शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

आगमनाअगोदरच नागपुरकरांना गणराया पावला : १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:14 IST

गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवात पाणीकपात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाचे पदाधिकारी व जलप्रदाय विभागामध्ये झालेल्या चर्चेनंतर पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेण्यात आला.१५ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत शहरातील ७० टक्के भागात आठवड्यातील तीन दिवस पाणीकपात करण्यात आली. तर कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरुनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगरच्या काही भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू होता. पेंचमध्ये पाणी नसल्याने पाणीकपात करण्यात येत होती.३१ ऑगस्ट रोजी पाणीकपातीसंदर्भात समिक्षा होणार होती. परंतु मनपा प्रशासनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सर्वसंमतीने गणेशोत्सवादरम्यान पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेतला.मध्य प्रदेशातील चौराई डॅममधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी मागील वर्षीपेक्षा चांगली आहे. मात्र हे प्रमाण समाधानकारक नाही. परंतु गणेशोत्सवादरम्यान शहरवासीयांना पाणी मिळावे यासाठी पाणीकपात करण्याचा निर्णय काही दिवसांसाठी स्थगित करण्यात येत आहे. त्यानंतर पाण्याचा साठा पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली. पाणीकपात बंद करण्याच्या निर्णयाला निवडणूकींसाठी जोडले जाऊ शकत नाही. तोतलाडोहमध्ये मागील आठवड्यापर्यंत पाणी एकदमच खालच्या पातळीवर होते. पाणीच नव्हते त्यामुळे पुरवठा नव्हता, असेदेखील त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला स्थायी समिति अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, दिव्या धुरडे उपस्थित होते.४३ दिवसांत वाचविले ७.५२ एमएमक्यूब पाणीपाणीकपातीमुळे मनपाच्या जलप्रदाय विभागाने ७.५२ एमएमक्यूब पाण्याची बचत केली. येत्या काळात पाणीसंकट वाढणार आहे. त्यामुले भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन पावले उचलावी लागतील. १५ सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागली तर मनपा प्रशासन, आयुक्त स्वत:च्या पातळीवर पाणीकपातीबाबत निर्णय घेतील, असे पिंटू झलके यांनी सांगितले.पाणीसाठा वाढलामध्यप्रदेशच्या चौराई डॅममधून मागील दिवसांत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी वाढली आहे. सद्यस्थितीत येथे ३२.७३ टक्के अर्थातच ३३२.८६ एमएमक्यूब पाणी आहे. तर मृतसाठा पकडून येथे एकूण ४८२.८४ एमएमक्यूब पाणी आहे. मागील वर्षी या कालावधीत तोतलाडोह येथे २४.९३ एमएमक्यूब पाणीच होते. परंतु नवेगाव खैरी येथे मात्र पाणीपातळी वाढलेली नाही. मागील वर्षी तेथे ३८.०५ टक्के पाणी होते. यंदा हे प्रमाण २८.९२ टक्के इतकेच आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी