शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

आगमनाअगोदरच नागपुरकरांना गणराया पावला : १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:14 IST

गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवात पाणीकपात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाचे पदाधिकारी व जलप्रदाय विभागामध्ये झालेल्या चर्चेनंतर पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेण्यात आला.१५ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत शहरातील ७० टक्के भागात आठवड्यातील तीन दिवस पाणीकपात करण्यात आली. तर कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरुनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगरच्या काही भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू होता. पेंचमध्ये पाणी नसल्याने पाणीकपात करण्यात येत होती.३१ ऑगस्ट रोजी पाणीकपातीसंदर्भात समिक्षा होणार होती. परंतु मनपा प्रशासनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सर्वसंमतीने गणेशोत्सवादरम्यान पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेतला.मध्य प्रदेशातील चौराई डॅममधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी मागील वर्षीपेक्षा चांगली आहे. मात्र हे प्रमाण समाधानकारक नाही. परंतु गणेशोत्सवादरम्यान शहरवासीयांना पाणी मिळावे यासाठी पाणीकपात करण्याचा निर्णय काही दिवसांसाठी स्थगित करण्यात येत आहे. त्यानंतर पाण्याचा साठा पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली. पाणीकपात बंद करण्याच्या निर्णयाला निवडणूकींसाठी जोडले जाऊ शकत नाही. तोतलाडोहमध्ये मागील आठवड्यापर्यंत पाणी एकदमच खालच्या पातळीवर होते. पाणीच नव्हते त्यामुळे पुरवठा नव्हता, असेदेखील त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला स्थायी समिति अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, दिव्या धुरडे उपस्थित होते.४३ दिवसांत वाचविले ७.५२ एमएमक्यूब पाणीपाणीकपातीमुळे मनपाच्या जलप्रदाय विभागाने ७.५२ एमएमक्यूब पाण्याची बचत केली. येत्या काळात पाणीसंकट वाढणार आहे. त्यामुले भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन पावले उचलावी लागतील. १५ सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागली तर मनपा प्रशासन, आयुक्त स्वत:च्या पातळीवर पाणीकपातीबाबत निर्णय घेतील, असे पिंटू झलके यांनी सांगितले.पाणीसाठा वाढलामध्यप्रदेशच्या चौराई डॅममधून मागील दिवसांत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी वाढली आहे. सद्यस्थितीत येथे ३२.७३ टक्के अर्थातच ३३२.८६ एमएमक्यूब पाणी आहे. तर मृतसाठा पकडून येथे एकूण ४८२.८४ एमएमक्यूब पाणी आहे. मागील वर्षी या कालावधीत तोतलाडोह येथे २४.९३ एमएमक्यूब पाणीच होते. परंतु नवेगाव खैरी येथे मात्र पाणीपातळी वाढलेली नाही. मागील वर्षी तेथे ३८.०५ टक्के पाणी होते. यंदा हे प्रमाण २८.९२ टक्के इतकेच आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी