शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:18 IST

महावितरणचे सब स्टेशन भिवापूरच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शेतकऱ्याकडून ३ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.

ठळक मुद्दे भिवापूरच्या शेतकऱ्याला मागितली लाच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महावितरणचे सब स्टेशन भिवापूरच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शेतकऱ्याकडून ३ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. आरोपीत कंत्राटी लाईनमन प्रीतम गौतम लोखंडे (२५) आणि शुभम पुंडलिक हिंगे (२५) यांचा समावेश आहे. तक्रारकर्ता भिवापूर तालुक्याच्या वीरखंडी धार्पला गावातील शेतकरी आहे. त्यांच्या वडिलांच्या नावाने दोन एकर शेती आहे. त्यांच्या शेतात विहीर असल्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी विजेच्या मीटरची गरज होती. त्यासाठी त्यांनी अर्ज केल्यानंतर डिमांड नोटचे ५ हजार ७४८ रुपये भरले होते. त्यानंतरही विजेचे मीटर लावण्यात आले नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याला थेट खांबावरून कनेक्शन घेतल्यामुळे कारवाई न करण्यासाठी ४ हजाराची लाच मागितली होती. परंतु शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नव्हती. अखेर शेतकऱ्याने नागपूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात निरीक्षक विनोद आडे यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून शनिवारी १४ डिसेंबरला आरोपींना पकडण्याची योजना आखली. आरोपींशी चर्चा करून ३ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर एसीबीच्या चमूने भिवापुरला आरोपींना बोलावून रक्कम घेताना अटक केली. ही कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनोद आडे, हवालदार अशोक बैस, अनिल बहिरे, वंदना नगरारे, शारीक शेख यांनी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागmahavitaranमहावितरण