शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आगमनाअगोदरच नागपुरकरांना गणराया पावला : १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:14 IST

गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवात पाणीकपात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाचे पदाधिकारी व जलप्रदाय विभागामध्ये झालेल्या चर्चेनंतर पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेण्यात आला.१५ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत शहरातील ७० टक्के भागात आठवड्यातील तीन दिवस पाणीकपात करण्यात आली. तर कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरुनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगरच्या काही भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू होता. पेंचमध्ये पाणी नसल्याने पाणीकपात करण्यात येत होती.३१ ऑगस्ट रोजी पाणीकपातीसंदर्भात समिक्षा होणार होती. परंतु मनपा प्रशासनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सर्वसंमतीने गणेशोत्सवादरम्यान पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेतला.मध्य प्रदेशातील चौराई डॅममधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी मागील वर्षीपेक्षा चांगली आहे. मात्र हे प्रमाण समाधानकारक नाही. परंतु गणेशोत्सवादरम्यान शहरवासीयांना पाणी मिळावे यासाठी पाणीकपात करण्याचा निर्णय काही दिवसांसाठी स्थगित करण्यात येत आहे. त्यानंतर पाण्याचा साठा पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली. पाणीकपात बंद करण्याच्या निर्णयाला निवडणूकींसाठी जोडले जाऊ शकत नाही. तोतलाडोहमध्ये मागील आठवड्यापर्यंत पाणी एकदमच खालच्या पातळीवर होते. पाणीच नव्हते त्यामुळे पुरवठा नव्हता, असेदेखील त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला स्थायी समिति अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, दिव्या धुरडे उपस्थित होते.४३ दिवसांत वाचविले ७.५२ एमएमक्यूब पाणीपाणीकपातीमुळे मनपाच्या जलप्रदाय विभागाने ७.५२ एमएमक्यूब पाण्याची बचत केली. येत्या काळात पाणीसंकट वाढणार आहे. त्यामुले भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन पावले उचलावी लागतील. १५ सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागली तर मनपा प्रशासन, आयुक्त स्वत:च्या पातळीवर पाणीकपातीबाबत निर्णय घेतील, असे पिंटू झलके यांनी सांगितले.पाणीसाठा वाढलामध्यप्रदेशच्या चौराई डॅममधून मागील दिवसांत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी वाढली आहे. सद्यस्थितीत येथे ३२.७३ टक्के अर्थातच ३३२.८६ एमएमक्यूब पाणी आहे. तर मृतसाठा पकडून येथे एकूण ४८२.८४ एमएमक्यूब पाणी आहे. मागील वर्षी या कालावधीत तोतलाडोह येथे २४.९३ एमएमक्यूब पाणीच होते. परंतु नवेगाव खैरी येथे मात्र पाणीपातळी वाढलेली नाही. मागील वर्षी तेथे ३८.०५ टक्के पाणी होते. यंदा हे प्रमाण २८.९२ टक्के इतकेच आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी