शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वाद पेटला, आ. आशिष जयस्वालांना उत्तर देण्यासाठी कुमेरिया मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 11:12 IST

शिवसैनिकांना भाजपसोबत युती नको म्हणणारे आता भाजपची चाकरी करत आहेत, अशी टीकाही कुमेरिया यांनी केली.

ठळक मुद्दे२०१९मध्ये भाजपविरोधात लढले तेव्हा हिंदुत्व कुठे गेले ?

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना उत्तर देण्यासाठी शेवटी नागपूरचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया मैदानात उतरले आहेत. २०१९मध्ये भाजप-शिवसेना युतीत रामटेकची जागा भाजपला सुटली तेव्हा जयस्वाल हे बंडखोरी करत अपक्ष म्हणून भाजपविरोधात लढले. त्यावेळी त्यांचे हिंदुत्व कुठे गेले होते, असा सवाल कुमेरिया यांनी केला आहे. तर त्या निवडणुकीत शिवसैनिकांच्या भरवशावर आपण निवडून आलात, याचे स्मरणही त्यांनी करून दिले आहे.

कुमेरिया म्हणाले, आमदार जयस्वाल यांना शिवसेनेने रामटेक विधानसभेची संपूर्ण जबाबदारी दिली होती. जयस्वाल यांनी पक्षाचा विश्वासघात केला, पक्षाच्या शिवसैनिकाला मोठे करायचे सोडून त्यांनी आपल्या जवळच्या काहीच लोकांना मोठे केले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जयस्वाल यांचा पराभव केला. तो पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला होता.

२०१९मध्ये युती झाली व रामटेकची जागा भाजपच्या वाट्याला गेली. आता हिंदुत्वाची माळ जपणारे जयस्वाल यांनी त्यावेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शिवसैनिकांना भाजपसोबत युती नको म्हणणारे आता भाजपची चाकरी करत आहेत, अशी टीकाही कुमेरिया यांनी केली.

मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग येथे सोबतचेही सोडून का गेले ?

जयस्वाल यांची तडफड मंत्रिपदासाठी

पक्ष ही वैयक्तिक मालमत्ता नाही, आमदार जयस्वाल यांनी केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. केवळ मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांची ही तडफड आहे. मंत्रिपदाच्या लालसेपोटी व ईडीच्या भीतीने आपण शिंदे गटात गेलात, हे मान्य करा, असा टोलाही कुमेरिया यांनी जयस्वाल यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते जयस्वाल

राज्याच्या मुख्यमंत्रिपदामध्ये एक जादू असते. त्या पदाचा वापर करून मुख्यमंत्री विरोधकांनाही आपलेसे करून टाकतात. पण येथे मुख्यमंत्रिपद असतानाही पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी केला होता.

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Jaiswalआशीष जयस्वालnagpurनागपूरShiv Senaशिवसेना