लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : वसंतराव गाेविंदराव पुसदकर (५१, रा. सावंगी, ता. कळमेश्वर) यांच्या खून प्रकरणात पसार असलेल्या आराेपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या १५ दिवसानंतर अटक केली. त्याला पिथमपूर, जिल्हा धार (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
रायसिंग भागेरथ मेवाडा (४२, रा. सावंगी, ता. कळमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. वसंतराव पुसदकर हे गुमथळा (ता. कळमेश्वर) शिवारातील शेतात गेले हाेते. घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पाेलिसात दाखल केली हाेती. त्यातच २० जानेवारी २०२१ राेजी त्यांचा मृतदेह अरुण सावरकर यांच्या शेतालगतच्या नालीत आढळून आला. त्यांच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमांमुळे त्यांचा शस्त्राने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले हाेते. त्यामुळे पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला हाेता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही समांतर तपासाला सुरुवात केली. ताे पिथमपूर येथे असल्याचे कळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिथमपूर गाठून त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, उपनिरीक्षक नरेंद्र गाैरखेडे व जावेद शेख, राजेंद्र सनाेडिया, जयप्रकाश शर्मा, राेहन डाखाेरे, अमृत किनगे, अजिज दुधकनाेज, कविता बचले, सायबर सेलचे सतीश राठाेड यांच्या पथकाने केली.
...
खाेट्या नावाने वास्तव्य
वसंतराव यांचा खून केल्यानंतर रायसिंग पळून गेला हाेता. ताे पिथमपूर येथे खाेट्या नावाने राहात हाेता. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला असंबद्ध उत्तरे दिली. त्यानंतर मात्र त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय, त्याने हा खून अनैतिक संबंंधातून केल्याचेही पाेलिसांना सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुढील चाैकशीसाठी कळमेश्वर पाेलिसांच्या ताब्यात दिले आहे.