शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

वाद पेटला, आ. आशिष जयस्वालांना उत्तर देण्यासाठी कुमेरिया मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 11:12 IST

शिवसैनिकांना भाजपसोबत युती नको म्हणणारे आता भाजपची चाकरी करत आहेत, अशी टीकाही कुमेरिया यांनी केली.

ठळक मुद्दे२०१९मध्ये भाजपविरोधात लढले तेव्हा हिंदुत्व कुठे गेले ?

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना उत्तर देण्यासाठी शेवटी नागपूरचे जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया मैदानात उतरले आहेत. २०१९मध्ये भाजप-शिवसेना युतीत रामटेकची जागा भाजपला सुटली तेव्हा जयस्वाल हे बंडखोरी करत अपक्ष म्हणून भाजपविरोधात लढले. त्यावेळी त्यांचे हिंदुत्व कुठे गेले होते, असा सवाल कुमेरिया यांनी केला आहे. तर त्या निवडणुकीत शिवसैनिकांच्या भरवशावर आपण निवडून आलात, याचे स्मरणही त्यांनी करून दिले आहे.

कुमेरिया म्हणाले, आमदार जयस्वाल यांना शिवसेनेने रामटेक विधानसभेची संपूर्ण जबाबदारी दिली होती. जयस्वाल यांनी पक्षाचा विश्वासघात केला, पक्षाच्या शिवसैनिकाला मोठे करायचे सोडून त्यांनी आपल्या जवळच्या काहीच लोकांना मोठे केले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जयस्वाल यांचा पराभव केला. तो पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला होता.

२०१९मध्ये युती झाली व रामटेकची जागा भाजपच्या वाट्याला गेली. आता हिंदुत्वाची माळ जपणारे जयस्वाल यांनी त्यावेळी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शिवसैनिकांना भाजपसोबत युती नको म्हणणारे आता भाजपची चाकरी करत आहेत, अशी टीकाही कुमेरिया यांनी केली.

मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग येथे सोबतचेही सोडून का गेले ?

जयस्वाल यांची तडफड मंत्रिपदासाठी

पक्ष ही वैयक्तिक मालमत्ता नाही, आमदार जयस्वाल यांनी केलेले वक्तव्य अशोभनीय आहे. केवळ मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांची ही तडफड आहे. मंत्रिपदाच्या लालसेपोटी व ईडीच्या भीतीने आपण शिंदे गटात गेलात, हे मान्य करा, असा टोलाही कुमेरिया यांनी जयस्वाल यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते जयस्वाल

राज्याच्या मुख्यमंत्रिपदामध्ये एक जादू असते. त्या पदाचा वापर करून मुख्यमंत्री विरोधकांनाही आपलेसे करून टाकतात. पण येथे मुख्यमंत्रिपद असतानाही पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी केला होता.

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Jaiswalआशीष जयस्वालnagpurनागपूरShiv Senaशिवसेना