोमवारपासून पूर्ववत होतील, असे धान्य बाजाराचे विक्रेते व अडतिये कमलाकर घाटोळे यांनी दिली.भाजी बाजारात आवक, पण ग्राहक कमीकळमन्यात धान्य, फळे, मिरची, आलू-कांदे, भाजीपाला, न्यू ग्रेन आदी सहा मुख्य बाजारपेठा आहेत. भाजीपाला बाजारात आवक रात्रीपासून सुरू होते. पण मार्केट यार्ड २४ मे सायंकाळपर्यंत बंद राहिल्यामुळे शनिवार, २५ मे रोजी हव्या त्या प्रमाणात भाजीपाला आला नाही. स्थानिकांकडून आवक होती, पण त्या प्रमाणात ग्राहक नव्हते. त्यामुळे सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९businessव्यवसाय