शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी ते दीक्षाभूमी :  'समतेचे महाकाव्य' साकारण्यासाठी सायकल रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:33 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे अभियान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल रॅली काढण्यात आली.आर्णीपासून २०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत शुक्रवारी दीक्षाभूमीवर पोहचलेल्या या बहाद्दरांनी लोकमतशी संवाद साधला. या अभियानात अकोल्याचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, तहसीलदार राहुल तायडे, तहसिलदार विजय लोखंडे, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे या पाच अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. हे पाचही अधिकारी २९ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथून निघाले व पुढे यवतमाळ, कळंब, देवळी, वर्धा या मार्गाने होत दीक्षाभूमीवर पोहचले. यानंतर त्याच्या मार्गाने परत जात सायकलने ४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. यामध्ये हरिओमसिंह करणसिंग बघेल, प्रमोद बुटले, दीपक हिरोळे, श्रीकृष्णा सोडगीर, सतीश पाचखंडे या पाच नागरिकांचाही समावेश आहे.या महाकाव्यामध्ये डॉ. बाबासाहेबांचे जीवनकार्यावर कवितांचा समावेश असणार आहे. बाबासाहेबांचे बालपण, शिक्षण, त्यांनी केलेला संघर्ष, सुरू केलेली वृत्तपत्र, संस्था, पक्ष, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, विधिमंडळातील कार्य, संविधान निर्मितीचे कार्य, महिलांकरिता, मजुरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य, राजकीय कार्य आणि बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम आदी विषयांचा उलगडा महाकाव्यातील कवितांच्या माध्यमातून होणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातील आणि जगभरातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधील कविता या महाकाव्यात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले. कवी किंवा कवयित्री एकापेक्षा अधिक कविता पाठवू शकतात. जगातील जास्तीत जास्त कविंनी डॉ. बाबासाहेबांच्या विविध पैलुवर प्रकाश टाकणाऱ्या विविध भाषांमधील कविता पाठवाव्या, असे आवाहन या सायकल रॅलीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :CyclingसायकलिंगDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी