शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

कळमन्यात सर्वच बाजारपेठांमध्ये आवक अत्यल्प : सहा दिवस व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:43 IST

मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.

ठळक मुद्देसोमवारपासून आवक सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद राहणार असल्यामुळे व्यवहार सोमवारपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती अडतियांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूण सहा दिवसात कळमन्यातील सहा मुख्य बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याचे अडतियांनी सांगितले.कोट्यवधींचे व्यवहार ठप्पलोकसभा निवडणुकीची मतमोजणी समितीच्या मार्केट यार्डमध्ये २३ मे रोजी पार पडली. पण कायदा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी अणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी मार्केट यार्ड २१ मेच्या सायंकाळी ७ पासून २४ मेच्या सायंकाळपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याकरिता बाजारात सुरक्षा यंत्रणातैनात करण्यात आली होती. बाजारात गाड्या जाण्यावर बंदी होती. बंदची माहिती शेतकरी, ग्राहक आणि विक्रेत्यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी २१ मेपासून बाजारात मालाची आवक बंद केली. जवळपास सहा दिवसात खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहिल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प राहिल्याची माहिती अडतियांनी दिली.दररोज दीड लाख पोती धान्य, कडधान्याच्या विक्रीला फटकाकळमन्यात उन्हाळ्यात धान्याचा हंगाम असतो. या दिवसात दररोज १० हजार पोती हरभरा, चार हजार पोती तूर, दोन हजार पोती सोयाबीन आणि जवळपास ८ ते १० हजार पोती गहू अशी एकूण २४ ते २५ हजार पोती धान्य व कडधान्याची विक्री होते. या सहा दिवसात दीड लाख पोत्यांची विक्री झाली नाही. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांना नुकसान सोसावे लागले. शनिवारी धान्य बाजार सुरू झाल्यानंतर शेतकरी आणि ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली. व्यवहार सोमवारपासून पूर्ववत होतील, असे धान्य बाजाराचे विक्रेते व अडतिये कमलाकर घाटोळे यांनी दिली.भाजी बाजारात आवक, पण ग्राहक कमीकळमन्यात धान्य, फळे, मिरची, आलू-कांदे, भाजीपाला, न्यू ग्रेन आदी सहा मुख्य बाजारपेठा आहेत. भाजीपाला बाजारात आवक रात्रीपासून सुरू होते. पण मार्केट यार्ड २४ मे सायंकाळपर्यंत बंद राहिल्यामुळे शनिवार, २५ मे रोजी हव्या त्या प्रमाणात भाजीपाला आला नाही. स्थानिकांकडून आवक होती, पण त्या प्रमाणात ग्राहक नव्हते. त्यामुळे सर्वच भाज्यांचे भाव कमी झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९businessव्यवसाय